शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

‘आघाडी’त बिघाडी; ‘घडी’ बसली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:00 IST

: बीड नगरपालिकेतील राजकारणाने आता वेगळेच स्वरूप प्राप्त केले आहे. एमआयएम स्वतंत्र गटाच्या पाच नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत विकासाच्या नावाखाली नगराध्यक्षांसोबत हात मिळविल्याने विस्कटलेली ‘घडी’ पुन्हा बसली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड नगरपालिकेतील राजकारणाने आता वेगळेच स्वरूप प्राप्त केले आहे. एमआयएम स्वतंत्र गटाच्या पाच नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत विकासाच्या नावाखाली नगराध्यक्षांसोबत हात मिळविल्याने विस्कटलेली ‘घडी’ पुन्हा बसली आहे. या बदलामुळे पालिकेतील राजकारणाचे वेगळे चित्र लवकरच स्पष्ट होईल.बीड नगरपालिकेत नगराध्यक्षांसह ५१ नगरसेवक आहेत. यामध्ये काकू-नाना आघाडीचे २०, राष्ट्रवादीचे १८, एमआयएम ९, शिवसेना २, तर भाजपच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. सत्ता स्थापनेसाठी आघाडीने एमआयएम स्वतंत्र गटाच्या सात नगरसेवकांची मदत घेतली. त्यानंतर उपनगराध्यक्षासह सभापतीपदे आपल्या ताब्यात घेतली; परंतु नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीमुळे आघाडीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. काकू-नाना आघाडीचे नेते संदीप क्षीरसागर यांचे बंधू उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांचा व काका तथा नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप होत होते. या दोघांच्या वादात शहराचा विकास खुंटल्याचा प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहेत.दरम्यान, मागील तीन दिवसांपासून पालिकेतील राजकारण वेगवेगळ्या चर्चेने ढवळून निघाले आहे. अखेर बुधवारी रात्री एमआयएम स्वतंत्र गटाच्या शेख मोहंमद खालेद, शेख जफर सुलताना बशीर, मोमीम अजरोद्दीन, अहेमद नफिसा खातून, रूखय्या बेगम नसीरोद्दीन या पाच नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी देऊन डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यासोबत विकासाच्या नावाखाली हात मिळवणी केली. या पाच नगरसेवकांनी त्यांचा स्वतंत्र गट स्थापन करून जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे.शिवसेनेने उर्दू फलक हटवलाबीड : जिल्हाधिकारी यांनी बोलावलेल्या विशेष सभेत ठराव घेऊन पालिकेच्या इमारतीवर नगर परिषद नावाचा उर्दू फलक काकू-नाना आघाडी व एमआयएमच्या नगरसेवकांनी लावला होता. त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली. बुधवारी जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी फलकाबद्दल संताप व्यक्त केला होता. गुरुवारी दुपारी शिवसेनेचे कार्यकर्ते नगरपालिकेत दाखल झाले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर यांच्या सोबत चर्चा करून फलक हटविण्याची मागणी केली. याच दरम्यान शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पालिका इमारतीच्या दुसºया मजल्यावर जाऊन, बल्ब, ट्यूबची तोडफोड करून इमारतीवरील फलक काढून टाकला.पालिकेतील राडा पाहून तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस उपनिरीक्षक घनशाम पाळवदे, सुलेमान सय्यद यांच्यासह फौजफाटा पालिकेत दाखल झाला. परिस्थिती पाहून सायंकाळपर्यंत दंगल नियंत्रण पथक बंदोबस्तासाठी तैनात होते. सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.याबाबत मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर म्हणाले, हा फलक पालिकेने लावलेला नव्हता; परंतु पालिका हद्दीत येऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी कारवाई केली जाणार आहे.शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप म्हणाले, राष्ट्रीय भाषा हिंदी आणि राज्यभाषा मराठी असताना अचानक उर्दू भाषा आली कुठून? आणि या भाषेचा फलक नगर परिषदेवर लावण्याचा अट्टहास का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. जगताप यांनी पालिकेतील राजकारणावर कडाडून टीका करीत मुख्याधिकाºयांना निवेदन दिले.