शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

‘माणुसकीची भिंत’ ला उदंड प्रतिसाद

By admin | Updated: November 13, 2016 00:32 IST

जालना : जालना जिल्हा नव्हेतर मराठवाड्यात प्रथमच ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाला जालना शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

जालना : जालना जिल्हा नव्हेतर मराठवाड्यात प्रथमच ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाला जालना शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवसीय उपक्रमाच्या पहिल्या दिवशी शहरातून फेरी काढून उपक्रमाची माहिती देण्यासोबतच अनेकांनी गरजूंसाठी कपडेही दिले. जालना शहरातील अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने वापरण्यायोग्य असे २००० पेक्षा जास्त व्यक्तींचे समाज ऋण रथामध्ये कपडे जमा केले. तसेच गांधी चमन व शिवाजी पुतळा येथे स्वत: येऊन गरजू लोकांना स्वत:च्या हाताने कपडे दिले. या प्रकारचे उपक्रम प्रथम जिल्ह्यात आयोजित झाल्यामुळे सर्व नागरिकांत कुतुहल आहे. तर काही ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाची प्रशंसा सुद्धा दिली.काळ्या पैशाची सर्जिकल स्ट्राईक, निवडणुकीचे गरम वातावरण असताना मराठवाड्यात थंडीची चाहूल लागत आहे. मागच्या चार - पाच दिवसांत तापमानाचा पारा झपाट्याने खाली गेला आहे. यामुळे सर्वजण थंडीपासून बचावासाठीचे तऱ्हेतऱ्हेचे उबदार कपडे खरेदी करतो. मात्र ज्यांची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत व अंगभर घालायला कपडे नसलेले कितीतही गरजवंत रस्त्यावर इतरत्र झोपलेले आपल्या निदर्शनास येतात. यांच्यासाठीच स्वराज्य फाऊंडेशन हा उपक्रम सुरू केला आहे. हे उबदार जुने कपडे, चप्पल सोबतच उपयुक्त जीवनावश्यक साहित्य गोळा करण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम जालना शहरात प्रथमच शिवाजी पुतळा व गांधी चमन याठिकाणी १२, १३ व १४ नोव्हेंबर या तीन दिवस राबवत आहे. या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी जालनेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. जवळपास या माणुसकीच्या भिंतीला पहिल्या दिवशी २००० पेक्षाही जास्त व्यक्तींनी दोन्हीही ठिकाणी भेट देऊन वापरण्यायोग्य स्वेटर, उबदार, जुने कपडे दिले व फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा.विजय सुरासे, विद्यार्थी स्वयंसेवकाचे कौतुक केले.गांधी चमन येथील सकाळी सर्व प्रथम संजय कायंदे, रुपाबाई देवकर, लक्ष्मणराव काळे, रमेश वाघमारे, शेख मोबिन शेख प्यारे व शिवाजी पुतळा येथील सकाळी सर्वप्रथम अभिषेक भराडे, रवींद्र कातकर, रोहित परळकर, वैभव लोखंडे, शीला गुळावकर या सदगृहस्थांनी उपयोगी कपडे भेट देऊन गरजवंताची गरज भागवली.माणुसकीची भिंत उपक्रमातील स्वयंसेवक गणेश दाभाडे, शैलेश चव्हाण, प्रियंका माकू, हर्षदा खरात, सीमा गायकवाड, तेजस्विनी इंचे, अस्लम शेख, हर्षवर्धन पाटील, गणेश नेमाने, गोपाल तौर, ऋषिकेश जिरेकर, सिद्धेश्वर खांडेकर गोपाल पेंढारकर, दीपक पाठक, योगेश लवटे, रवींद्र गरंडवाल, निलेश कानडे यांनी सकाळ पासून सायंकाळपर्यंत परिश्रम घेतल्याचे स्वराज्य फाऊंडेशनचे प्रा. विजय सुरासे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)