शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

बिंदुसरा तळाला

By admin | Updated: November 3, 2014 00:40 IST

सोमनाथ खताळ, बीड बीडकरांनो पाणी सांडताय.. थांबा ! ज्या धरणातून आपल्याला पाणी पुरवठा केला जातोय त्याची पाणी पातळी शुन्याच्या खाली गेली आहे. केवळ पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी आता बिंदुसरा धरणात

सोमनाथ खताळ, बीडबीडकरांनो पाणी सांडताय.. थांबा ! ज्या धरणातून आपल्याला पाणी पुरवठा केला जातोय त्याची पाणी पातळी शुन्याच्या खाली गेली आहे. केवळ पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी आता बिंदुसरा धरणात शिल्लक आहे. त्यामुळे बीड शहरावर पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहिले आहे. पालीकेच्या वतीने शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी माजलगाव धरणातून पाणी घेण्यात आले आहे.बीड शहराला पाली येथील बिंदुसरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र या धरणात सध्या केवळ ०.२९ दलघमी पाणी शिल्लक आहे. हे पाणी केवळ पंधरा दिवस पुरेल एवढेच असून पालीकेतील पाणी पुरवठा विभागाने हे पाणी संपण्याची तारीख १५ नोव्हेंबर जाहिर केली आहे. त्यामुळे यावर्षी बीड शहराला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. गतवर्षी अपेक्षेप्रमाणे पाऊस झाल्यामुळे आणि बिंदुसरा धरणातील गाळ काढल्यामुळे धरणात भरपुर प्रमाणात पाणीसाठा होता. उन्हाळ्यात शेवटी शेवटी शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. मात्र यावर्षी हिवाळा सुरू होतो ना होतो तोच पाणीटंचाई जाणवू लागली आहे.सध्या बीडशहराला चार ते पाच दिवसाला दीड तास पाणी सोडण्यात येत असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता एम.एस.वाघ यांनी सांगितले. प्रत्यक्षात अनेक भागात आजही पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी ऐकावयास मिळत आहेत. पाणीसाठा पाहता बीडकरांनीच आता पाणी बचत करण्याची अवश्यकता असल्याचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले.पाणी आरक्षीत ठेवण्याची मागणीयावर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी माजलगाव धरणात विद्यूत पंप टाकले आहेत, ते शेतकरी शेतीपंपाद्वारे सर्रास पाणी उपसा करू लागले आहेत. असे झाले तर पाणी लवकर संपू शकते, त्यासाठी पाणी आरक्षित ठेवण्याची मागणी बीड, माजलगावातील नागरिकांमधून होत आहे.बिंदुसरा धरण आटल्यामुळे माजलगावच्या धरणातून बीड शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. मात्र या धरणातही अल्प पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले. ४या धरणातून बीड शहरास माजलगाव शहर आणि तालुक्याला पाणीपुरवठा केला जात असल्याने हे पाणी संपण्याची भीतीही यावेळी अभियंता वाघ यांनी व्यक्त केली.धरणातून पाणी उपसा४पाणी टंचाईची परिस्थिती दिसून येत असतानाही माजलगाव धरणातून सर्रास शेतीसाठी पाणी उपसा केला जात आहे. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा अरोप होत आहे. ४शेतीसाठी पाणी उपसा चालु राहिला तर धरणातील पाणी अवघ्या महिन्यातच संपू शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे़