शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

बारदाना संपल्याने तूर खरेदीला ब्रेक

By admin | Updated: June 9, 2017 23:40 IST

हिंगोली :अवघ्या तीन दिवसात २ हजार ९१३ क्विंटल तूर घेतली. तर बारदाना संपल्याने तूर खरेदीला आता ब्रेक लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी-विक्री संघाच्या वतीने तूर खरेदी सुरु असून, २२ एप्रिलपर्यंत ६ हजार क्विंटल तुरीची नोंदणी झाली असता ४ जूनपर्यंत १४ हजार ४८४ क्विंटल तूर खरेदी झाली. तर नव्यानेच एसएमएसद्वारे मागून घेतलेल्याही तुरीची खरेदी सुरु केली असता, अवघ्या तीन दिवसात २ हजार ९१३ क्विंटल तूर घेतली. तर बारदाना संपल्याने तूर खरेदीला आता ब्रेक लागला आहे. नाफेडने तूर खरेदीचे मैदान सोडून पळ काढल्यानंतर खरेदी विक्री संघातर्फे तूर खरेदी करणे सुरु केले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. येथे ३० हजार क्विंटल तुरीची नोंदणी झालेली आहे. ६ जूनपासून नोंदणी केलेली तूर एसएमएसद्वारे बोलावण्यात येत आहे. काहींनी तर त्यापूर्वीच तूर आणून टाकली आहे. पहिल्याच दिवशी येथे १११७ क्विंटल, दुसऱ्या दिवशी ७ जूनला ११५८ आणि ८ जूनला ६३८ क्विंटल अशी एकूण २ हजार ९१३ क्विंटल तूर खरेदी केली आहे. शेतकरी मागील काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी करत असलेल्या आंदोलनामुळे शेतकरी तूर विक्रीस घेऊन येत नाहीत. परंतु काही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु होण्यापूर्वीच येथे विक्रीस तूर टाकली होती. आता एसमएसद्वारे ५० शेतकऱ्यांना तूर आणण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आता पर्यंत नोंदणी झालेल्या १०० शेतकऱ्यांनी तूर विक्रीस आणली आहे. मग हा प्रयोग नेमका किती दिवस यशस्वी होईल याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच दोन दिवसांपासून बारदाना संपल्यामुळे खरेदीसाठी अडचणीही येत आहेत. अशाही बिकट परिस्थितीत तूर विक्री होत असली तरी शेतकऱ्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत. खरेदीची माहिती नाफेडला कळविल्यानंतर ते खरेदी विक्री संघाच्या बँक खात्यावर टाकणार व नंतर शेतकऱ्यांना धनादेश दिला जाणार आहेत. पेरणी तोंडावर असून, पैसे मिळण्याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या तूर विक्री केंद्रावर ३१ मे पर्यंत नोंदणी झालेल्या ५० - ५० शेतकऱ्यांना एसएमसद्वारे बोलावले जात असून, त्यांची कागदपत्रे महसूल विभागाकडून तपासून घेतली जात आहेत. त्यामुळे सध्यातरी येथे तूर खरेदी सुरळीत सुरु आहे. त्यामुळे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची टप्प्या टप्प्याने तूर खरेदी केली जाणार असल्याचे सचिव डॉ. सय्यद जब्बार पटेल यांनी सांगितले.