शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

बांधकामांवरील बंदी उठविली

By admin | Updated: September 2, 2014 01:56 IST

औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाने दीड महिन्यापूर्वी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरालगतच्या ३२ गावांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बांधकामांना मनाई केली होती

औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाने दीड महिन्यापूर्वी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरालगतच्या ३२ गावांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बांधकामांना मनाई केली होती. मात्र, आता समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी ही बंदी उठविली असल्याचे तहसीलदार विजय राऊत यांनी आज सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यात यंदा संपूर्ण जून महिना कोरडा गेला. परिणामी पाणीटंचाईची भीषणता वाढली होती. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटेकोरपणे वापर करण्यासाठी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी १५ जुलै रोजी काही उपाययोजना केल्या होत्या. त्यात पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या हेतूने शहरालगतच्या ३२ गावांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बांधकामांना मनाई करण्यात आली होती. सातारा, देवळाई, वडगाव कोल्हाटी, वरूड काझी, करमाड, कुंभेफळ, लाडगाव, झाल्टा, निपाणी, गांधेली, नायगाव, जटवाडा इ. गावांमध्ये ही मनाई करण्यात आली होती. त्याच्या अंमलबजावणीसाठी तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली पथकाची स्थापनाही करण्यात आली होती. आता जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दीड महिन्यानंतर ही बंदी उठविली आहे. त्यामुळे नागरिकांना चांगला दिलासा मिळाला आहे.जायकवाडी धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी १५ जुलै रोजी उद्योगांच्या पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार उद्योगांच्या पाणीपुरवठ्यात सरासरी २० टक्के कपात करण्यात आली होती. मात्र, आता जायकवाडी धरणातही सुमारे २४ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे बांधकाम बंदीप्रमाणेच उद्योगांची पाणी कपातही मागे घेतली असल्याचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. बांधकाम बंदीच्या आदेशानंतर तहसीलच्या पथकाने काही दिवस संबंधित गावांचे दौरे केले. या दरम्यान, सुरू असलेल्या बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या. ३२ गावांमध्ये अशा ७२ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. दंड किंवा गुन्हे दाखल करण्याची कारवाई मात्र, कोणावरही करण्यात आली नाही. विशेष म्हणजे वरील सर्व गावांमध्ये बंदीनंतरही बिनधास्तपणे बांधकामे सुरूच होती.