शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणांचा फटका !

By admin | Updated: January 6, 2017 00:19 IST

मसलगा परिस्थितीशी दोन हात करीत सावरलेल्या शेतकऱ्यांना बोगस बियाणांमुळे लाखोंचा फटका बसला आहे.

माधव शिंदे  मसलगादुष्काळानंतर अतिवृष्टीने पिके वाहून गेली. परिस्थितीशी दोन हात करीत सावरलेल्या शेतकऱ्यांना बोगस बियाणांमुळे लाखोंचा फटका बसला आहे. निलंगा तालुक्यातील मुगाव येथील दोन शेतकऱ्यांनी चार एकर टरबुजांची लागवड केली. वेल वाढले; पण फळेच लगडली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. निलंगा तालुक्यातील मुगाव येथील शेतकरी चाँदसाब याकुबसाब सय्यद व जिलानी याकुबसाब सय्यद या दोन शेतकऱ्यांनी गट नं. ७९ मध्ये प्रत्येकी दोन एकरप्रमाणे चार एकर टरबुजांची लागवड केली. २५ सप्टेंबर २०१६ रोजी अत्याधुनिक पद्धतीने टरबूज पिकाची लागवड करून ठिबक सिंचनाद्वारे मशागत करण्यात आली. पीकही जोमात आले. फुले बहरली. ९० दिवसांनंतर फळधारणा होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकरी हवालदिल झाले. बियाणांबाबत चौकशी केली. कृषी विभागाकडे तक्रार केली. आता काय करावे, हे दोघांनाही सुचत नव्हते. दरम्यान, दोघा भावांनी रितसर तक्रार केल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी शेतात आले. त्यांनी टरबूज लागवडीची पद्धत, बियाणे आदींबाबतची माहिती जाणून घेतली. उपविभागीय कृषी अधिकारी आर.टी. मोरे, डॉ. व्यंकट जगताप, डॉ.एम.व्ही. धुप्पे, तालुका कृषी अधिकारी पी.जे. पाटील, मंडळ अधिकारी संतोष पाटील, कृषी सहायक कळसे आदींनी पाहणी करून झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. मशागतीसाठी लाखो रुपये खर्च करून पदरी काहीच पडणार नसल्याचे लक्षात आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुष्काळानंतर सावरलेल्या शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका बसल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा झाला असला, तरी शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी सरपंच सुरेंद्र धुमाळ यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे व तपासणी पथकाकडे केली आहे.