शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

संत साहित्यिकांचा ‘ग्रंथ’ हेच अमूल्य ठेवा- लोमटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:04 IST

प्रत्येकाने सतत कोणत्याही एका पुस्तकाचे वाचन करणे आवश्यक आहे. कारण पुस्तकेच ज्ञान देवून जीवन जगण्याचा मार्ग दाखवितात. ग्रंथ ही आयुष्यातील सर्वात अमुल्य ठेव असते. संत साहित्य, अनेक महान साहित्यिक, कवि, विचारवंत यांचे साहित्य, ग्रंथ हे अमूल्य ठेवा आहे. त्यांची तुलना करता येणे शक्य नाही. ग्रंथांच्या, साहित्याच्या आशयातून आपले जगणे नेहमीच समृद्ध होते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : प्रत्येकाने सतत कोणत्याही एका पुस्तकाचे वाचन करणे आवश्यक आहे. कारण पुस्तकेच ज्ञान देवून जीवन जगण्याचा मार्ग दाखवितात. ग्रंथ ही आयुष्यातील सर्वात अमुल्य ठेव असते. संत साहित्य, अनेक महान साहित्यिक, कवि, विचारवंत यांचे साहित्य, ग्रंथ हे अमूल्य ठेवा आहे. त्यांची तुलना करता येणे शक्य नाही. ग्रंथांच्या, साहित्याच्या आशयातून आपले जगणे नेहमीच समृद्ध होते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे यांनी केले. यावेळी टॉर्च ही कविताही लोमटे यांनी सादर केली. प्रारंभी दीपप्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.हिंगोली न. प. कल्याण मंडपम् येथे मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने आयोजित हिंगोली ग्रंथोत्सव- २०१७ च्या उद्घाटनप्रसंगी लोमटे बोलत होते. जि. प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, सहायक ग्रंथालय संचालक अ.मा. गाडेकर, उपशिक्षणाधिकारी सुभाष बघाटे, ग्रंथालय संघ अध्यक्ष खंडेराव सरनाईक, मसापचे सदस्य विलास वैद्य, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे आदींची उपस्थिती होती. लोमटे म्हणाले, वाचनामुळे अनेक गोष्टी आपल्याला समजतात कळतात. मनुष्याचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे पुस्तक होय. आपली एका पुस्तकाशी मैत्री झाली तर त्याद्वारे आपणांस अनेक पुस्तकरुपी मित्र भेटतात. आपल्या आयुष्यात ग्रंथांचे, पुस्तकांचे खूप महत्त्व आहे. ज्या देशांनी संस्कृतींनी ग्रंथांचे, ज्ञानाचे महत्त्व ओळखले त्या देशांची भरभराट झाली. त्या देशांचा, त्या भागाचा विकास संतुलित पद्धतीने झाल्याचे आपणांस दिसून येते. ग्रंथ वाचनाने आपण सतत समृद्ध होत असतो. पुस्तकामुळे बाहेरील नवीन जगाची ओळख होते. या ग्रंथामुळे अनेकांना ओळख मिळाली आहे. वाचन ही एकच अशी गोष्ट आहे की, त्यामुळे आपल्या ज्ञानात सतत भरच पडत असते. एखादे प्रेरणादायी पुस्तक परत-परत वाचताना सतत आपल्याला नवा अनुभव येऊ शकतो.प्रदर्शनाचे उद्घाटन- ग्रंथोत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहायक ग्रंथालय संचालक अ.मा. गाडेकर, उपशिक्षणाधिकारी सुभाष बगाटे, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष खंडेराव सरनाईक, मसापचे सदस्य विलास वैद्य, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे आदींची उपस्थिती होती.