शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

गिरिजा प्रकल्पात बोअरचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 00:45 IST

सुनील घोडके, खुलताबाद येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा संपल्याने संपादित क्षेत्रात शेतकऱ्यांकडून सर्रासपणे बोअर घेण्याचा सपाटा सुरू केला आहे़

सुनील घोडके,  खुलताबादखुलताबाद शहरासह जवळपास २५ गावांसाठी जलसंजीवनी ठरलेल्या तालुक्यातील येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा संपल्याने संपादित क्षेत्रात शेतकऱ्यांकडून सर्रासपणे बोअर घेण्याचा सपाटा सुरू केला आहे़ विशेष म्हणजे बोअर घेण्याची परवानगी नाही़ मात्र, याची तमा न बाळगता पाटबंधारे विभागाच्या नाकावर टिच्चून हे शेतकरी प्रकल्पाची चाळणी करीत आहेत़तालुक्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर असताना प्रशासन मात्र पाण्याचा साठा सांभाळण्यात अपयशी ठरत आहे. गिरिजा मध्यम प्रकल्पातील संपादित क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांत परिसरातील शेतकऱ्यांनी कुठलीही परवानगी न घेता शेकडो विहिरी व बोअर खोदले आहेत. गिरिजा प्रकल्पातील पाणीसाठा संपला आहे़ त्यामुळे परिसरातील शेतकरी येथे बोअर मारून जमिनीच्या पोटातील पाण्याचा उपसा करीत आहेत. शनिवार (दि़२३) शासकीय सुटी असल्याचे पाहून गिरिजा प्रकल्पात दोन बोअर घेण्यात आले.विशेष म्हणजे प्रकल्प क्षेत्रात विहीर अथवा बोअर घेण्याची कुठलीही परवानगी नाही़ मात्र, तरीही पाटबंधारे विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पाणीटंचाईच्या काळात गिरिजात सर्रास बोअर घेण्यात येत आहेत. गिरिजा मध्यम प्रकल्पातून सध्या टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणारे टँकर भरण्यात येत आहेत. प्रकल्पातील अवैधरीत्या घेतलेल्या बोअरमुळे पाणीसाठी संपला. आता कुठून तालुक्याला पाणीपुरवठा होणार हा एक प्रश्नच आहे़ प्रशासन या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्यास तयार नाही़ कारवाई होत नसल्याने अनेकांनी या प्रकल्पात बोअर घेण्याचा सपाटा सुरू केला आहे़ त्यामुळे आगामी काळात तालुक्यावर जलसंकट निर्माण होणार हे निश्चित आहे़