शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

संत साहित्यिकांचा ‘ग्रंथ’ हेच अमूल्य ठेवा- लोमटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:04 IST

प्रत्येकाने सतत कोणत्याही एका पुस्तकाचे वाचन करणे आवश्यक आहे. कारण पुस्तकेच ज्ञान देवून जीवन जगण्याचा मार्ग दाखवितात. ग्रंथ ही आयुष्यातील सर्वात अमुल्य ठेव असते. संत साहित्य, अनेक महान साहित्यिक, कवि, विचारवंत यांचे साहित्य, ग्रंथ हे अमूल्य ठेवा आहे. त्यांची तुलना करता येणे शक्य नाही. ग्रंथांच्या, साहित्याच्या आशयातून आपले जगणे नेहमीच समृद्ध होते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : प्रत्येकाने सतत कोणत्याही एका पुस्तकाचे वाचन करणे आवश्यक आहे. कारण पुस्तकेच ज्ञान देवून जीवन जगण्याचा मार्ग दाखवितात. ग्रंथ ही आयुष्यातील सर्वात अमुल्य ठेव असते. संत साहित्य, अनेक महान साहित्यिक, कवि, विचारवंत यांचे साहित्य, ग्रंथ हे अमूल्य ठेवा आहे. त्यांची तुलना करता येणे शक्य नाही. ग्रंथांच्या, साहित्याच्या आशयातून आपले जगणे नेहमीच समृद्ध होते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे यांनी केले. यावेळी टॉर्च ही कविताही लोमटे यांनी सादर केली. प्रारंभी दीपप्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.हिंगोली न. प. कल्याण मंडपम् येथे मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या वतीने आयोजित हिंगोली ग्रंथोत्सव- २०१७ च्या उद्घाटनप्रसंगी लोमटे बोलत होते. जि. प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, सहायक ग्रंथालय संचालक अ.मा. गाडेकर, उपशिक्षणाधिकारी सुभाष बघाटे, ग्रंथालय संघ अध्यक्ष खंडेराव सरनाईक, मसापचे सदस्य विलास वैद्य, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे आदींची उपस्थिती होती. लोमटे म्हणाले, वाचनामुळे अनेक गोष्टी आपल्याला समजतात कळतात. मनुष्याचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे पुस्तक होय. आपली एका पुस्तकाशी मैत्री झाली तर त्याद्वारे आपणांस अनेक पुस्तकरुपी मित्र भेटतात. आपल्या आयुष्यात ग्रंथांचे, पुस्तकांचे खूप महत्त्व आहे. ज्या देशांनी संस्कृतींनी ग्रंथांचे, ज्ञानाचे महत्त्व ओळखले त्या देशांची भरभराट झाली. त्या देशांचा, त्या भागाचा विकास संतुलित पद्धतीने झाल्याचे आपणांस दिसून येते. ग्रंथ वाचनाने आपण सतत समृद्ध होत असतो. पुस्तकामुळे बाहेरील नवीन जगाची ओळख होते. या ग्रंथामुळे अनेकांना ओळख मिळाली आहे. वाचन ही एकच अशी गोष्ट आहे की, त्यामुळे आपल्या ज्ञानात सतत भरच पडत असते. एखादे प्रेरणादायी पुस्तक परत-परत वाचताना सतत आपल्याला नवा अनुभव येऊ शकतो.प्रदर्शनाचे उद्घाटन- ग्रंथोत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहायक ग्रंथालय संचालक अ.मा. गाडेकर, उपशिक्षणाधिकारी सुभाष बगाटे, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष खंडेराव सरनाईक, मसापचे सदस्य विलास वैद्य, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे आदींची उपस्थिती होती.