शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

अभियंत्याविना चालतो वीज मंडळाचा कारभार

By admin | Updated: June 21, 2014 00:49 IST

पाथरी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पाथरी येथील उपविभागीय कार्यालयामध्ये कनिष्ठ अभियंत्याची पदे गेल्या चार महिन्यांपासून रिक्त आहेत.

पाथरी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पाथरी येथील उपविभागीय कार्यालयामध्ये कनिष्ठ अभियंत्याची पदे गेल्या चार महिन्यांपासून रिक्त आहेत. या उपविभागांतर्गत सहा ३३ के.व्ही. विद्युत उपकेंद्र कार्यान्वित असून कनिष्ठ अभियंत्याच्या रिक्त पदांमुळे या उपविभागाच्या सहाय्यक अभियंत्यावरच कामाचा बोजा मात्र वाढला आहे. तर लाईमनकडे कनिष्ठ अभियंत्याचा पदभारही देण्याची वेळ या उपविभागावर आली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर अशी अवस्था असल्याने आगामी काळात विजेची गंभीर समस्या निर्माण होणार असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे पाथरी येथे उपविभागीय कार्यालय आहे. या उपविभागांतर्गत सहा ३३ के.व्ही. उपकेंद्र येतात. यामध्ये बाभळगाव, पाथरी, वाघाळा, गुंज, हादगाव आणि कासापुरी या उपकेंद्रांचा समावेश आहे. तालुक्यामध्ये घरगुती आणि वाणिज्य ग्राहकांची संख्या १० हजार ५०० तर कृषीपंप ग्राहकांची संख्या ९ हजार ५०० आहे. म्हणजेच या तालुक्यात २० हजार ग्राहकांची संख्या आहे. उपविभागाला स्वतंत्र सहाय्यक अभियंता मिळाला खरा परंतु कार्यालयात कनिष्ठ अभियंत्यांची पदे रिक्त असल्याने वीज समस्येची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या उपविभागात पूर्वी चार कनिष्ठ अभियंत्यांची पदे मंजूर होती. त्यानंतर संबंधित विभागाने दोन कनिष्ठ अभियंत्याच्या पदाला कात्री लावून या उपविभागात ग्रामीण १ व ग्रामीण २ अशी पदे कार्यान्वित केली. कनिष्ठ अभियंता ग्रामीण १ कडे पाथरी शहर, ३३ के.व्ही. बाभळगाव, ३३ के.व्ही. वाघाळा, ३३ के.व्ही. गुंज, ३३ के.व्ही. पाथरी देण्यात आली तर ग्रामीण कनिष्ठ अभियंता २ कडे ३३ के.व्ही. हादगाव, ३३ के.व्ही. कासापुरी हे दोन भाग देण्यात आले. चार महिन्यांपूर्वी या भागात कार्यरत असणाऱ्या दोन्ही कनिष्ठ अभियंत्याची बदली विभागाच्या बाहेर झाली. त्यानंतर कनिष्ठ अभियंत्याची पदे मात्र भरण्यात आली नाही. पर्यायाने या उपविभागाचे सहाय्यक अभियंता दीपक तुरे यांच्याकडे कामाचा बोजा वाढला. दिवसभर कार्यालयात वीज समस्येसाठी शेकडो ग्राहक तक्रारी घेऊन येतात. कनिष्ठ अभियंता नसल्याने ग्राहकांच्या तक्रारीचा निपटारा वेळेच्या आत होणेही अवघड होऊन बसले आहे. या उपविभागातील सहा ३३ के.व्ही. उपकेंद्रांतर्गत विजेचा भारही मोठा वाढल्याने अनेकवेळा विजेमध्ये बिघाड होतो. पर्यायाने नागरिकांची ओरड होऊ लागली आहे. रिक्त पदे का भरण्यात आली नाहीत याचे गौडबंगाल मात्र ना ग्राहकांना ना संबंधित विभागाच्या अधिकारी कळाले नाही. या उपविभागातील विजेच्या समस्येमध्ये आगामी काळात वाढ होणार आहे.पावसाळा तोंडावर आहे, पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक वेळा विजेमध्ये बिघाड होतो, पर्यायाने रात्री-बेरात्री नागरिक वीज मंडळाकडे संपर्क साधतात परंतु कर्मचारीच नसल्याने वीज समस्या सुटण्याऐवजी वाढू लागली आहे. (वार्ताहर)दोन उपकेंद्राची आवश्यकतातालुक्यात सहा ३३ के.व्ही. उपकेंद्र आहेत. या उपकेंद्रांतर्गत विजेचा भार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. भारनियमनाव्यतिरिक्तही ट्रान्सफार्मर विजेच्या दाबामुळे अनेकवेळा बंद पडतात. यामुळे ढालेगाव आणि लिंबा येथे दोन नवीन ३३ के.व्ही. उपकेंद्र कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे.