शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

‘दानवे हटाव’वर आज मंथन

By admin | Updated: September 12, 2016 23:23 IST

ग्रामीण जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात सुरू असलेल्या वादावर १३ सप्टेंबर रोजी सकाळी शिवसेना भवन, मुंबई येथे खा. अनिल देसाई यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे.

औरंगाबाद : शिवसेनेचे पश्चिम मतदारसंघाचे आ. संजय शिरसाट, माजी आ. प्रदीप जैस्वाल, अण्णासाहेब माने, ग्रामीण जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात सुरू असलेल्या वादावर १३ सप्टेंबर रोजी सकाळी शिवसेना भवन, मुंबई येथे खा. अनिल देसाई यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. बैठकीला जाण्यासाठी सेनेतील दोन्ही गट सोमवारी मुंबईला रवाना झाले. आ. शिरसाट यांच्यासह जैस्वाल, माने, त्रिवेदी यांनी दानवे यांच्यावर पक्ष विक्रीचा आरोप केल्यानंतर पक्षाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परदेशात असून, त्यांच्या आदेशाने खा.देसाई हे बैठक घेऊन या प्रकरणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. ठाकरे परदेशातून येईपर्यंत हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ठाकरे आल्यानंतर पुन्हा याप्रकरणी बैठक होणार असल्याचे सेनेच्या गोटातून सांगण्यात आले. पालकमंत्री रामदास कदम, खा.चंद्रकांत खैरे, खा.देसाई, आ.शिरसाट, दानवे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, माजी आ.जैस्वाल, माने, त्रिवेदी यांची बैठकीला उपस्थिती असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाद शांत करावा लागेल. हे प्रकरण पक्षाने गांभीर्याने घेतले आहे. ठाकरे दौऱ्यावरून परत येईपर्यंत सर्वांना थोपवावे लागेल. त्यांनी खा.देसाई यांना मध्यस्थी करण्यास सांगितले आहे. घोसाळकर आणि खा.खैरे यांची भूमिका बॅलन्स आहे. सकारात्मक चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. पक्षात कुणीही ‘अमरपट्टा’ बांधून आलेले नाही. त्यामुळे बैठकीत योग्य तोच निर्णय होईल. नेतृत्वाने नि:पक्षपाती काम केले पाहिजे. ते होत नसल्यामुळे भविष्यात कधी तरी होणारा गदारोळ आताच झाला आहे. यामध्ये दोष कुणालाही द्यायचा नाही. पक्षाच्या मुळावर जर कुणी घाव घालत असेल तर पक्ष गप्प बसणार नाही.