शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
4
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
5
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
6
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
7
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
8
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
9
चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
10
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
11
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
12
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
13
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
14
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
15
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
16
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
17
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
18
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
19
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
20
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

केवळ आवास नव्हे खऱ्या अर्थाने घर बनवा

By | Updated: December 5, 2020 04:07 IST

औरंगाबाद : केवळ घरकुल देऊन थांबू नका. सर्वच योजनांच्या मदतीतून लाभार्थ्याला मिळणारे आवास खऱ्या अर्थाने घर ग्रामीण विकास यंत्रणेने ...

औरंगाबाद : केवळ घरकुल देऊन थांबू नका. सर्वच योजनांच्या मदतीतून लाभार्थ्याला मिळणारे आवास खऱ्या अर्थाने घर ग्रामीण विकास यंत्रणेने बनवावे. संख्यात्मक कामगिरी अपेक्षित असताना उद्दिष्टपूर्तीत गुणवत्तेत तडजोड होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या.

महाआवास अभियानाला राज्यभरात सुरुवात झाली आहे. शंभर दिवसांत घरकुलाची स्वप्नपूर्ती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या कार्यशाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, खा. डाॅ. भागवत कराड, आ. रमेश बोरनारे, आ. उदयसिंग राजपीत, सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, विकास शाखेचे उपायुक्त अविनाश गोटे, जिल्हा परिषद सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. महाआवास अभियानात ग्रामस्तरावर कामगिरी उंचावून जास्तीत जास्त पुरस्कार जिल्ह्यात खेचून आणण्याची अपेक्षा महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात सर्व घरकुल योजना मिळून ४० हजार ७२४ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट होते. कोरोना आणि आचारसंहितेमुळे जिल्ह्यात ३१ हजार ६९९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत १६ हजार ८८१ घरकुले पूर्णत्वास आली. हे प्रमाण केवळ ४१.४५ टक्के असून, २३ हजार ८४३ घरे अद्याप अपूर्ण आहेत. यात पंतप्रधान आवास योजना, रमाई, शबरी, पारधी, आदीम आवास योजनांचा समावेश आहे. अपूर्ण कामांना गती देण्याच्या सूचना डाॅ. मंगेश गोंदावले यांनी गटविकास अधिकाऱ्यांना कार्यशाळेत दिल्या.