शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

बँकेसह कारखान्याला उर्जितावस्था आणू

By admin | Updated: April 30, 2015 00:36 IST

उस्मानाबाद : जिल्हा बँकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बँक बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, राष्ट्रवादीकडून अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही

उस्मानाबाद : जिल्हा बँकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बँक बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, राष्ट्रवादीकडून अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने ही निवडणूक लादल्याचा आरोप करीत मतदारांनी काँग्रेस-सेनेला बहुमत दिल्यास जिल्हा बँकेसह तेरणा आणि तुळजाभवानी या दोन्ही कारखान्यांना संकटातून बाहेर काढू, असे प्रतिपादन भैैरवनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजी सावंत यांनी केले. बुधवारी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, बापूराव पाटील, सुनील चव्हाण, तर शिवसेनेचे माजी आ. ओम राजेनिंबाळकर, ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा प्रमुख सुधीर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती धनंजय सावंत आदींची उपस्थिती होती. तेरणा आणि तुळजाभवानी साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. या कारखान्यांचा व्यवहार ठप्प झाल्याने जिल्हा बँकही अडचणीत सापडली. बँकेला उर्जीतावस्थेत आणण्यासाठी हे दोन्ही कारखाने सुरू होणे आवश्यक असल्याचे सांगत यासाठीच आपण बँकेत १०० कोटींची ठेव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने ही निवडणूक लढावी लागत असल्याचे सांगत राष्ट्रवादीनेच ही निवडणूक लादल्याचा आरोप सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी ५, काँग्रेस ५ आणि सेना-भाजपा ५ जागा, असा फॉर्म्युला आम्ही सर्वपक्षिय बैठकीत ठेवला होता. मात्र, राष्ट्रवादीला आठ जागा हव्या होत्या. त्यामुळेच बँक बिनविरोध काढण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्याचेही सावंत यांनी सांगितले. या फॉर्म्युल्याला राष्ट्रवादीचे आ. राहुल मोटे तयार होते. त्यांनी यासाठी स्वत:चा फॉर्मही काढला होता, असा दावाही सावंत यांनी या पत्रकार परिषदेत केला. यावेळी शिवसेनेसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती. (जि. प्र.)