शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

बारदाना संपल्याने तूर खरेदीला ब्रेक

By admin | Updated: June 9, 2017 23:40 IST

हिंगोली :अवघ्या तीन दिवसात २ हजार ९१३ क्विंटल तूर घेतली. तर बारदाना संपल्याने तूर खरेदीला आता ब्रेक लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी-विक्री संघाच्या वतीने तूर खरेदी सुरु असून, २२ एप्रिलपर्यंत ६ हजार क्विंटल तुरीची नोंदणी झाली असता ४ जूनपर्यंत १४ हजार ४८४ क्विंटल तूर खरेदी झाली. तर नव्यानेच एसएमएसद्वारे मागून घेतलेल्याही तुरीची खरेदी सुरु केली असता, अवघ्या तीन दिवसात २ हजार ९१३ क्विंटल तूर घेतली. तर बारदाना संपल्याने तूर खरेदीला आता ब्रेक लागला आहे. नाफेडने तूर खरेदीचे मैदान सोडून पळ काढल्यानंतर खरेदी विक्री संघातर्फे तूर खरेदी करणे सुरु केले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. येथे ३० हजार क्विंटल तुरीची नोंदणी झालेली आहे. ६ जूनपासून नोंदणी केलेली तूर एसएमएसद्वारे बोलावण्यात येत आहे. काहींनी तर त्यापूर्वीच तूर आणून टाकली आहे. पहिल्याच दिवशी येथे १११७ क्विंटल, दुसऱ्या दिवशी ७ जूनला ११५८ आणि ८ जूनला ६३८ क्विंटल अशी एकूण २ हजार ९१३ क्विंटल तूर खरेदी केली आहे. शेतकरी मागील काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी करत असलेल्या आंदोलनामुळे शेतकरी तूर विक्रीस घेऊन येत नाहीत. परंतु काही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु होण्यापूर्वीच येथे विक्रीस तूर टाकली होती. आता एसमएसद्वारे ५० शेतकऱ्यांना तूर आणण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आता पर्यंत नोंदणी झालेल्या १०० शेतकऱ्यांनी तूर विक्रीस आणली आहे. मग हा प्रयोग नेमका किती दिवस यशस्वी होईल याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच दोन दिवसांपासून बारदाना संपल्यामुळे खरेदीसाठी अडचणीही येत आहेत. अशाही बिकट परिस्थितीत तूर विक्री होत असली तरी शेतकऱ्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत. खरेदीची माहिती नाफेडला कळविल्यानंतर ते खरेदी विक्री संघाच्या बँक खात्यावर टाकणार व नंतर शेतकऱ्यांना धनादेश दिला जाणार आहेत. पेरणी तोंडावर असून, पैसे मिळण्याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या तूर विक्री केंद्रावर ३१ मे पर्यंत नोंदणी झालेल्या ५० - ५० शेतकऱ्यांना एसएमसद्वारे बोलावले जात असून, त्यांची कागदपत्रे महसूल विभागाकडून तपासून घेतली जात आहेत. त्यामुळे सध्यातरी येथे तूर खरेदी सुरळीत सुरु आहे. त्यामुळे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची टप्प्या टप्प्याने तूर खरेदी केली जाणार असल्याचे सचिव डॉ. सय्यद जब्बार पटेल यांनी सांगितले.