शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

घाटीच्या दारातच दोघांचे गेले प्राण

By admin | Updated: September 26, 2016 00:38 IST

औरंगाबाद : मराठवाड्यासह शेजारील जिल्ह्यांतील रुग्णांचे आशास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयाच्या आवारातच बेवारस अवस्थेत राहणाऱ्या दोन अनोळखी रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाला.

औरंगाबाद : मराठवाड्यासह शेजारील जिल्ह्यांतील रुग्णांचे आशास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयाच्या आवारातच बेवारस अवस्थेत राहणाऱ्या दोन अनोळखी रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. घाटीच्या वाहन पार्किंगमध्ये मदतीच्या अपेक्षेने पडून राहणाऱ्या दोन रुग्णांनी अनुक्रमे २४ आणि २५ सप्टेंबर रोजी प्राण सोडले. या दोन्ही मृतांची ओळख पटविण्यासाठी त्यांचे मृतदेह पोलिसांनी घाटीतील शवागारात ठेवले आहेत.२५ सप्टेंबर रोजी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास घाटीतील सुरक्षारक्षक पी. एस. खरात यांना अंदाजे ४० वर्षांचा अनोळखी इसम पार्किंगमध्ये बेवारस अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने त्यास घाटीतील अपघात विभागात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताची उंची ५ फूट, रंग सावळा, अंगात खाकी शर्ट आणि काळी पॅण्ट, चेहरा गोल, दाढी वाढलेली, मध्यम बांधा असे वर्णन आहे. तर २४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास बाह्यरुग्ण विभागासमोरील वाहन पार्किंगमध्ये बेवारस अवस्थेत सापडलेल्या अनोळखी इसमासही अपघात विभागातील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृताचे अंदाजे वय ५० वर्षे असून, उंची ५ फूट २ इंच, चेहरा लांबट, दाढी वाढलेली आहे. डोक्याला रुमाल बांधलेला, हिरवा शर्ट आणि पांढरे धोतर त्यांनी घातलेले आहे. या वर्णनाच्या व्यक्तीला ओळखणाऱ्यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोहेकॉ. एस. आर. पवार यांनी केले आहे.मृताचे नातेवाईक सापडेनातघाटीतील सुरक्षारक्षकांना १४ आॅगस्ट रोजी अपघात विभागातील फुटपाथवर ६५ वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळला होता. त्यांनी या घटनेची माहिती अपघात विभागातील डॉक्टर आणि बेगमपुरा पोलिसांना कळविली. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ओळख पटविण्यासाठी मृताचे शव घाटीतील शवागृहात ठेवले. या घटनेला ४० दिवस उलटले तरी मृताच्या नातेवाईकांचा शोध लागलेला नाही. मृताची उंची पाच फूट, रंग सावळा, चेहरा लांबट, अंगावर पांढरा शर्ट आणि पांढरी पॅण्ट असे वर्णन आहे.आणखी पाच जण मृत्यूच्या प्रतीक्षेतघाटीच्या प्रवेशद्वारालगत असलेल्या वाहन पार्किंगमध्ये खाण्या-पिण्याअभावी आणि आजाराने ग्रासलेले पाच ते सहा जण पडून आहेत. घाटीतील निष्णात डॉक्टरांसह शहरातील तथाकथित समाजसेवक याच मार्गावरून घाटीत ये-जा करतात. मात्र या बेवारस गरीब रुग्णांकडे ते ढुंकूनही पाहत नाहीत. या रुग्णांच्या रक्ताच्या लोकांनीच त्यांना नाकारलेले असल्याने ही मंडळी समाजातील अन्य लोकांकडूनही अपेक्षा ठेवत नाहीत. मात्र उपचार करण्याचा वसा घेतलेल्या डॉक्टर आणि नर्सेस यांच्याकडूनही का दुर्लक्ष व्हावे?