शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

वैजापूर तालुक्यातील बोगस २५ मजूर संस्था रडारवर

By admin | Updated: April 13, 2016 00:50 IST

मोबीन खान ,वैजापूर तालुक्यात आज रोजी कागदोपत्री व शासनदरबारी एकूण ४६ मजूर संस्थांची नोंद आहे़ मात्र त्यापैकी २५ धनदांडग्या व राजकीय लागेबांधे असलेल्या लोकांनी खोट्या

मोबीन खान ,वैजापूरतालुक्यात आज रोजी कागदोपत्री व शासनदरबारी एकूण ४६ मजूर संस्थांची नोंद आहे़ मात्र त्यापैकी २५ धनदांडग्या व राजकीय लागेबांधे असलेल्या लोकांनी खोट्या दस्तऐवजाद्वारे स्वत: कागदी मजूर दर्शवून विविध योजनेअंतर्गत शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. आता या बोगसगिरीची सखोल चौकशी होणार असल्याने या बोगस संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. खऱ्या अर्थाने पात्र असलेले व दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या गोरगरीब मजुरांच्या हक्क, अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार आहे़ विशेष म्हणजे शासनाच्या फसवेगिरीमध्ये संस्थाचालकासह प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची छुपी संमती असल्याची चर्चा आहे.तालुक्यात ४६ मजूर सहकारी संस्था विविध विभागांत काम करत आहेत़ या संस्थांवरचे पदाधिकारी कायद्याने मजूर असणे बंधनकारक असल्याचा शासन निर्णयच आहे़ मात्र तालुक्यातील २५ मजूर सहकारी संस्थेचे अध्यक्ष कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत़संस्थेमधील लोकांनी मजूर असल्याचे प्रमाणपत्र घेऊन दारिद्र्यरेषेखालील उत्पन्नाच्या दाखल्याच्या आधारावर बोगस कागदपत्रे देऊन सहकार विभागाकडून मजूर संस्था नोंदणीकृत करून घेतल्या आहेत़ विशेष म्हणजे यातील बहुतांश संस्थांमध्ये चक्क लोकप्रतिनिधीसुद्धा मजूर म्हणूनच आहेत़ विशेष बाब म्हणजे मजूर कामगार सहकारी संस्था संघाच्या अध्यक्षांची जिल्ह्यात करोडो रुपयांची संपत्ती आहे़ अनेक नामांकित कामे सुरू आहेत, तरीसुद्धा मजूर असल्याचा आव आणून दरवर्षी लाखो रुपयांची कामे लाटली जात आहेत़ या संस्थांना काम वाटप करताना स्वत:च्या स्वार्थासाठी प्रशासकीय अधिकारीसुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून बसून राहत असल्याने अशा परिस्थितीत खरा मजूर घुसमटत आहे. ६ महिन्यांपूर्वी जवळपास दीडशे कामे मजूर सहकारी संस्थेला वाटप करण्यात आली होती़ संस्थाचालकाची कुठल्याही प्रकारची मागणी आणि यादी नसताना सहकार विभागाकडून मंजूर करून घेण्यात आली हे विशेष. शासनाच्या नियमानुसार कुठलीच कामे आजमितीस मजूर संस्था करत नाही़ काही संस्थांचा डोळा जिल्हा परिषद बांधकाम विभागातील त्या विशेष काम वाटपावर आहे़ तसेच तालुक्यात सुरू असलेल्या मजूर कामगार सहकारी संस्थेच्या बनवेगिरीकडे सहकार विभाग कधी कारवाईसाठी लक्ष केंद्रित करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.