शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

ब्राह्मण समाज करणार ताम्हण-पळी बजाव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:02 IST

औरंगाबाद : माफक व न्याय मागण्यांसाठी ब्राह्मण समाजाकडून अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. मात्र, सरकारचे या मागण्यांकडे दुर्लक्ष होत ...

औरंगाबाद : माफक व न्याय मागण्यांसाठी ब्राह्मण समाजाकडून अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. मात्र, सरकारचे या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाला जागे करण्यासाठी ब्राह्मण समाज संघर्ष समिती दिनांक २२ जानेवारी रोजी विभागीय आयुक्तालयासमोर ताम्हण-पळी बजाव आंदोलन करणार आहे.

यामध्ये शहरातील सर्व ब्राह्मण संघटनांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी समितीचे समन्वयक दीपक रणनवरे, विजया कुलकर्णी, संतोष व्यवहारे, प्रमोद भालेराव, विजया अवस्थी आदी उपस्थित होते.

तत्कालिन सरकारने आमच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ब्राह्मण समाजाची अवस्था फार विचित्र झाली असून, कोणत्याही राजकीय पक्षाचे आमच्याकडे लक्ष नाही. इतर पक्ष आम्हाला आम्ही भाजपचे मतदार आहोत, असे समजून दुर्लक्ष करत आहेत, तर भाजपही आम्हाला गृहित धरतो आहे. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय नेत्यांना आम्ही मागण्यांसंदर्भात निवेदने दिली असून, वारंवार पाठपुरावाही केला. मात्र, याचा काहीच परिणाम होत नसल्याने राज्यव्यापी आंदोलन करत असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. यानंतरही शासनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर पुढील आंदोलन अधिक तीव्र असेल, असा इशाराही समितीने दिला.

चौकट :

ब्राह्मण समाजाच्या मागण्या-

समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करण्यात यावे, समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून महामंडळासाठी १ हजार कोटी रूपयांची तरतूद करावी, प्रत्येक जिल्ह्यात मुला- मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करावे, केजी टू पीजी शिक्षण मोफत करावे, ब्राह्मण समाजाविषयी बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींविरूद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार अथवा तत्सम कायदा करून कारवाई करावी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, पुुरोहित समाजाला मासिक ५ हजार रूपये मानधन सुरू करावे, ब्राह्मण समाजाच्या कुळात गेलेल्या जमिनी परत देण्यात याव्यात.