शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

तीर्थपुरीच्या घटनेमुळे जिल्ह्यात नाकाबंदी

By admin | Updated: September 2, 2014 01:50 IST

जालना : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या तीर्थपुरी शाखेसाठी जालना येथून नेण्यात आलेली २० लाखांची रक्कम खापरदेव हिवरा या गावालगत चोरट्यांनी भरदिवसा कार अडवून चोरून नेल्याची घटना सोमवारी घडली.

जालना : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या तीर्थपुरी शाखेसाठी जालना येथून नेण्यात आलेली २० लाखांची रक्कम खापरदेव हिवरा या गावालगत चोरट्यांनी भरदिवसा कार अडवून चोरून नेल्याची घटना सोमवारी घडली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.सदर घटनेत २० लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्या कारमधील दोघांना चोरट्यांनी अडवून चाकूचा धाक दाखवत रोकड लांबविली. विशेष म्हणजे ही घटना दुपारी २.३० वाजता घडली. शहरासह जिल्ह्यात चोऱ्या, घरफोड्या व लुटमारीच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून त्यामुळे पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग यांनी सांगितले, चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. गोंदी पोलिस ठाण्यासह आसपासच्या पोलिस ठाण्यांनाही सतर्क करण्यात आले आहे. नाकाबंदीही लावण्यात आली आहे. या प्रकारच्या घटना टाळण्यासाठी पैसे घेऊन जाणाऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.पाठलाग होत असल्यास सावध होऊन दक्षता बाळगणे गरजेचे आहे. संशयास्पद व्यक्ती दिसून आल्यास तात्काळ पोलिसांना खबर द्यावी, असे आवाहन सिंग यांनी केले. (प्रतिनिधी)