शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

बारदान्याअभावी तूर खरेदीला लागतोय ‘ब्रेक’ !

By admin | Updated: March 3, 2017 01:34 IST

कळंब : तालुक्यात दहा वर्षानंतर तुरीचे पीक बहरले असले तरी या तुरीला बाजारात कोणी विचारत नसल्याचे विदारक चित्र निर्माण झाले

कळंब : तालुक्यात दहा वर्षानंतर तुरीचे पीक बहरले असले तरी या तुरीला बाजारात कोणी विचारत नसल्याचे विदारक चित्र निर्माण झाले असून, तालुक्यात तुरीचे केवळ दोन शासकीय खरेदी केंद्रे सुरू असून या केंद्रांवरील खरेदीस बारदान्याच्या तुटवड्यामुळे वारंवार ब्रेक लागत आहे. यामुळे खुल्या बाजारात कोणी घेइना अन् शासकीय खरेदी केंद्रावर मेळ लागेना अशी विचित्र कोंडी शेतकऱ्यांची झाली आहे.कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हा प्रमुख हंगाम आहे. या हंगामातील तूर हे प्रमुख पीक आहे. तालुक्यात खरीप हंगाम २०१६ मध्ये जवळपास ८ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला होता. यावर्षी पाऊसकाळ चांगला झाल्याने व हवामान अनुकूल असल्याने पीक बऱ्यापैकी बहरले होते. यामुळे दहा वर्षात प्रथमच कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांना तुरीच्या उत्पन्नाचा हातभार लागला असल्याने आनंद व्यक्त झाला होता. कळंब तालुक्यातील व लगतच्या वाशी, केज तालुक्यातीलही असंख्य शेतकरी आपल्या तूर विक्रीस कळंब येथील कृषी बाजारास प्रथम प्राधान्य देतात. यानुसार यंदा बहुंताश शेतकऱ्यांचा या मार्केटला तूर घालण्यावर भर होता. यातच कळंब शहरात २ व ग्रामीण भागात ५ अशी तालुक्यात ७ शासकीय तूर खरेदी केंद्रे सुरू होऊन या ठिकाणी प्रति क्विंटल ५ हजार ५० रुपये दराने खरेदी सुरू झाली. कळंब बाजारात हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचा शासकीय खरेदी केंद्रावर माल घालण्यावर भर होता. यानुसार शासकीय खरेदी केंद्रावर मोठी गर्दी झाली होती. सर्व काही सुरळीत होत आहे असे चित्र दिसत असतानाच या ७ केंद्रांपैकी शेतकऱ्यांच्या कंपन्यानी सुरू केलेली इटकूर, खामसवाडी, गौर या पाच ठिकाणचे केंद्रे अचानक बंद पडली. याशिवाय चालू असलेल्या तालुका खरेदी-विक्री संघाच्या व खामसवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या केंद्राला बारदान्याचा तुटवडा ही समस्या जाणवू लागली. यामुळे खुल्या बाजारात कोणी विकत घेइना अन् शासकीय केंद्रावर मेळ लागेना, अशी विदारक स्थिती सध्या शेतकऱ्यांना जाणवत आहे.(वार्ताहर)