शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

मोठ्या प्रमाणात मतविभागणी

By admin | Updated: October 22, 2014 01:17 IST

जालना : विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणेच चौरंगी लढत झाली. शिवसेना, काँग्रेस, भाजपा आणि बसपा या उमेदवारांमध्ये शेवटच्या फेरीपर्यंत मताधिक्यांमध्ये होणाऱ्या

जालना : विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणेच चौरंगी लढत झाली. शिवसेना, काँग्रेस, भाजपा आणि बसपा या उमेदवारांमध्ये शेवटच्या फेरीपर्यंत मताधिक्यांमध्ये होणाऱ्या चढ-उतारामुळे मतदारांनी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची उत्सुकता अखेरपर्यंत कायम ठेवली. या निवडणुकीत शिवसेना उमेदवार अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा केवळ २९६ मतांनी पराभव केला. या प्रमुख चार उमेदवारांशिवाय अन्य १३ उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या. या मतदारसंघात सुरूवातीला काँग्रेस आणि शिवसेना या उमेदवारांमध्येच दुरंगी लढत होणार असे चित्र होते. परंतु प्रत्यक्षात युती फुटल्यामुळे भाजपातर्फे माजी आमदार अरविंद चव्हाण हेही रिंंगणात उतरले. तर बसपाच्या अब्दूल रशीद पहेलवान यांनीही अत्यंत चुरशीची लढत दिली. त्यामुळे गोरंट्याल आणि खोतकर या पारंपरिक उमेदवारांचे मतविभाजन होणारच, याची चर्चा पूर्वीपासूनच सुरू होती. परंतु या मतविभाजनाचा फटका कुणाला बसणार, हे शेवटपर्यंत कुणी स्पष्ट सांगू शकत नव्हते. परिणामी ग्रामीण आणि शहरी भागातील मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने जाणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरले होते. माळेगाव बु. या गावात चव्हाण यांनी १४४ तर खोतकर यांनी ११९ मते मिळविली. गोरंट्याल यांना ९२ मते मिळाली. वरखेडा सिंदखेड, पोखरी सिंदखेड, कुंभेफळ सिंदखेड या गावांमध्येही खोतकर यांनी मताधिक्य मिळविले. धावेडीने खोतकर यांना आणखी तारले. तेथे त्यांना ५७५ तर गोरंट्याल यांना २२७ मते मिळाली. रशीद यांना रामनगर २, रामनगर ५, ७, ८,९, ख्रिस्ती कॅम्प ५, ६, भीमनगर १,२, काजीपुरा १, कबाडी मोहल्ला, खडकपुरा १, शास्त्री मोहल्ला, कुंभारगल्ली, तट्टूपुरा, मोरंडी मोहल्ला, साळी गल्ली, सिंधी काळेगाव, राममूर्ती, मंजरेवाडी इत्यादी मतदान केंद्रांवर मताधिक्य मिळाल्याने काही फेऱ्यांमध्ये रशीद यांची लढत गोरंट्याल किंवा खोतकर यांच्याच सोबत झाली. मंठा रोड, एसआरपीएफ, मोदीखाना, औद्योगिक वसाहत,सराफा, नळगल्ली, लक्ष्मीनारायपुरा भागात गोरंट्याल यांना आघाडी मिळाली.(प्रतिनिधी)४राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खुशालसिंह ठाकूर व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रवि हरिभाऊ राऊत यांना काही केंद्रांवर भोपळाही फोडता आला नाही. माजी आमदार अरविंद चव्हाण यांना मंजरेवाडी केंद्रावर केवळ २ मते मिळाली. वखारी २ येथे खोतकर हे जवळपास वन-वे चालले. साळेगाव नेर, मानेगाव खालसा यासारख्या केंद्रांवर चव्हाण यांचे मताधिक्य राहिल, असा अंदाज होता. मात्र तो फोल ठरला. या ठिकाणी खोतकर आणि गोरंट्याल यांना चांगली मते मिळाली. सावरगाव हडप, सिंधीकाळेगाव सिरसवाडी, इंदेवाडी, आंतरवाला, सामनगाव, गोलापांगरी या केंद्रांवर खोतकर यांना सर्वाधिक मते पडली.