शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

बेंबळीतील युवकांनी घेतला स्वच्छतेचा वसा !

By admin | Updated: May 14, 2017 23:15 IST

उस्मानाबाद : युवकांचे हात एकत्रित आले तर परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही, याची प्रचिती तालुक्यातील बेंबळी गावात येत आहे़

विजय मुंडे। लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : युवकांचे हात एकत्रित आले तर परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही, याची प्रचिती तालुक्यातील बेंबळी गावात येत आहे़ गावातील स्वच्छता ग्रुपचे ३० ते ३५ युवक प्रत्येक रविवारी गावात ‘ग्रामसेवा स्वच्छता अभियान’ राबवित आहेत़ युवकांनी श्रमदानातून आजवर गावातील १३ विभाग स्वच्छ केले आहेत़एखाद्या मोठ्या गावात मोहीम राबविणे म्हणजे मोठे अवघड काम! मात्र, तालुक्यातील बेंबळी येथील युवकांनी अशा असाध्य कामाला साध्य करण्याच्या ध्यास घेतला आहे़ शासनस्तरावरून स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावे, शहरे पाणंदमुक्त, स्वच्छ करण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करण्यात येत आहेत़ मात्र, कोणत्याही शासकीय मदतीची अथवा नेत्याच्या पुढाकाराची वाट न पाहता गावातील युवकांनी ‘ग्रामसेवा स्वच्छता अभियान’ राबविण्याचा संकल्प केला़ गावातील डॉक्टर, व्यवसायिक, इंजिनिअर, शिक्षक, पत्रकारांसह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांनी एकत्रित येऊन १९ फेब्रुवारी रोजीच्या पहिल्या रविवारी स्वच्छता अभियानाला प्रारंभ केला़ स्वच्छतेसाठी लागणारे हँडग्लोज, खोऱ्या, खराटे आदी विविध साहित्य स्वनिधीतूनच उभा केले़ १९ फेब्रुवारी पासून घेतलेला स्वच्छतेचा वसा आजही अखंडितपणे कायम आहे़ पुढील रविवारी कोणती गल्ली, कोणत्या विभागात स्वच्छता मोहीम राबवायची, याचे नियोजन केले जाते़ नियोजित विभागाची माहिती व्हाटस्अ‍ॅप व इतर सोशल माध्यमांद्वारे सर्वांना दिली जाते़ रविवारी पहाटे ६ ते सकाळी ८ या वेळेत नियोजित भागात स्वच्छता मोहीम राबवून जमा झालेला कचरा जाळण्यात येत आहे़ युवकांनी सुरू केलेल्या कामामुळे गावातील १३ भाग स्वच्छ झाले आहेत़ गाव स्वच्छ करणे, कॅरिबॅग मुक्त करणे, वृक्षारोपन, सांस्कृतिक क्षेत्राला चालना देणे आदी विविध उद्देश समोर ठेवून हे काम युवकांनी हाती घेतले आहे़ ग्रामसेवा ग्रुपचे चंदन भडंगे, डॉ़ अमोल गावडे, बालाजी शिंदे, चंद्रकांत सांगवे, निलेश मरगणे, धर्मराज गावडे, बबलू गावडे, प्रशांत माने, रवी पाटील, शहानवाज शेख, उमाजी रेडेकर यांच्यासह इतर युवक हा उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रयत्नशील आहेत़गावातील विश्वनाथ बालाजी शिंदे या ८ वर्षीय बालकाने सर्वच रविवारी या मोहिमेत सहभाग घेऊन गावाला स्वच्छ करण्यासाठी श्रमदान केले आहे़ विशेष म्हणजे, ग्रुपमधील सदस्यांच्या वाढदिवसाला गावात एक नवी कचराकुंडी उभी केली जात आहे़