शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

घाटीच्या दारातच दोघांचे गेले प्राण

By admin | Updated: September 26, 2016 00:38 IST

औरंगाबाद : मराठवाड्यासह शेजारील जिल्ह्यांतील रुग्णांचे आशास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयाच्या आवारातच बेवारस अवस्थेत राहणाऱ्या दोन अनोळखी रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाला.

औरंगाबाद : मराठवाड्यासह शेजारील जिल्ह्यांतील रुग्णांचे आशास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयाच्या आवारातच बेवारस अवस्थेत राहणाऱ्या दोन अनोळखी रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. घाटीच्या वाहन पार्किंगमध्ये मदतीच्या अपेक्षेने पडून राहणाऱ्या दोन रुग्णांनी अनुक्रमे २४ आणि २५ सप्टेंबर रोजी प्राण सोडले. या दोन्ही मृतांची ओळख पटविण्यासाठी त्यांचे मृतदेह पोलिसांनी घाटीतील शवागारात ठेवले आहेत.२५ सप्टेंबर रोजी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास घाटीतील सुरक्षारक्षक पी. एस. खरात यांना अंदाजे ४० वर्षांचा अनोळखी इसम पार्किंगमध्ये बेवारस अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने त्यास घाटीतील अपघात विभागात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताची उंची ५ फूट, रंग सावळा, अंगात खाकी शर्ट आणि काळी पॅण्ट, चेहरा गोल, दाढी वाढलेली, मध्यम बांधा असे वर्णन आहे. तर २४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास बाह्यरुग्ण विभागासमोरील वाहन पार्किंगमध्ये बेवारस अवस्थेत सापडलेल्या अनोळखी इसमासही अपघात विभागातील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृताचे अंदाजे वय ५० वर्षे असून, उंची ५ फूट २ इंच, चेहरा लांबट, दाढी वाढलेली आहे. डोक्याला रुमाल बांधलेला, हिरवा शर्ट आणि पांढरे धोतर त्यांनी घातलेले आहे. या वर्णनाच्या व्यक्तीला ओळखणाऱ्यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोहेकॉ. एस. आर. पवार यांनी केले आहे.मृताचे नातेवाईक सापडेनातघाटीतील सुरक्षारक्षकांना १४ आॅगस्ट रोजी अपघात विभागातील फुटपाथवर ६५ वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळला होता. त्यांनी या घटनेची माहिती अपघात विभागातील डॉक्टर आणि बेगमपुरा पोलिसांना कळविली. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ओळख पटविण्यासाठी मृताचे शव घाटीतील शवागृहात ठेवले. या घटनेला ४० दिवस उलटले तरी मृताच्या नातेवाईकांचा शोध लागलेला नाही. मृताची उंची पाच फूट, रंग सावळा, चेहरा लांबट, अंगावर पांढरा शर्ट आणि पांढरी पॅण्ट असे वर्णन आहे.आणखी पाच जण मृत्यूच्या प्रतीक्षेतघाटीच्या प्रवेशद्वारालगत असलेल्या वाहन पार्किंगमध्ये खाण्या-पिण्याअभावी आणि आजाराने ग्रासलेले पाच ते सहा जण पडून आहेत. घाटीतील निष्णात डॉक्टरांसह शहरातील तथाकथित समाजसेवक याच मार्गावरून घाटीत ये-जा करतात. मात्र या बेवारस गरीब रुग्णांकडे ते ढुंकूनही पाहत नाहीत. या रुग्णांच्या रक्ताच्या लोकांनीच त्यांना नाकारलेले असल्याने ही मंडळी समाजातील अन्य लोकांकडूनही अपेक्षा ठेवत नाहीत. मात्र उपचार करण्याचा वसा घेतलेल्या डॉक्टर आणि नर्सेस यांच्याकडूनही का दुर्लक्ष व्हावे?