शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रांजणगाव रस्त्याने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 18:45 IST

रांजणगाव ग्रामपंचायतीने गुरुवारी वाहतुकीला अडथळा ठरुन अपघातास कारणीभूत ठरणारे रस्त्यावरील टपरी व हातगाड्यांचे अतिक्रमण हटवून रहदारीसाठी रस्ता मोेकळा केला.

वाळूज महानगर : रांजणगाव ग्रामपंचायतीने गुरुवारी वाहतुकीला अडथळा ठरुन अपघातास कारणीभूत ठरणारे रस्त्यावरील टपरी व हातगाड्यांचे अतिक्रमण हटवून रहदारीसाठी रस्ता मोेकळा केला.

रांजणगावातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर हातगाडी व टपरी चालकांचे अतिक्रमण वाढले आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे गावातील मुख्य रस्त्यासह जोगेश्वरी, कमळापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत असून, पाच मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा-अर्धा तास वाहनांच्या गर्दीत ताटकळत थांबावे लागत आहे.

पादचा-यांना तर जीव मुठीत धरुन ये-जा करावी लागते. रस्त्यावरील अतिक्रमण नागरिकांची डोकेदुखी ठरत असल्याने ग्रामपंचायतीने गुरुवारी थेट अतिक्रमणधारकावर कारवाई करीत रस्त्यावरील हातगाडी व टपरीचे अतिक्रमण काढण्यात आले. तसेच यापुढे रस्त्यावर कोणीही हातगाडी व टपरी लावू नये, अशा सूचना व्यवसायिकांना देण्यात आल्या. यावेळी काही हाहतगाड्या जप्त करण्यात आल्या. ग्रामपंचायतीने रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्याने रस्ते रहदारीसाठी मोकळे झाले आहेत. मात्र ही परिस्थिती किती दिवस रहाते हे येणारा काळच ठरविल. तृर्तास तरी रस्त्याने मोकळा श्वास घेतला असल्याचे दिसून येते.

हातगाडी, टपरी व अन्य अतिक्रमणामुळे रांजणागवातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्तेही पुरते जाम झाले होते. रस्त्याचा श्वास कोंडल्याने मुख्य रस्त्यासह कमळापूर व जागेगेश्वरीकडे जाणाºया रस्त्यावर कायम वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत. ग्रामपंचायतीने रस्त्यावरील अतिक्रमण काढल्याने श्वास कोंडलेल्या रस्त्यांनी बºयाच दिवसांनी मोकळा श्वास घेतला आहे.

टॅग्स :WalujवाळूजEnchroachmentअतिक्रमण