शहरं
Join us  
Trending Stories
1
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
2
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
3
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
4
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
5
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
6
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
7
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
8
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
9
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
10
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
11
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
12
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
13
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
14
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
15
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
16
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
17
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
18
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
19
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
20
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता

‘दानवे हटाव’वर आज मंथन

By admin | Updated: September 12, 2016 23:23 IST

ग्रामीण जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात सुरू असलेल्या वादावर १३ सप्टेंबर रोजी सकाळी शिवसेना भवन, मुंबई येथे खा. अनिल देसाई यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे.

औरंगाबाद : शिवसेनेचे पश्चिम मतदारसंघाचे आ. संजय शिरसाट, माजी आ. प्रदीप जैस्वाल, अण्णासाहेब माने, ग्रामीण जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात सुरू असलेल्या वादावर १३ सप्टेंबर रोजी सकाळी शिवसेना भवन, मुंबई येथे खा. अनिल देसाई यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. बैठकीला जाण्यासाठी सेनेतील दोन्ही गट सोमवारी मुंबईला रवाना झाले. आ. शिरसाट यांच्यासह जैस्वाल, माने, त्रिवेदी यांनी दानवे यांच्यावर पक्ष विक्रीचा आरोप केल्यानंतर पक्षाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परदेशात असून, त्यांच्या आदेशाने खा.देसाई हे बैठक घेऊन या प्रकरणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. ठाकरे परदेशातून येईपर्यंत हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ठाकरे आल्यानंतर पुन्हा याप्रकरणी बैठक होणार असल्याचे सेनेच्या गोटातून सांगण्यात आले. पालकमंत्री रामदास कदम, खा.चंद्रकांत खैरे, खा.देसाई, आ.शिरसाट, दानवे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, माजी आ.जैस्वाल, माने, त्रिवेदी यांची बैठकीला उपस्थिती असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाद शांत करावा लागेल. हे प्रकरण पक्षाने गांभीर्याने घेतले आहे. ठाकरे दौऱ्यावरून परत येईपर्यंत सर्वांना थोपवावे लागेल. त्यांनी खा.देसाई यांना मध्यस्थी करण्यास सांगितले आहे. घोसाळकर आणि खा.खैरे यांची भूमिका बॅलन्स आहे. सकारात्मक चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. पक्षात कुणीही ‘अमरपट्टा’ बांधून आलेले नाही. त्यामुळे बैठकीत योग्य तोच निर्णय होईल. नेतृत्वाने नि:पक्षपाती काम केले पाहिजे. ते होत नसल्यामुळे भविष्यात कधी तरी होणारा गदारोळ आताच झाला आहे. यामध्ये दोष कुणालाही द्यायचा नाही. पक्षाच्या मुळावर जर कुणी घाव घालत असेल तर पक्ष गप्प बसणार नाही.