शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
2
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
3
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
4
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
5
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
6
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
7
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
8
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
9
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
10
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
11
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
12
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
13
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
14
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
15
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
16
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
17
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
18
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
19
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
20
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा

‘माणुसकीची भिंत’ ला उदंड प्रतिसाद

By admin | Updated: November 13, 2016 00:32 IST

जालना : जालना जिल्हा नव्हेतर मराठवाड्यात प्रथमच ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाला जालना शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

जालना : जालना जिल्हा नव्हेतर मराठवाड्यात प्रथमच ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाला जालना शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवसीय उपक्रमाच्या पहिल्या दिवशी शहरातून फेरी काढून उपक्रमाची माहिती देण्यासोबतच अनेकांनी गरजूंसाठी कपडेही दिले. जालना शहरातील अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने वापरण्यायोग्य असे २००० पेक्षा जास्त व्यक्तींचे समाज ऋण रथामध्ये कपडे जमा केले. तसेच गांधी चमन व शिवाजी पुतळा येथे स्वत: येऊन गरजू लोकांना स्वत:च्या हाताने कपडे दिले. या प्रकारचे उपक्रम प्रथम जिल्ह्यात आयोजित झाल्यामुळे सर्व नागरिकांत कुतुहल आहे. तर काही ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाची प्रशंसा सुद्धा दिली.काळ्या पैशाची सर्जिकल स्ट्राईक, निवडणुकीचे गरम वातावरण असताना मराठवाड्यात थंडीची चाहूल लागत आहे. मागच्या चार - पाच दिवसांत तापमानाचा पारा झपाट्याने खाली गेला आहे. यामुळे सर्वजण थंडीपासून बचावासाठीचे तऱ्हेतऱ्हेचे उबदार कपडे खरेदी करतो. मात्र ज्यांची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत व अंगभर घालायला कपडे नसलेले कितीतही गरजवंत रस्त्यावर इतरत्र झोपलेले आपल्या निदर्शनास येतात. यांच्यासाठीच स्वराज्य फाऊंडेशन हा उपक्रम सुरू केला आहे. हे उबदार जुने कपडे, चप्पल सोबतच उपयुक्त जीवनावश्यक साहित्य गोळा करण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम जालना शहरात प्रथमच शिवाजी पुतळा व गांधी चमन याठिकाणी १२, १३ व १४ नोव्हेंबर या तीन दिवस राबवत आहे. या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी जालनेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. जवळपास या माणुसकीच्या भिंतीला पहिल्या दिवशी २००० पेक्षाही जास्त व्यक्तींनी दोन्हीही ठिकाणी भेट देऊन वापरण्यायोग्य स्वेटर, उबदार, जुने कपडे दिले व फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा.विजय सुरासे, विद्यार्थी स्वयंसेवकाचे कौतुक केले.गांधी चमन येथील सकाळी सर्व प्रथम संजय कायंदे, रुपाबाई देवकर, लक्ष्मणराव काळे, रमेश वाघमारे, शेख मोबिन शेख प्यारे व शिवाजी पुतळा येथील सकाळी सर्वप्रथम अभिषेक भराडे, रवींद्र कातकर, रोहित परळकर, वैभव लोखंडे, शीला गुळावकर या सदगृहस्थांनी उपयोगी कपडे भेट देऊन गरजवंताची गरज भागवली.माणुसकीची भिंत उपक्रमातील स्वयंसेवक गणेश दाभाडे, शैलेश चव्हाण, प्रियंका माकू, हर्षदा खरात, सीमा गायकवाड, तेजस्विनी इंचे, अस्लम शेख, हर्षवर्धन पाटील, गणेश नेमाने, गोपाल तौर, ऋषिकेश जिरेकर, सिद्धेश्वर खांडेकर गोपाल पेंढारकर, दीपक पाठक, योगेश लवटे, रवींद्र गरंडवाल, निलेश कानडे यांनी सकाळ पासून सायंकाळपर्यंत परिश्रम घेतल्याचे स्वराज्य फाऊंडेशनचे प्रा. विजय सुरासे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)