शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

घाटीच्या दारातच दोघांचे गेले प्राण

By admin | Updated: September 26, 2016 00:38 IST

औरंगाबाद : मराठवाड्यासह शेजारील जिल्ह्यांतील रुग्णांचे आशास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयाच्या आवारातच बेवारस अवस्थेत राहणाऱ्या दोन अनोळखी रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाला.

औरंगाबाद : मराठवाड्यासह शेजारील जिल्ह्यांतील रुग्णांचे आशास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयाच्या आवारातच बेवारस अवस्थेत राहणाऱ्या दोन अनोळखी रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. घाटीच्या वाहन पार्किंगमध्ये मदतीच्या अपेक्षेने पडून राहणाऱ्या दोन रुग्णांनी अनुक्रमे २४ आणि २५ सप्टेंबर रोजी प्राण सोडले. या दोन्ही मृतांची ओळख पटविण्यासाठी त्यांचे मृतदेह पोलिसांनी घाटीतील शवागारात ठेवले आहेत.२५ सप्टेंबर रोजी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास घाटीतील सुरक्षारक्षक पी. एस. खरात यांना अंदाजे ४० वर्षांचा अनोळखी इसम पार्किंगमध्ये बेवारस अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने त्यास घाटीतील अपघात विभागात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताची उंची ५ फूट, रंग सावळा, अंगात खाकी शर्ट आणि काळी पॅण्ट, चेहरा गोल, दाढी वाढलेली, मध्यम बांधा असे वर्णन आहे. तर २४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास बाह्यरुग्ण विभागासमोरील वाहन पार्किंगमध्ये बेवारस अवस्थेत सापडलेल्या अनोळखी इसमासही अपघात विभागातील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृताचे अंदाजे वय ५० वर्षे असून, उंची ५ फूट २ इंच, चेहरा लांबट, दाढी वाढलेली आहे. डोक्याला रुमाल बांधलेला, हिरवा शर्ट आणि पांढरे धोतर त्यांनी घातलेले आहे. या वर्णनाच्या व्यक्तीला ओळखणाऱ्यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोहेकॉ. एस. आर. पवार यांनी केले आहे.मृताचे नातेवाईक सापडेनातघाटीतील सुरक्षारक्षकांना १४ आॅगस्ट रोजी अपघात विभागातील फुटपाथवर ६५ वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळला होता. त्यांनी या घटनेची माहिती अपघात विभागातील डॉक्टर आणि बेगमपुरा पोलिसांना कळविली. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ओळख पटविण्यासाठी मृताचे शव घाटीतील शवागृहात ठेवले. या घटनेला ४० दिवस उलटले तरी मृताच्या नातेवाईकांचा शोध लागलेला नाही. मृताची उंची पाच फूट, रंग सावळा, चेहरा लांबट, अंगावर पांढरा शर्ट आणि पांढरी पॅण्ट असे वर्णन आहे.आणखी पाच जण मृत्यूच्या प्रतीक्षेतघाटीच्या प्रवेशद्वारालगत असलेल्या वाहन पार्किंगमध्ये खाण्या-पिण्याअभावी आणि आजाराने ग्रासलेले पाच ते सहा जण पडून आहेत. घाटीतील निष्णात डॉक्टरांसह शहरातील तथाकथित समाजसेवक याच मार्गावरून घाटीत ये-जा करतात. मात्र या बेवारस गरीब रुग्णांकडे ते ढुंकूनही पाहत नाहीत. या रुग्णांच्या रक्ताच्या लोकांनीच त्यांना नाकारलेले असल्याने ही मंडळी समाजातील अन्य लोकांकडूनही अपेक्षा ठेवत नाहीत. मात्र उपचार करण्याचा वसा घेतलेल्या डॉक्टर आणि नर्सेस यांच्याकडूनही का दुर्लक्ष व्हावे?