शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

बिंदुसरा तळाला

By admin | Updated: November 3, 2014 00:40 IST

सोमनाथ खताळ, बीड बीडकरांनो पाणी सांडताय.. थांबा ! ज्या धरणातून आपल्याला पाणी पुरवठा केला जातोय त्याची पाणी पातळी शुन्याच्या खाली गेली आहे. केवळ पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी आता बिंदुसरा धरणात

सोमनाथ खताळ, बीडबीडकरांनो पाणी सांडताय.. थांबा ! ज्या धरणातून आपल्याला पाणी पुरवठा केला जातोय त्याची पाणी पातळी शुन्याच्या खाली गेली आहे. केवळ पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी आता बिंदुसरा धरणात शिल्लक आहे. त्यामुळे बीड शहरावर पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहिले आहे. पालीकेच्या वतीने शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी माजलगाव धरणातून पाणी घेण्यात आले आहे.बीड शहराला पाली येथील बिंदुसरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र या धरणात सध्या केवळ ०.२९ दलघमी पाणी शिल्लक आहे. हे पाणी केवळ पंधरा दिवस पुरेल एवढेच असून पालीकेतील पाणी पुरवठा विभागाने हे पाणी संपण्याची तारीख १५ नोव्हेंबर जाहिर केली आहे. त्यामुळे यावर्षी बीड शहराला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. गतवर्षी अपेक्षेप्रमाणे पाऊस झाल्यामुळे आणि बिंदुसरा धरणातील गाळ काढल्यामुळे धरणात भरपुर प्रमाणात पाणीसाठा होता. उन्हाळ्यात शेवटी शेवटी शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. मात्र यावर्षी हिवाळा सुरू होतो ना होतो तोच पाणीटंचाई जाणवू लागली आहे.सध्या बीडशहराला चार ते पाच दिवसाला दीड तास पाणी सोडण्यात येत असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता एम.एस.वाघ यांनी सांगितले. प्रत्यक्षात अनेक भागात आजही पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी ऐकावयास मिळत आहेत. पाणीसाठा पाहता बीडकरांनीच आता पाणी बचत करण्याची अवश्यकता असल्याचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले.पाणी आरक्षीत ठेवण्याची मागणीयावर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी माजलगाव धरणात विद्यूत पंप टाकले आहेत, ते शेतकरी शेतीपंपाद्वारे सर्रास पाणी उपसा करू लागले आहेत. असे झाले तर पाणी लवकर संपू शकते, त्यासाठी पाणी आरक्षित ठेवण्याची मागणी बीड, माजलगावातील नागरिकांमधून होत आहे.बिंदुसरा धरण आटल्यामुळे माजलगावच्या धरणातून बीड शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. मात्र या धरणातही अल्प पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले. ४या धरणातून बीड शहरास माजलगाव शहर आणि तालुक्याला पाणीपुरवठा केला जात असल्याने हे पाणी संपण्याची भीतीही यावेळी अभियंता वाघ यांनी व्यक्त केली.धरणातून पाणी उपसा४पाणी टंचाईची परिस्थिती दिसून येत असतानाही माजलगाव धरणातून सर्रास शेतीसाठी पाणी उपसा केला जात आहे. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा अरोप होत आहे. ४शेतीसाठी पाणी उपसा चालु राहिला तर धरणातील पाणी अवघ्या महिन्यातच संपू शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे़