शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

छतावर वीज बनवा आणि विका

By admin | Updated: June 24, 2016 01:32 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद सौरऊर्जेच्या माध्यमातून घराच्या छतावरच ऊर्जा निर्मिती प्रकल्प साकारण्याची योजना महावितरणने आणली आहे. तुम्ही निर्माण केलेली आणि वापरानंतर उरलेली

सुनील कच्छवे , औरंगाबादसौरऊर्जेच्या माध्यमातून घराच्या छतावरच ऊर्जा निर्मिती प्रकल्प साकारण्याची योजना महावितरणने आणली आहे. तुम्ही निर्माण केलेली आणि वापरानंतर उरलेली वीज महावितरण विकत घेणार आहे. शहरात या योजनेस प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत शहरातील बारा जणांनी तसा प्रकल्प उभारून महावितरणकडे त्याची नोंदणी केली आहे. राज्यात सौरऊर्जा निर्मितीची परवानगी आतापर्यंत मोठ्या उद्योजकांनाच होती. मात्र आता निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक वसाहती आणि हाऊसिंग सोसायट्यांना छतावर वीज निर्मिती करता येत आहे. महावितरणने त्याबाबत काही महिन्यांपूर्वीच नवीन नियमावली जारी केली आहे. त्यानुसार नागरिकांना त्यांच्या वापरानंतर वाचलेली वीज महावितरणला विकता येणार आहे. महावितरणच्या धोरणानुसार सिंगल फेस ग्राहक आठ किलोवॅट, थ्री फेज ग्राहक १५० किलोवॅट वीज निर्माण करूशकतो. मनपा हद्दीतील ग्राहक १५० किलोवॅट ते १ मेगावॅट वीज निर्माण करू शकतात. मनपा हद्दीबाहेरील ग्राहक ८० किलोवॅट ते १ मेगावॅट वीज निर्माण करू शकतात. न वापरलेली वीज नेटमीटरिंगद्वारे महावितरणला विकत देता येणार आहे. याविषयी महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, महावितरणच्या या योजनेला शहरात प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. याअंतर्गत आतापर्यंत शहरात सिंगल फेजच्या सात आणि थ्री फेजच्या पाच ग्राहकांनी महावितरणकडे नोंदणी केली असून, त्यांनी छतावर सौरऊर्जा निर्मिती सुरू केली आहे. यामध्ये चंद्रशेखर चौधरी, रामचंद्र रत्नपारखे, किशोर सोनवणे, राजीव मुंदडा, ऋषिकेश धर्माधिकारी, अरविंद ढोबले, गोपाल नावंदर तसेच राज आॅटो, विनोद तोतला, मिलिंद वाघ, गिरवारसिंग सुखमनी, केदार पानसे यांचा समावेश आहे. विजेची देवाण- घेवाण नेटमीटरिंगद्वारे सध्या शहरात बारा जणांकडून ऊर्जानिर्मिती होत आहे. परंतु तूर्तास त्यांच्याकडे निर्माण होणारी वीज ही त्यांचीच गरज भागविण्याइतकी आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांच्याकडून महावितरणला वीज विकत मिळत नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या बारा ग्राहकांकडे महावितरणचे वीज कनेक्शन आहे. त्यालाच नेटमीटर बसविण्यात आलेले आहे. तसेच सौरऊर्जा प्रकल्पाचे कनेक्शनही जोडण्यात आलेले आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांना जेव्हा सौरऊर्जेपासूनची वीज मिळत नसेल तेव्हा महावितरणच्या पोलवरून वीज मिळते.