शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

केवळ आवास नव्हे खऱ्या अर्थाने घर बनवा

By | Updated: December 5, 2020 04:07 IST

औरंगाबाद : केवळ घरकुल देऊन थांबू नका. सर्वच योजनांच्या मदतीतून लाभार्थ्याला मिळणारे आवास खऱ्या अर्थाने घर ग्रामीण विकास यंत्रणेने ...

औरंगाबाद : केवळ घरकुल देऊन थांबू नका. सर्वच योजनांच्या मदतीतून लाभार्थ्याला मिळणारे आवास खऱ्या अर्थाने घर ग्रामीण विकास यंत्रणेने बनवावे. संख्यात्मक कामगिरी अपेक्षित असताना उद्दिष्टपूर्तीत गुणवत्तेत तडजोड होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या.

महाआवास अभियानाला राज्यभरात सुरुवात झाली आहे. शंभर दिवसांत घरकुलाची स्वप्नपूर्ती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या कार्यशाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, खा. डाॅ. भागवत कराड, आ. रमेश बोरनारे, आ. उदयसिंग राजपीत, सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, विकास शाखेचे उपायुक्त अविनाश गोटे, जिल्हा परिषद सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. महाआवास अभियानात ग्रामस्तरावर कामगिरी उंचावून जास्तीत जास्त पुरस्कार जिल्ह्यात खेचून आणण्याची अपेक्षा महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात सर्व घरकुल योजना मिळून ४० हजार ७२४ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट होते. कोरोना आणि आचारसंहितेमुळे जिल्ह्यात ३१ हजार ६९९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत १६ हजार ८८१ घरकुले पूर्णत्वास आली. हे प्रमाण केवळ ४१.४५ टक्के असून, २३ हजार ८४३ घरे अद्याप अपूर्ण आहेत. यात पंतप्रधान आवास योजना, रमाई, शबरी, पारधी, आदीम आवास योजनांचा समावेश आहे. अपूर्ण कामांना गती देण्याच्या सूचना डाॅ. मंगेश गोंदावले यांनी गटविकास अधिकाऱ्यांना कार्यशाळेत दिल्या.