शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणांवर आज बुलडोझर !

By admin | Updated: May 26, 2014 00:27 IST

उस्मानाबाद : शहरातील अतिक्रमण हटविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दोन दिवसांपूर्वीच एका बैठकीत पालिका प्रशासन व बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना आदेश दिले होते.

उस्मानाबाद : शहरातील अतिक्रमण हटविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दोन दिवसांपूर्वीच एका बैठकीत पालिका प्रशासन व बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित यंत्रणेने या आदेशाची अंमलबजावणी करीत शहरातील सुमारे २०० वर अतिक्रमणधारकांच्या प्रतिष्ठानांवर नोटिस डकवून अतिक्रण काढण्याबाबत सूचित केले आहे. या उपरही ज्यांनी अतिक्रमणे हटविली नाहीत, त्या अतिक्रमणांवर प्रशासन सोमवारी बुलडोजर फिरविणार आहे. उस्मानाबाद शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या औैरंगाबाद-सोलापूर या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी विशेषत: जिल्हाधिकारी कार्याल, जिल्हा परिषद, बसस्थानकासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. मागील दोत ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी शहरांसोतबत ग्रामणी भागातील अतिक्रमणे हटविण्याबाबत नगर पालिका, तहसील प्रशासन, बांधकाम विभागाला आदेश दिले होते. उस्मानाबाद शहरामध्ये या आदेशाच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली आहे. औैरंगाबाद-सोलापूर या मार्गावरील अतिक्रमणांवर प्रशासनाच्या वतीने नोटिसा डकविण्यात आल्या आहेत. सदरील अतिक्रमणे तातडीने काढून घ्यावीत, असे सदरील नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. जे अतिक्रमणधारक या नोटिसीचे पालन करणार नाहीत, त्यांचे अतिक्रमण प्रशासनाच्या वतीने काढण्यात येणार आहे. सदरील अतिक्रमण हटविण्यासाठी येणारा सर्व खर्च हा ‘त्या’ अतिक्रमणधारकाकडून वसूल केला जाईल, असे प्रशासनाने दिलेल्या नोटिसीत म्हटले आहे. रस्ते होणार मोकळे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्याल त्यानंतर बसस्थानकासमोर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे विशेषत: बसस्थानकासमोर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. मात्र, सोमवारी ही सर्व अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याने औरंगाबाद-सोलापूर हा मार्ग मोकळा श्वास घेणार आहे. (प्रतिनिधी) पोलिस बंदोबस्त अतिक्रमण हटविताना विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समितीसमोर झेरॉक्स सेंटर, पान टपरी, चहाचे गाडे, फळ विक्रेते आदी प्रकारची लहान-लहान दुकाने आहेत. हा रस्ता बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत आहे. असे असतानाही या अतिक्रमणधारकांकडून काही दिवस नगर परिषद तर काही दिवस संबंधित कंत्राटदाराने प्रतिदिन १० ते १५ रूपये इतका कर वसूल केला आहे. सदरील रस्ता जर बांधकाम विभागाचा असेल तर पालिका प्रशासन कोणत्या आधारावर या लोकांकडून कर वसूल करते, असा सवाल येथील अतिक्रमण धारकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या अतिक्रमणधारकांनी ‘त्या’ पावत्या जवळ ठेवल्या आहेत. पावत्यांवर ‘आठवडी ‘बाजर/दैैनंदिन बाजार’ असे नमूद केले आहे. हा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू असल्याचेही अतिक्रमणधारकांचे म्हणणे आहे. स्वत:हून अतिक्रमणे काढली बांधकाम विभागाच्या नोटिसा मिळाल्यानंतर काही दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमण हटविली. तर काही जणांनी सदरील नोटिसीकडे कानाडोळा केला. त्यामुळे आता अशा अतिक्रमणांवर प्रशासनाचा बुलडोझर फिरणार आहे. त्याचप्रमाणे अतिक्रणम काढण्यासाठी येणारा खर्चही त्या-त्या व्यक्तीकडून घेतला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बंद दुकानांवर डकविल्या नोटिसा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नोटिसा देण्यास सुरूवात केली. तेव्हा अनेक दुकाने बंद होती. त्यामुळे ‘त्या’ नोटिसा सर्वसंबंधितांना देता आल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने अतिक्रमणांवरच नोटिसा डकविण्यात आल्या आहेत. ही सर्व अतिक्रमणे सोमवारी काढण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे अभियंता देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.