शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या हाती पहिल्याच दिवशी पुस्तके

By admin | Updated: May 21, 2016 00:13 IST

औरंगाबाद : यंदा १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यासाठी शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत.

औरंगाबाद : यंदा १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यासाठी शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत. त्या दृष्टिकोनातून बालभारतीकडे औरंगाबाद विभागातील ६ जिल्हा परिषदा आणि २ महापालिकांनी १ कोटी २१ लाख ३५ हजार ६२७ पुस्तकांची मागणी केली होती. त्यापैकी मागील सात दिवसांमध्ये ४६ लाख ९४ हजार ४६३ पुस्तकांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले आहे.राज्य मंडळासह अन्य मंडळांच्यादेखील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा १५ जूनपासून (बुधवारपासून) सुरू होत आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व अनुदानित तसेच जि. प. व मनपाच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, स्वाध्याय पुस्तिका ह्या शाळेच्या पहिल्या दिवशी वाटप करणे गरजेचे आहे. त्यानुसार पुस्तक वाटपाचा मुहूर्त टळू नये म्हणून औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि जळगाव या ६ जिल्हा परिषदांकडून तसेच दोन महानगरपालिकांकडून बालभारतीकडे १ कोटी २१ लाख ३३५ हजार ६२७ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार बालभारतीने १३ मेपासून पुस्तक वितरणाला प्रत्यक्ष सुरुवात केली. सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके आणि स्वाध्याय पुस्तिका देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २० लाख १ हजार ९५५ पुस्तकांचे, तर महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना ८ लाख २६ हजार ८७८ पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. महापालिकेने मात्र, अद्याप पुस्तके उचलण्यास सुरुवात केलेली नाही. नवीन शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावीसाठी सुधारित अभ्यासक्रम असणार आहे. त्यादृष्टीने बालभारतीने मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांसाठी सुधारित अभ्यासक्रमांच्या पुस्तकांचादेखील मागणीनुसार पुरवठा केला जात असल्याची माहिती बालभारतीचे भांडार व्यवस्थापक बी. एन. पुरी यांनी सांगितले. यंदा अकरावीच्या अभ्यासक्रमातील मराठीचे ‘युवक भारती’ हे एकच पुस्तक सुधारित असेल.