शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

बोगस बियाणांचा फटका !

By admin | Updated: January 6, 2017 00:19 IST

मसलगा परिस्थितीशी दोन हात करीत सावरलेल्या शेतकऱ्यांना बोगस बियाणांमुळे लाखोंचा फटका बसला आहे.

माधव शिंदे  मसलगादुष्काळानंतर अतिवृष्टीने पिके वाहून गेली. परिस्थितीशी दोन हात करीत सावरलेल्या शेतकऱ्यांना बोगस बियाणांमुळे लाखोंचा फटका बसला आहे. निलंगा तालुक्यातील मुगाव येथील दोन शेतकऱ्यांनी चार एकर टरबुजांची लागवड केली. वेल वाढले; पण फळेच लगडली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. निलंगा तालुक्यातील मुगाव येथील शेतकरी चाँदसाब याकुबसाब सय्यद व जिलानी याकुबसाब सय्यद या दोन शेतकऱ्यांनी गट नं. ७९ मध्ये प्रत्येकी दोन एकरप्रमाणे चार एकर टरबुजांची लागवड केली. २५ सप्टेंबर २०१६ रोजी अत्याधुनिक पद्धतीने टरबूज पिकाची लागवड करून ठिबक सिंचनाद्वारे मशागत करण्यात आली. पीकही जोमात आले. फुले बहरली. ९० दिवसांनंतर फळधारणा होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकरी हवालदिल झाले. बियाणांबाबत चौकशी केली. कृषी विभागाकडे तक्रार केली. आता काय करावे, हे दोघांनाही सुचत नव्हते. दरम्यान, दोघा भावांनी रितसर तक्रार केल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी शेतात आले. त्यांनी टरबूज लागवडीची पद्धत, बियाणे आदींबाबतची माहिती जाणून घेतली. उपविभागीय कृषी अधिकारी आर.टी. मोरे, डॉ. व्यंकट जगताप, डॉ.एम.व्ही. धुप्पे, तालुका कृषी अधिकारी पी.जे. पाटील, मंडळ अधिकारी संतोष पाटील, कृषी सहायक कळसे आदींनी पाहणी करून झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. मशागतीसाठी लाखो रुपये खर्च करून पदरी काहीच पडणार नसल्याचे लक्षात आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुष्काळानंतर सावरलेल्या शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका बसल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा झाला असला, तरी शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी सरपंच सुरेंद्र धुमाळ यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे व तपासणी पथकाकडे केली आहे.