शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

आंधळ्याची काठी, लंगड्याचा पाय अन् अनाथांची माय़़़

By admin | Updated: September 5, 2016 00:50 IST

व्ही.एस. कुलकर्णी , उदगीर आंधळ्याची काठी, लंगड्याचा पाय अन् अनाथांची माय अशा शब्दात जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला काकू डोळे यांना अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थितांकडून श्रध्दांजली वाहण्यात आली़

व्ही.एस. कुलकर्णी , उदगीरआंधळ्याची काठी, लंगड्याचा पाय अन् अनाथांची माय अशा शब्दात जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला काकू डोळे यांना अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थितांकडून श्रध्दांजली वाहण्यात आली़ रविवारी पहाटे उदगीरच्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला काकू डोळे यांचे देहावसान झाले़ त्यांच्या निधनानंतर समाजातील विविध घटकांतून शोकसंदेश येणास सुरुवात झाली़ सामाजिक कार्याचा डॉ़ ना़ य़ डोळे यांचा वारसा निर्मला काकूंनी चालविला होता. काकूंच्या जाण्यानंतर त्यांच्या कार्याचा व आठवणींचा कल्लोळ दाटला होता़ यामध्ये स्त्रिया व त्यांचे हक्क आणि अधिकार यांचे होणारे शोषण या संदर्भात डोळे काकूंनी आंदोलने केली, मोर्चे काढले़ त्यातून महिलांना न्याय मिळवून दिला़ त्यांचे वागणे, बोलणे सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे होते. समाजकारणातील झाशीची राणी म्हणूनच त्यांची ओळख होती़राजकारण समाज परिवर्तनासाठीच असते़ याचा एक मानदंडच त्यांनी घालून दिला़ जगावे कशासाठी आणि कसे याची पायवाट त्यांनी घालून दिली़ जातीभेदांच्या भिंती त्यांनी जाणीवपूर्वक उद्ध्वस्त केल्या़ समतेची व ममतेची ज्योत प्रज्वलित केली़ गरीब विद्यार्थी व कार्यकर्त्यांना त्यांनी सर्वतोपरी मदत केली आहे़ आदरातिथ्य हा त्यांचा स्वभाविक गुणधर्म होता़ घरी आलेला अतिथी विण्मुख जाणार नाही, याची त्यांनी सातत्याने काळजी घेतली़ स्वत:च्या घासातला घास काढून त्यांनी अनेकांची भूक भागविली़ उदगीर व बाहेरील समाजातील अनेक कार्यकर्ते डोळे सरांच्या घरात व परिवारात घडले़ यामध्ये काकूंचा मोठा हातभार होता़ नगरसेविका असताना त्यांनी सर्व जातीधर्मातील माणसांना सोबत घेवून कार्य केले़ नगरसेवक कसा असावा याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले़ साने गुरुजींचे कार्य जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी उदगीर येथे १९७२ साली नवसमाज शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन करून गोरगरिबांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणली.डोळे काकूंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तुरुंगवासही भोगला़ महिला दक्षता समितीचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे अनेक वर्षे राहिले़ राष्ट्र सेवादल, समाजवादी पक्ष, छात्रभारती आणि जनता पार्टी अशा अनेकविध समाजवादी विचारसरणीच्या ठिकाणी पदाधिकारी म्हणून कार्य केले़ ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यथित केले़