शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
2
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
3
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
4
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
5
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
6
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
7
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
8
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
9
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
10
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
11
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
12
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
13
बेबी खान लवकरच येणार, शूराचं पार पडलं डोहाळजेवण; सलमानसह टीव्ही कलाकारांची हजेरी
14
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
15
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
16
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
18
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
19
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
20
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध

निळ्या झेंड्यांच्या दांड्यांना हवे एकीचे बळ !

By admin | Updated: August 26, 2015 23:42 IST

बीड : दलितांच्या गठ्ठा मतांवर डोळा ठेवून निवडणुकांपुरता निळा झेंडा मिरविला जातो. प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये निळ्या झेंड्यांचे दांडे दिसतात;

बीड : दलितांच्या गठ्ठा मतांवर डोळा ठेवून निवडणुकांपुरता निळा झेंडा मिरविला जातो. प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये निळ्या झेंड्यांचे दांडे दिसतात;परंतु आता या दांड्यांना एकीचे बळ आवश्यक आहे. त्याशिवास समाजाचा संघर्ष संपणार नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे संस्थापक डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी बुधवारी सांगितले. ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी समाजाच्या राजकीय, सामाजिक उपेक्षेवर टिप्पणी करतानाच सामाजिक संघटन बांधणीची गरज असल्याचेही स्पष्ट केले.‘शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश. या संदेशाचा समाजाने विसर पडू देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करत ओव्हाळ यांनी समाजाला गृहित धरुन राजकारण करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, विविध राजकीय पक्षांमध्ये निळे झेंडे दिसतात. निवडणुका आल्या की, मते ‘कॅश’ करण्यासाठी निळ्या झेंड्यांचे प्रदर्शन केले जाते; परंतु प्रत्यक्षात या झेंड्यांचे दांडे प्रस्थापितांच्याच हाती आहेत. त्यामुळे समाजाच्या प्रश्नांना वाचा फुटत नाही. आजही अनेक गावांत दलितांवर अन्याय- अत्याचार होत आहेत. पावलोपावली संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. अ‍ॅट्रॉसिटीसारखे कवच कुंडल असतानाही अत्याचार थांबत नाहीत, हे घातक असल्याचे ते म्हणाले. सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्यातच अर्धी शक्ती वाया जात आहे. त्यामुळे मतांसाठी निळे झेंडे घेऊन मिरविणाऱ्यांनी दांडासुद्धा साबूत ठेवला पाहिजे. समाजाच्या प्रतिष्ठेचा व स्वाभिमानाचाही विचार झाला पाहिजे, असे डॉ. ओव्हाळ यांनी सांगितले. समाजाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे दिवस आता संपले आहेत. समाज जागृत होत आहे;परंतु अजूनही काही जण समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न करत आहेत. समाजाला आरक्षण मिळाले;परंतु ध्वजारोहणाच्या अधिकारापासून वंचित ठेवल्याचे धक्कादायक प्रकार पुढे येत आहेत. काही ठिकाणी प्रस्थापित राजकारणी दलित समाजातील बेरोजगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढतात. समाजातील तरुणांना व्यसनाच्या आहारी लावतात. हे कोठे तरी थांबले पाहिजे, अशी अपेक्षाही डॉ. ओव्हाळ यांनी व्यक्त केली.राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक संघटन उभे केले जाणार आहे. प्रस्थापितांविरुद्ध टक्कर देण्यासाठी संघटन केल्याशिवाय पर्याय नाही, असेही डॉ. ओव्हाळ म्हणाले. (प्रतिनिधी)सामाजिक कार्याच्या तळमळीतून जितेंद्र ओव्हाळ यांनी वैद्यकीय व्यवसायासोबतच सामाजिक संघटनही उभे केले आहे. २०१० मध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचची स्थापना केली. या माध्यमातून तरुणांची मोठी फौज निर्माण केली असून, विविध विषयांवर आंदोलने छेडून रान पेटविले आहे. येणाऱ्या काळात समाजकारण अधिक जोमाने करायचे असून शेवटपर्यंत लढा सुरुच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.दलित समाजाची प्रशासनाकडूनही उपेक्षा सुरु असल्याची टीका डॉ. ओव्हाळ यांनी केली. ते म्हणाले, प्रश्न गायरान जमिनीचा असो की, घरकुलाचा जागोजागी अडवणूक होते. खालापासून ते वरपर्यंतची यंत्रणा प्रस्थापितांच्या इशाऱ्यावर चालते. त्यामुळे हा दुजाभाव थांबला पाहिजे, असेही ओव्हाळ म्हणाले.