शहरं
Join us  
Trending Stories
1
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
2
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
3
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
4
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
5
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
6
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
7
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
8
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
9
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
10
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
11
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
12
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
13
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
14
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
15
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
16
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
17
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
18
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
19
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
20
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव

‘त्या’ बेघरांच्या प्रश्नावर आठवडाभरात तोडगा

By admin | Updated: October 8, 2016 01:15 IST

औरंगाबाद : पहाडसिंगपुरा येथील रेणुकामातानगर आणि ताजमहाल कॉलनीतील रहिवाशांना हुसकावून तेथील जमीन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मूळ

औरंगाबाद : पहाडसिंगपुरा येथील रेणुकामातानगर आणि ताजमहाल कॉलनीतील रहिवाशांना हुसकावून तेथील जमीन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मूळ जमीन मालकाच्या ताब्यात देण्यात आली. या कारवाईमुळे भूखंड खरेदी करून तेथे घरे बांधून राहणारी १२६ कुटुंबे बेघर झाली आणि तेथे भूखंड खरेदी करणाऱ्या एकूण ४०० लोकांची फसवणूक झाली. लोकांच्या हिताचा विचार करून आठ दिवसांत तडजोड करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी दुपारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बीबीका मकबऱ्यामागील पहाडसिंगपुरा येथील जमिनीवर रेणुकामातानगर आणि ताजमहाल कॉलनी येथे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी ४०० लोकांनी भूखंड खरेदी केलेले आहेत. यापैकी १२६ भूखंडांवर घरे बांधून नागरिक राहत आहेत. या जमिनीविषयी माधवराव सोनवणे आणि कोरडे कुटुंबामध्ये न्यायालयात खटला सुरू होता. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याचा निकाल मूळ जमीनमालक माधवराव सोनवणे यांच्या बाजूने दिला. सुमारे ४० वर्षे हा खटला चालला. न्यायालयाच्या आदेशाने प्रशासनाने रेणुकामातानगर आणि ताजमहाल कॉलनी येथील रहिवाशांना घरे खाली करायला लावून संपूर्ण जमीन मूळ मालक सोनवणे यांच्या ताब्यात दिली. गतवर्षी ३१ आॅगस्ट रोजी ही कारवाई झाल्यानंतर तेथे अनधिकृत प्लॉटिंग टाक ल्याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवक राजू तनवाणी यांच्यासह काही लोकांना अटक केली होती. जमीन मूळ मालकाच्या ताब्यात दिल्यानंतरही तेथील रहिवासी आपली घरे सोडायला तयार नाहीत. ते पुन्हा तेथे जाऊन राहू लागले. यामुळे गेल्या महिन्यात पुन्हा तेथे कारवाई करण्यात आली होती.कष्टाने पै-पै जमा करून भूखंड खरेदी करून तेथे घरे बांधणाऱ्या गरीब नागरिकांची झालेली फसवणूकही नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर याविषयी सकारात्मक तोडगा काढावा, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी उभयतांना केले होते. ४दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या दालनात माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या उपस्थितीत खाजा मोईनोद्दीन, मूळ मालक माधवराव सोनवणे यांचे वारस प्रभाकर सोनवणे, संतोष सोनवणे, फसवणूक झालेले भूखंडधारक आणि बेघर झालेल्या नागरिकांचे प्रतिनिधी, नगरसेवक नंदकुमार घोडेले, नगरसेवक सचिन खैरे, माजी नगरसेवक गणू पांडे आदींची बैठक पार पडली.या बैठकीत बेघर लोकांच्या हितासाठी सकारात्मक तोडगा काढण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. आठ दिवसांत याबाबत तडजोड प्रस्तावासह पोलीस आयुक्तांना पुन्हा भेटण्याचे ठरल्याचे माजी आ. प्रदीप जैस्वाल यांनी सांगितले.