शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

विद्यार्थ्यांच्या हाती पहिल्याच दिवशी पुस्तके

By admin | Updated: May 21, 2016 00:13 IST

औरंगाबाद : यंदा १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यासाठी शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत.

औरंगाबाद : यंदा १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यासाठी शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत. त्या दृष्टिकोनातून बालभारतीकडे औरंगाबाद विभागातील ६ जिल्हा परिषदा आणि २ महापालिकांनी १ कोटी २१ लाख ३५ हजार ६२७ पुस्तकांची मागणी केली होती. त्यापैकी मागील सात दिवसांमध्ये ४६ लाख ९४ हजार ४६३ पुस्तकांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले आहे.राज्य मंडळासह अन्य मंडळांच्यादेखील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा १५ जूनपासून (बुधवारपासून) सुरू होत आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व अनुदानित तसेच जि. प. व मनपाच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, स्वाध्याय पुस्तिका ह्या शाळेच्या पहिल्या दिवशी वाटप करणे गरजेचे आहे. त्यानुसार पुस्तक वाटपाचा मुहूर्त टळू नये म्हणून औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि जळगाव या ६ जिल्हा परिषदांकडून तसेच दोन महानगरपालिकांकडून बालभारतीकडे १ कोटी २१ लाख ३३५ हजार ६२७ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार बालभारतीने १३ मेपासून पुस्तक वितरणाला प्रत्यक्ष सुरुवात केली. सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके आणि स्वाध्याय पुस्तिका देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २० लाख १ हजार ९५५ पुस्तकांचे, तर महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना ८ लाख २६ हजार ८७८ पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. महापालिकेने मात्र, अद्याप पुस्तके उचलण्यास सुरुवात केलेली नाही. नवीन शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावीसाठी सुधारित अभ्यासक्रम असणार आहे. त्यादृष्टीने बालभारतीने मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांसाठी सुधारित अभ्यासक्रमांच्या पुस्तकांचादेखील मागणीनुसार पुरवठा केला जात असल्याची माहिती बालभारतीचे भांडार व्यवस्थापक बी. एन. पुरी यांनी सांगितले. यंदा अकरावीच्या अभ्यासक्रमातील मराठीचे ‘युवक भारती’ हे एकच पुस्तक सुधारित असेल.