शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

तहसीलमध्ये झाले दलालच कारभारी !

By admin | Updated: August 11, 2014 00:17 IST

बीड: दिवसेंदिवस जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या तहसील कार्यालय परिसरात दलालांचा सुळसुळाट वाढतच आहे.

बीड: दिवसेंदिवस जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या तहसील कार्यालय परिसरात दलालांचा सुळसुळाट वाढतच आहे. यामध्ये वडवणी, केज, धारुर अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. दलालांच्या या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्यांचे मात्र हाल होत आहेत.सध्या शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शिष्यवृत्ती फॉर्मसाठी लागणारे उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थी आपल्या तहसील कार्यालयात गर्दी करताना दिसून येत आहेत. प्रमाणपत्र काढण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र येथील अधिकारी, कर्मचारी थेट दलालांकडे पाठवून त्यांच्यामार्फत स्वत:ची झोळी भरुन घेत असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे. तसेच ओळखीचे लोक पाहून त्यांना तात्काळ प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले जात आहेत तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ८ ते १५ दिवस ‘वेटींग’ वर रहावे लागत आहे. विशेष म्हणजे नियमापेक्षा अधिक पैसे घेऊन शेतकरी, विद्यार्थी, पालक यांची आर्थिक लूट केली जात आहे. या दलालांना वरिष्ठांचे अभय असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. धारुर, केज, वडवणी या तहसील कार्यालयामध्ये तर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हद्दपार केल्याचे दिसून येत आहे. वडवणीच्या ‘सेतू’ मध्ये दलालच हाकतात कारभारयेथील सेतू कार्यालयात दलालांचाच कारभार चालतो. यांच्या आदेशानंतरच सेतूमधील कर्मचारी विद्यार्थी, शेतकरी यांना कागदपत्रे देतात. सेतूमधील कर्मचारीही विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे सेतूमधील महत्वाची कागदपत्रे खाली-वर करण्याचा महाप्रतापही येथील दलाल करीत असतात, याकडे मात्र तहसीलदारांचे दुर्लक्ष असते. या दलालांना त्यांची जागा दाखवून द्यावी, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.धारुरमध्ये विद्यार्थ्यांची पिळवणूकसध्या शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी लागणारे उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी हे दलाल विद्यार्थ्यांकडून १०० ते १५० रुपये घेत आहेत. एवढी रक्कम मोजूनही वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांच्यामधून संताप व्यक्त होत आहे. येथील कारभारही दलालांच्याच म्हणण्याप्रमाणेच चालतो, असे येथील शेतकऱ्यांमधून ऐकावयास मिळाले.केजमध्ये सर्वसामान्यांना अरेरावीची भाषाकेजमध्ये विविध कागदपत्रे काढण्यासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना येथील दलाल अरेरावीची भाषा वापरतात. मुद्रांकही वाढीव दराने घ्यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.याबाबत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले पाहणी करुन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. सर्वसामान्यांचे हाल होणार नाहीत, याची दक्षता घेऊ, असे ते म्हणाले. (वार्ताहर)