शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

विद्यार्थ्यांच्या हाती पहिल्याच दिवशी पुस्तके

By admin | Updated: May 21, 2016 00:13 IST

औरंगाबाद : यंदा १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यासाठी शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत.

औरंगाबाद : यंदा १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यासाठी शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत. त्या दृष्टिकोनातून बालभारतीकडे औरंगाबाद विभागातील ६ जिल्हा परिषदा आणि २ महापालिकांनी १ कोटी २१ लाख ३५ हजार ६२७ पुस्तकांची मागणी केली होती. त्यापैकी मागील सात दिवसांमध्ये ४६ लाख ९४ हजार ४६३ पुस्तकांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले आहे.राज्य मंडळासह अन्य मंडळांच्यादेखील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा १५ जूनपासून (बुधवारपासून) सुरू होत आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व अनुदानित तसेच जि. प. व मनपाच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, स्वाध्याय पुस्तिका ह्या शाळेच्या पहिल्या दिवशी वाटप करणे गरजेचे आहे. त्यानुसार पुस्तक वाटपाचा मुहूर्त टळू नये म्हणून औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि जळगाव या ६ जिल्हा परिषदांकडून तसेच दोन महानगरपालिकांकडून बालभारतीकडे १ कोटी २१ लाख ३३५ हजार ६२७ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार बालभारतीने १३ मेपासून पुस्तक वितरणाला प्रत्यक्ष सुरुवात केली. सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके आणि स्वाध्याय पुस्तिका देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २० लाख १ हजार ९५५ पुस्तकांचे, तर महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना ८ लाख २६ हजार ८७८ पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. महापालिकेने मात्र, अद्याप पुस्तके उचलण्यास सुरुवात केलेली नाही. नवीन शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावीसाठी सुधारित अभ्यासक्रम असणार आहे. त्यादृष्टीने बालभारतीने मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांसाठी सुधारित अभ्यासक्रमांच्या पुस्तकांचादेखील मागणीनुसार पुरवठा केला जात असल्याची माहिती बालभारतीचे भांडार व्यवस्थापक बी. एन. पुरी यांनी सांगितले. यंदा अकरावीच्या अभ्यासक्रमातील मराठीचे ‘युवक भारती’ हे एकच पुस्तक सुधारित असेल.