शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

ब्राह्मण समाज करणार ताम्हण-पळी बजाव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:02 IST

औरंगाबाद : माफक व न्याय मागण्यांसाठी ब्राह्मण समाजाकडून अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. मात्र, सरकारचे या मागण्यांकडे दुर्लक्ष होत ...

औरंगाबाद : माफक व न्याय मागण्यांसाठी ब्राह्मण समाजाकडून अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. मात्र, सरकारचे या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाला जागे करण्यासाठी ब्राह्मण समाज संघर्ष समिती दिनांक २२ जानेवारी रोजी विभागीय आयुक्तालयासमोर ताम्हण-पळी बजाव आंदोलन करणार आहे.

यामध्ये शहरातील सर्व ब्राह्मण संघटनांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी समितीचे समन्वयक दीपक रणनवरे, विजया कुलकर्णी, संतोष व्यवहारे, प्रमोद भालेराव, विजया अवस्थी आदी उपस्थित होते.

तत्कालिन सरकारने आमच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ब्राह्मण समाजाची अवस्था फार विचित्र झाली असून, कोणत्याही राजकीय पक्षाचे आमच्याकडे लक्ष नाही. इतर पक्ष आम्हाला आम्ही भाजपचे मतदार आहोत, असे समजून दुर्लक्ष करत आहेत, तर भाजपही आम्हाला गृहित धरतो आहे. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय नेत्यांना आम्ही मागण्यांसंदर्भात निवेदने दिली असून, वारंवार पाठपुरावाही केला. मात्र, याचा काहीच परिणाम होत नसल्याने राज्यव्यापी आंदोलन करत असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. यानंतरही शासनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर पुढील आंदोलन अधिक तीव्र असेल, असा इशाराही समितीने दिला.

चौकट :

ब्राह्मण समाजाच्या मागण्या-

समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करण्यात यावे, समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून महामंडळासाठी १ हजार कोटी रूपयांची तरतूद करावी, प्रत्येक जिल्ह्यात मुला- मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करावे, केजी टू पीजी शिक्षण मोफत करावे, ब्राह्मण समाजाविषयी बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींविरूद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार अथवा तत्सम कायदा करून कारवाई करावी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, पुुरोहित समाजाला मासिक ५ हजार रूपये मानधन सुरू करावे, ब्राह्मण समाजाच्या कुळात गेलेल्या जमिनी परत देण्यात याव्यात.