शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

केवळ आवास नव्हे खऱ्या अर्थाने घर बनवा

By | Updated: December 5, 2020 04:07 IST

औरंगाबाद : केवळ घरकुल देऊन थांबू नका. सर्वच योजनांच्या मदतीतून लाभार्थ्याला मिळणारे आवास खऱ्या अर्थाने घर ग्रामीण विकास यंत्रणेने ...

औरंगाबाद : केवळ घरकुल देऊन थांबू नका. सर्वच योजनांच्या मदतीतून लाभार्थ्याला मिळणारे आवास खऱ्या अर्थाने घर ग्रामीण विकास यंत्रणेने बनवावे. संख्यात्मक कामगिरी अपेक्षित असताना उद्दिष्टपूर्तीत गुणवत्तेत तडजोड होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या.

महाआवास अभियानाला राज्यभरात सुरुवात झाली आहे. शंभर दिवसांत घरकुलाची स्वप्नपूर्ती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या कार्यशाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, खा. डाॅ. भागवत कराड, आ. रमेश बोरनारे, आ. उदयसिंग राजपीत, सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, विकास शाखेचे उपायुक्त अविनाश गोटे, जिल्हा परिषद सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. महाआवास अभियानात ग्रामस्तरावर कामगिरी उंचावून जास्तीत जास्त पुरस्कार जिल्ह्यात खेचून आणण्याची अपेक्षा महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात सर्व घरकुल योजना मिळून ४० हजार ७२४ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट होते. कोरोना आणि आचारसंहितेमुळे जिल्ह्यात ३१ हजार ६९९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत १६ हजार ८८१ घरकुले पूर्णत्वास आली. हे प्रमाण केवळ ४१.४५ टक्के असून, २३ हजार ८४३ घरे अद्याप अपूर्ण आहेत. यात पंतप्रधान आवास योजना, रमाई, शबरी, पारधी, आदीम आवास योजनांचा समावेश आहे. अपूर्ण कामांना गती देण्याच्या सूचना डाॅ. मंगेश गोंदावले यांनी गटविकास अधिकाऱ्यांना कार्यशाळेत दिल्या.