शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

ब्राह्मण समाज करणार ताम्हण-पळी बजाव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:02 IST

औरंगाबाद : माफक व न्याय मागण्यांसाठी ब्राह्मण समाजाकडून अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. मात्र, सरकारचे या मागण्यांकडे दुर्लक्ष होत ...

औरंगाबाद : माफक व न्याय मागण्यांसाठी ब्राह्मण समाजाकडून अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. मात्र, सरकारचे या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाला जागे करण्यासाठी ब्राह्मण समाज संघर्ष समिती दिनांक २२ जानेवारी रोजी विभागीय आयुक्तालयासमोर ताम्हण-पळी बजाव आंदोलन करणार आहे.

यामध्ये शहरातील सर्व ब्राह्मण संघटनांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी समितीचे समन्वयक दीपक रणनवरे, विजया कुलकर्णी, संतोष व्यवहारे, प्रमोद भालेराव, विजया अवस्थी आदी उपस्थित होते.

तत्कालिन सरकारने आमच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ब्राह्मण समाजाची अवस्था फार विचित्र झाली असून, कोणत्याही राजकीय पक्षाचे आमच्याकडे लक्ष नाही. इतर पक्ष आम्हाला आम्ही भाजपचे मतदार आहोत, असे समजून दुर्लक्ष करत आहेत, तर भाजपही आम्हाला गृहित धरतो आहे. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय नेत्यांना आम्ही मागण्यांसंदर्भात निवेदने दिली असून, वारंवार पाठपुरावाही केला. मात्र, याचा काहीच परिणाम होत नसल्याने राज्यव्यापी आंदोलन करत असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. यानंतरही शासनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर पुढील आंदोलन अधिक तीव्र असेल, असा इशाराही समितीने दिला.

चौकट :

ब्राह्मण समाजाच्या मागण्या-

समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करण्यात यावे, समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून महामंडळासाठी १ हजार कोटी रूपयांची तरतूद करावी, प्रत्येक जिल्ह्यात मुला- मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करावे, केजी टू पीजी शिक्षण मोफत करावे, ब्राह्मण समाजाविषयी बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींविरूद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार अथवा तत्सम कायदा करून कारवाई करावी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, पुुरोहित समाजाला मासिक ५ हजार रूपये मानधन सुरू करावे, ब्राह्मण समाजाच्या कुळात गेलेल्या जमिनी परत देण्यात याव्यात.