शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

तहसीलमध्ये झाले दलालच कारभारी !

By admin | Updated: August 11, 2014 00:17 IST

बीड: दिवसेंदिवस जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या तहसील कार्यालय परिसरात दलालांचा सुळसुळाट वाढतच आहे.

बीड: दिवसेंदिवस जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या तहसील कार्यालय परिसरात दलालांचा सुळसुळाट वाढतच आहे. यामध्ये वडवणी, केज, धारुर अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. दलालांच्या या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्यांचे मात्र हाल होत आहेत.सध्या शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शिष्यवृत्ती फॉर्मसाठी लागणारे उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थी आपल्या तहसील कार्यालयात गर्दी करताना दिसून येत आहेत. प्रमाणपत्र काढण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र येथील अधिकारी, कर्मचारी थेट दलालांकडे पाठवून त्यांच्यामार्फत स्वत:ची झोळी भरुन घेत असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे. तसेच ओळखीचे लोक पाहून त्यांना तात्काळ प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले जात आहेत तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ८ ते १५ दिवस ‘वेटींग’ वर रहावे लागत आहे. विशेष म्हणजे नियमापेक्षा अधिक पैसे घेऊन शेतकरी, विद्यार्थी, पालक यांची आर्थिक लूट केली जात आहे. या दलालांना वरिष्ठांचे अभय असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. धारुर, केज, वडवणी या तहसील कार्यालयामध्ये तर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हद्दपार केल्याचे दिसून येत आहे. वडवणीच्या ‘सेतू’ मध्ये दलालच हाकतात कारभारयेथील सेतू कार्यालयात दलालांचाच कारभार चालतो. यांच्या आदेशानंतरच सेतूमधील कर्मचारी विद्यार्थी, शेतकरी यांना कागदपत्रे देतात. सेतूमधील कर्मचारीही विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे सेतूमधील महत्वाची कागदपत्रे खाली-वर करण्याचा महाप्रतापही येथील दलाल करीत असतात, याकडे मात्र तहसीलदारांचे दुर्लक्ष असते. या दलालांना त्यांची जागा दाखवून द्यावी, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.धारुरमध्ये विद्यार्थ्यांची पिळवणूकसध्या शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी लागणारे उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी हे दलाल विद्यार्थ्यांकडून १०० ते १५० रुपये घेत आहेत. एवढी रक्कम मोजूनही वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांच्यामधून संताप व्यक्त होत आहे. येथील कारभारही दलालांच्याच म्हणण्याप्रमाणेच चालतो, असे येथील शेतकऱ्यांमधून ऐकावयास मिळाले.केजमध्ये सर्वसामान्यांना अरेरावीची भाषाकेजमध्ये विविध कागदपत्रे काढण्यासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना येथील दलाल अरेरावीची भाषा वापरतात. मुद्रांकही वाढीव दराने घ्यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.याबाबत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले पाहणी करुन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. सर्वसामान्यांचे हाल होणार नाहीत, याची दक्षता घेऊ, असे ते म्हणाले. (वार्ताहर)