शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

ब्रम्हगव्हाण योजना १ हजार कोटींवर; शेती पिकेना, पाणी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:06 IST

२५ हजार हेक्टर सिंचनाचा दावा: जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना निधीअभावी घरघर विकास राऊत औरंगाबाद : पैठण तालुक्यातील ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन ...

२५ हजार हेक्टर सिंचनाचा दावा: जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना निधीअभावी घरघर

विकास राऊत

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचे काम मागील ११ वर्षांपासून सुरू आहे. ११ वर्षांत २२५ वरून १ हजार कोटी रुपयांवर ही योजना पोहोचली असून काम रखडल्यामुळे शेती आणि सिंचनाला घरघर लागली आहे. कंत्राटदारांनी संथगतीने काम केल्यामुळे योजनेची किंमत वाढत गेली आहे. योजनेचा टप्पा क्र.२ च्या सुधारित अंदाजपत्रकाला जलसंपदा विभागाकडून मान्यताच मिळालेली नाही, तर तिसऱ्या टप्प्यातील योजनेला अजून मुहूर्तच लागलेला नाही. या दोन्ही योजनांसोबतच फुलंब्रीतील वाकोद, सिल्लोडमधील शिवना-टाकळी, कन्नड तालुक्यातील रंगारी देवगांव या योजना देखील रेंगाळल्या आहेत.

ब्रम्हगव्हाण योजना टप्पा क्र.१ आणि २ मिळून १५ हजार आणि उर्वरित योजनांमधून १० हजार अशी सुमारे २५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येण्याचा दावा करणाऱ्या या योजना केव्हा होणार असा प्रश्न आहे. २५० हून शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनी, भूसंपादन प्रक्रिया होऊनही ब्रम्हगव्हाण योजनेच्या कामाची गती वाढली नाही. योजनेचे काम पूर्णत्वाला जाण्याऐवजी विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. सध्या योजनेचे काम अंबरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनीने साहस इंजिनिअर्सकडे दिले असले तरी सुधारित प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे काम कधी सुरू होणार असा प्रश्न आहे.

योजनेचे काम रखडल्यामुळे भूसंपादनाची किंमतही वाढली. ५ कोटींऐवजी २५० कोटींपर्यंत भूसंपादनाची रक्कम गेली आहे. अंबरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनीकडे ५५ कोटींचे काम होते. १० वर्षांत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने कामास उशीर झाल्याने कंत्राटदारांची चौकशी केली, मात्र पुढे काही झाले नाही. सध्या सुधारित अंदाजपत्रक नाशिक जलसंपदा विभागाच्या कात्रीत अडकले आहे.

शिवना-टाकळीचा प्रकल्प अधांतरी

हा प्रकल्प २०० ते २५० कोटींच्या आसपास आहे. त्यातून पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु पुढील काम मार्गी लागलेले नाही. कालव्याचे काम रखडलेले आहे.

वाकोदचे नवीन काम प्रस्तावित

नदीपात्रातून जोडणी देणे प्रस्तावित असून त्याचे अंदाजपत्रक केलेले नाही. हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे. स्थानिक पातळीवरच त्या प्रकल्पाचे काम रखडलेले आहे.

कानडगाव पुनर्वसन प्रकल्प रखडला

देवगांव-रंगारी येथील कानडगाव पुनर्वसन प्रकल्प आहे, त्याला १०० कोटींच्या आसपास खर्च लागणार आहे. कानडगाव पूर्ण नव्याने वसविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सिंचन योजना आणि खर्च

ब्रम्हगव्हाण टप्पा क्र.२- १ हजार कोटींवर

ब्रम्हगव्हाण टप्पा क्र-३- कायगांव ते लासूर १ हजार कोटी

फुलंब्री वाकोद- अद्याप काही तयारी नाही

शिवना टाकळी- २५० कोटींवर

रंगारी देवगांव - १०० कोटींवर

कार्यकारी अभियंत्यांची माहिती अशी

डिव्हीजन क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांनी सांगितले, ब्रम्हगव्हाण योजनेची सुधारित अंदाजपत्रकीय किंमत वाढली आहे. भूसंपादनास देखील रक्कम लागणार आहे. पहिल्या टप्प्यात पाणी देण्यास सुरू केले आहे. मुख्य कालव्याचे काम झाले असून वितरण केले जात आहे. जशी रक्कम उपलब्ध होईल, तसे काम गतीने पुढे जाईल.

योजनेचे पूर्णत: वाटोळे होत आहे

ब्रम्हगव्हाण योजनेचे पूर्णंत: वाटोळे होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील योजनेबाबत अनिश्चितता आहे. पहिल्या टप्प्यातील योजनेचे कामही गुणवत्तापूर्ण झालेले नाही. या प्रकल्पासाठी अनेक शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. पाणी मिळेल, शेती फुलेल या उद्देशाने तयार केलेली योजना सध्या अधांतरीच आहे, असे म्हणावे लागेल.

जयाजी सूर्यवंशी, शेतकरी