शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वधूवरासह वऱ्हाडी मंडळी थेट श्रमदानाला

By admin | Updated: May 11, 2017 23:32 IST

धारूर : पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धामध्ये तालुक्यातील आम्ला गावाने सहभाग घेतला आहे. या गावात ग्रामस्थांबरोबर वधु-वरासह वऱ्हाडी मंडळींनी रविवारी श्रमदान केले.

लोकमत न्यूज नेटवर्कधारूर : पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धामध्ये तालुक्यातील आम्ला गावाने सहभाग घेतला आहे. या गावात ग्रामस्थांबरोबर वधु-वरासह वऱ्हाडी मंडळींनी रविवारी श्रमदान केले. गावात जलसंधारणाची मोठया प्रमाणात कामे झाले आहेत.तालुक्यात बालाघाटाच्या डोंगरपायथ्याशी दोन हजाराच्या जवळपास लोकसंख्या असलेले आम्ला गाव आहे. गावाने वॉटर कप स्पधेत सहभाग घेतल्यानंतर ८ एप्रिलपासून श्रमदानाच्या कामाला झपाटून सुरुवात केली आहे. सकाळी सहा ते दहा वाजण्याच्या दरम्यान महिला पुरूष श्रमदानाचे काम करीत आहेत. मागील महिनाभरात श्रमदानातून डोंगर उताराला समतल चर, वृक्ष लगवडीसाठी खड्डे, माती बांध, बांध बंदिस्ती कामे श्रमदानातून करण्यात आले आहेत. डोंगर उतारावर खोलचर, नाला खोलीकरण आदी कामे यंत्राच्या सहाय्याने करण्यात आले आहेत.७ एप्रिल रोजी गावातील गंगाधर पांचाळ यांच्या मंदा या मुलीचे लग्न काळेवाडी येथील आशोक पांचाळ यांच्याबरोबर ठरले. लग्नाला तीन तासांचा अवधी होता. गावातील मोठया प्रमाणात महिला-पुरूष श्रमदानासाठी गेले होते. आपणही गावात काय करावे म्हणून वधु-वराने २० ते २५ वऱ्हाडी मंडळीसोबत घेवून ९ वाजता एकतास बांध बंदिस्तीच्या कामासाठी श्रमदान केले. एक तास श्रमदान केल्याने तर सर्व गावकऱ्यांसह वधू-वर १० वाजता गावात पोहचले. वधु-वरासह वऱ्हाडी मंडळीने श्रमदान केल्याने लग्नानंतर गावात चर्चेचा विषय सुरू होता.आम्ला ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व समजले आहे. श्रमदानाच्या कामासाठी सर्व हजर राहतात. गावातील पांचाळ कुटूंबाच्या घरी लग्न होते तर वधू-वरासह वऱ्हाडींनी श्रमदान केले. गाव पाणीदार करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला असून, यश मिळवणार असल्याचा आशावाद पं. स. सभापती आशालता सोळंके यांनी सांगितले.