शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
4
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
5
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
6
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
7
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
8
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
9
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
11
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
12
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
13
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
14
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
15
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
16
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
17
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
18
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

‘आघाडी’त बिघाडी; ‘घडी’ बसली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:00 IST

: बीड नगरपालिकेतील राजकारणाने आता वेगळेच स्वरूप प्राप्त केले आहे. एमआयएम स्वतंत्र गटाच्या पाच नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत विकासाच्या नावाखाली नगराध्यक्षांसोबत हात मिळविल्याने विस्कटलेली ‘घडी’ पुन्हा बसली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड नगरपालिकेतील राजकारणाने आता वेगळेच स्वरूप प्राप्त केले आहे. एमआयएम स्वतंत्र गटाच्या पाच नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत विकासाच्या नावाखाली नगराध्यक्षांसोबत हात मिळविल्याने विस्कटलेली ‘घडी’ पुन्हा बसली आहे. या बदलामुळे पालिकेतील राजकारणाचे वेगळे चित्र लवकरच स्पष्ट होईल.बीड नगरपालिकेत नगराध्यक्षांसह ५१ नगरसेवक आहेत. यामध्ये काकू-नाना आघाडीचे २०, राष्ट्रवादीचे १८, एमआयएम ९, शिवसेना २, तर भाजपच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. सत्ता स्थापनेसाठी आघाडीने एमआयएम स्वतंत्र गटाच्या सात नगरसेवकांची मदत घेतली. त्यानंतर उपनगराध्यक्षासह सभापतीपदे आपल्या ताब्यात घेतली; परंतु नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीमुळे आघाडीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. काकू-नाना आघाडीचे नेते संदीप क्षीरसागर यांचे बंधू उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांचा व काका तथा नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप होत होते. या दोघांच्या वादात शहराचा विकास खुंटल्याचा प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहेत.दरम्यान, मागील तीन दिवसांपासून पालिकेतील राजकारण वेगवेगळ्या चर्चेने ढवळून निघाले आहे. अखेर बुधवारी रात्री एमआयएम स्वतंत्र गटाच्या शेख मोहंमद खालेद, शेख जफर सुलताना बशीर, मोमीम अजरोद्दीन, अहेमद नफिसा खातून, रूखय्या बेगम नसीरोद्दीन या पाच नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी देऊन डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यासोबत विकासाच्या नावाखाली हात मिळवणी केली. या पाच नगरसेवकांनी त्यांचा स्वतंत्र गट स्थापन करून जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे.शिवसेनेने उर्दू फलक हटवलाबीड : जिल्हाधिकारी यांनी बोलावलेल्या विशेष सभेत ठराव घेऊन पालिकेच्या इमारतीवर नगर परिषद नावाचा उर्दू फलक काकू-नाना आघाडी व एमआयएमच्या नगरसेवकांनी लावला होता. त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली. बुधवारी जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी फलकाबद्दल संताप व्यक्त केला होता. गुरुवारी दुपारी शिवसेनेचे कार्यकर्ते नगरपालिकेत दाखल झाले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर यांच्या सोबत चर्चा करून फलक हटविण्याची मागणी केली. याच दरम्यान शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पालिका इमारतीच्या दुसºया मजल्यावर जाऊन, बल्ब, ट्यूबची तोडफोड करून इमारतीवरील फलक काढून टाकला.पालिकेतील राडा पाहून तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस उपनिरीक्षक घनशाम पाळवदे, सुलेमान सय्यद यांच्यासह फौजफाटा पालिकेत दाखल झाला. परिस्थिती पाहून सायंकाळपर्यंत दंगल नियंत्रण पथक बंदोबस्तासाठी तैनात होते. सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.याबाबत मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर म्हणाले, हा फलक पालिकेने लावलेला नव्हता; परंतु पालिका हद्दीत येऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी कारवाई केली जाणार आहे.शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप म्हणाले, राष्ट्रीय भाषा हिंदी आणि राज्यभाषा मराठी असताना अचानक उर्दू भाषा आली कुठून? आणि या भाषेचा फलक नगर परिषदेवर लावण्याचा अट्टहास का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. जगताप यांनी पालिकेतील राजकारणावर कडाडून टीका करीत मुख्याधिकाºयांना निवेदन दिले.