शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित 
4
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
5
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
6
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
7
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
8
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
9
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
10
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
11
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
12
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
13
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
14
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
15
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
16
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
17
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
18
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
19
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
20
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
Daily Top 2Weekly Top 5

‘आघाडी’त बिघाडी; ‘घडी’ बसली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:00 IST

: बीड नगरपालिकेतील राजकारणाने आता वेगळेच स्वरूप प्राप्त केले आहे. एमआयएम स्वतंत्र गटाच्या पाच नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत विकासाच्या नावाखाली नगराध्यक्षांसोबत हात मिळविल्याने विस्कटलेली ‘घडी’ पुन्हा बसली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड नगरपालिकेतील राजकारणाने आता वेगळेच स्वरूप प्राप्त केले आहे. एमआयएम स्वतंत्र गटाच्या पाच नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत विकासाच्या नावाखाली नगराध्यक्षांसोबत हात मिळविल्याने विस्कटलेली ‘घडी’ पुन्हा बसली आहे. या बदलामुळे पालिकेतील राजकारणाचे वेगळे चित्र लवकरच स्पष्ट होईल.बीड नगरपालिकेत नगराध्यक्षांसह ५१ नगरसेवक आहेत. यामध्ये काकू-नाना आघाडीचे २०, राष्ट्रवादीचे १८, एमआयएम ९, शिवसेना २, तर भाजपच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. सत्ता स्थापनेसाठी आघाडीने एमआयएम स्वतंत्र गटाच्या सात नगरसेवकांची मदत घेतली. त्यानंतर उपनगराध्यक्षासह सभापतीपदे आपल्या ताब्यात घेतली; परंतु नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीमुळे आघाडीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. काकू-नाना आघाडीचे नेते संदीप क्षीरसागर यांचे बंधू उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांचा व काका तथा नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप होत होते. या दोघांच्या वादात शहराचा विकास खुंटल्याचा प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहेत.दरम्यान, मागील तीन दिवसांपासून पालिकेतील राजकारण वेगवेगळ्या चर्चेने ढवळून निघाले आहे. अखेर बुधवारी रात्री एमआयएम स्वतंत्र गटाच्या शेख मोहंमद खालेद, शेख जफर सुलताना बशीर, मोमीम अजरोद्दीन, अहेमद नफिसा खातून, रूखय्या बेगम नसीरोद्दीन या पाच नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी देऊन डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यासोबत विकासाच्या नावाखाली हात मिळवणी केली. या पाच नगरसेवकांनी त्यांचा स्वतंत्र गट स्थापन करून जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे.शिवसेनेने उर्दू फलक हटवलाबीड : जिल्हाधिकारी यांनी बोलावलेल्या विशेष सभेत ठराव घेऊन पालिकेच्या इमारतीवर नगर परिषद नावाचा उर्दू फलक काकू-नाना आघाडी व एमआयएमच्या नगरसेवकांनी लावला होता. त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली. बुधवारी जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी फलकाबद्दल संताप व्यक्त केला होता. गुरुवारी दुपारी शिवसेनेचे कार्यकर्ते नगरपालिकेत दाखल झाले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर यांच्या सोबत चर्चा करून फलक हटविण्याची मागणी केली. याच दरम्यान शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पालिका इमारतीच्या दुसºया मजल्यावर जाऊन, बल्ब, ट्यूबची तोडफोड करून इमारतीवरील फलक काढून टाकला.पालिकेतील राडा पाहून तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस उपनिरीक्षक घनशाम पाळवदे, सुलेमान सय्यद यांच्यासह फौजफाटा पालिकेत दाखल झाला. परिस्थिती पाहून सायंकाळपर्यंत दंगल नियंत्रण पथक बंदोबस्तासाठी तैनात होते. सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.याबाबत मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर म्हणाले, हा फलक पालिकेने लावलेला नव्हता; परंतु पालिका हद्दीत येऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी कारवाई केली जाणार आहे.शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप म्हणाले, राष्ट्रीय भाषा हिंदी आणि राज्यभाषा मराठी असताना अचानक उर्दू भाषा आली कुठून? आणि या भाषेचा फलक नगर परिषदेवर लावण्याचा अट्टहास का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. जगताप यांनी पालिकेतील राजकारणावर कडाडून टीका करीत मुख्याधिकाºयांना निवेदन दिले.