शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

बारदाना संपल्याने तूर खरेदीला ब्रेक

By admin | Updated: June 9, 2017 23:40 IST

हिंगोली :अवघ्या तीन दिवसात २ हजार ९१३ क्विंटल तूर घेतली. तर बारदाना संपल्याने तूर खरेदीला आता ब्रेक लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी-विक्री संघाच्या वतीने तूर खरेदी सुरु असून, २२ एप्रिलपर्यंत ६ हजार क्विंटल तुरीची नोंदणी झाली असता ४ जूनपर्यंत १४ हजार ४८४ क्विंटल तूर खरेदी झाली. तर नव्यानेच एसएमएसद्वारे मागून घेतलेल्याही तुरीची खरेदी सुरु केली असता, अवघ्या तीन दिवसात २ हजार ९१३ क्विंटल तूर घेतली. तर बारदाना संपल्याने तूर खरेदीला आता ब्रेक लागला आहे. नाफेडने तूर खरेदीचे मैदान सोडून पळ काढल्यानंतर खरेदी विक्री संघातर्फे तूर खरेदी करणे सुरु केले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. येथे ३० हजार क्विंटल तुरीची नोंदणी झालेली आहे. ६ जूनपासून नोंदणी केलेली तूर एसएमएसद्वारे बोलावण्यात येत आहे. काहींनी तर त्यापूर्वीच तूर आणून टाकली आहे. पहिल्याच दिवशी येथे १११७ क्विंटल, दुसऱ्या दिवशी ७ जूनला ११५८ आणि ८ जूनला ६३८ क्विंटल अशी एकूण २ हजार ९१३ क्विंटल तूर खरेदी केली आहे. शेतकरी मागील काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी करत असलेल्या आंदोलनामुळे शेतकरी तूर विक्रीस घेऊन येत नाहीत. परंतु काही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु होण्यापूर्वीच येथे विक्रीस तूर टाकली होती. आता एसमएसद्वारे ५० शेतकऱ्यांना तूर आणण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आता पर्यंत नोंदणी झालेल्या १०० शेतकऱ्यांनी तूर विक्रीस आणली आहे. मग हा प्रयोग नेमका किती दिवस यशस्वी होईल याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच दोन दिवसांपासून बारदाना संपल्यामुळे खरेदीसाठी अडचणीही येत आहेत. अशाही बिकट परिस्थितीत तूर विक्री होत असली तरी शेतकऱ्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत. खरेदीची माहिती नाफेडला कळविल्यानंतर ते खरेदी विक्री संघाच्या बँक खात्यावर टाकणार व नंतर शेतकऱ्यांना धनादेश दिला जाणार आहेत. पेरणी तोंडावर असून, पैसे मिळण्याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या तूर विक्री केंद्रावर ३१ मे पर्यंत नोंदणी झालेल्या ५० - ५० शेतकऱ्यांना एसएमसद्वारे बोलावले जात असून, त्यांची कागदपत्रे महसूल विभागाकडून तपासून घेतली जात आहेत. त्यामुळे सध्यातरी येथे तूर खरेदी सुरळीत सुरु आहे. त्यामुळे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची टप्प्या टप्प्याने तूर खरेदी केली जाणार असल्याचे सचिव डॉ. सय्यद जब्बार पटेल यांनी सांगितले.