शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

अतिक्रमणांवर आज बुलडोझर !

By admin | Updated: May 26, 2014 00:27 IST

उस्मानाबाद : शहरातील अतिक्रमण हटविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दोन दिवसांपूर्वीच एका बैठकीत पालिका प्रशासन व बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना आदेश दिले होते.

उस्मानाबाद : शहरातील अतिक्रमण हटविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दोन दिवसांपूर्वीच एका बैठकीत पालिका प्रशासन व बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित यंत्रणेने या आदेशाची अंमलबजावणी करीत शहरातील सुमारे २०० वर अतिक्रमणधारकांच्या प्रतिष्ठानांवर नोटिस डकवून अतिक्रण काढण्याबाबत सूचित केले आहे. या उपरही ज्यांनी अतिक्रमणे हटविली नाहीत, त्या अतिक्रमणांवर प्रशासन सोमवारी बुलडोजर फिरविणार आहे. उस्मानाबाद शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या औैरंगाबाद-सोलापूर या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी विशेषत: जिल्हाधिकारी कार्याल, जिल्हा परिषद, बसस्थानकासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. मागील दोत ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी शहरांसोतबत ग्रामणी भागातील अतिक्रमणे हटविण्याबाबत नगर पालिका, तहसील प्रशासन, बांधकाम विभागाला आदेश दिले होते. उस्मानाबाद शहरामध्ये या आदेशाच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली आहे. औैरंगाबाद-सोलापूर या मार्गावरील अतिक्रमणांवर प्रशासनाच्या वतीने नोटिसा डकविण्यात आल्या आहेत. सदरील अतिक्रमणे तातडीने काढून घ्यावीत, असे सदरील नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. जे अतिक्रमणधारक या नोटिसीचे पालन करणार नाहीत, त्यांचे अतिक्रमण प्रशासनाच्या वतीने काढण्यात येणार आहे. सदरील अतिक्रमण हटविण्यासाठी येणारा सर्व खर्च हा ‘त्या’ अतिक्रमणधारकाकडून वसूल केला जाईल, असे प्रशासनाने दिलेल्या नोटिसीत म्हटले आहे. रस्ते होणार मोकळे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्याल त्यानंतर बसस्थानकासमोर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे विशेषत: बसस्थानकासमोर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. मात्र, सोमवारी ही सर्व अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याने औरंगाबाद-सोलापूर हा मार्ग मोकळा श्वास घेणार आहे. (प्रतिनिधी) पोलिस बंदोबस्त अतिक्रमण हटविताना विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समितीसमोर झेरॉक्स सेंटर, पान टपरी, चहाचे गाडे, फळ विक्रेते आदी प्रकारची लहान-लहान दुकाने आहेत. हा रस्ता बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत आहे. असे असतानाही या अतिक्रमणधारकांकडून काही दिवस नगर परिषद तर काही दिवस संबंधित कंत्राटदाराने प्रतिदिन १० ते १५ रूपये इतका कर वसूल केला आहे. सदरील रस्ता जर बांधकाम विभागाचा असेल तर पालिका प्रशासन कोणत्या आधारावर या लोकांकडून कर वसूल करते, असा सवाल येथील अतिक्रमण धारकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या अतिक्रमणधारकांनी ‘त्या’ पावत्या जवळ ठेवल्या आहेत. पावत्यांवर ‘आठवडी ‘बाजर/दैैनंदिन बाजार’ असे नमूद केले आहे. हा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू असल्याचेही अतिक्रमणधारकांचे म्हणणे आहे. स्वत:हून अतिक्रमणे काढली बांधकाम विभागाच्या नोटिसा मिळाल्यानंतर काही दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमण हटविली. तर काही जणांनी सदरील नोटिसीकडे कानाडोळा केला. त्यामुळे आता अशा अतिक्रमणांवर प्रशासनाचा बुलडोझर फिरणार आहे. त्याचप्रमाणे अतिक्रणम काढण्यासाठी येणारा खर्चही त्या-त्या व्यक्तीकडून घेतला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बंद दुकानांवर डकविल्या नोटिसा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नोटिसा देण्यास सुरूवात केली. तेव्हा अनेक दुकाने बंद होती. त्यामुळे ‘त्या’ नोटिसा सर्वसंबंधितांना देता आल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने अतिक्रमणांवरच नोटिसा डकविण्यात आल्या आहेत. ही सर्व अतिक्रमणे सोमवारी काढण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे अभियंता देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.