शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

बेंबळीतील युवकांनी घेतला स्वच्छतेचा वसा !

By admin | Updated: May 14, 2017 23:15 IST

उस्मानाबाद : युवकांचे हात एकत्रित आले तर परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही, याची प्रचिती तालुक्यातील बेंबळी गावात येत आहे़

विजय मुंडे। लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : युवकांचे हात एकत्रित आले तर परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही, याची प्रचिती तालुक्यातील बेंबळी गावात येत आहे़ गावातील स्वच्छता ग्रुपचे ३० ते ३५ युवक प्रत्येक रविवारी गावात ‘ग्रामसेवा स्वच्छता अभियान’ राबवित आहेत़ युवकांनी श्रमदानातून आजवर गावातील १३ विभाग स्वच्छ केले आहेत़एखाद्या मोठ्या गावात मोहीम राबविणे म्हणजे मोठे अवघड काम! मात्र, तालुक्यातील बेंबळी येथील युवकांनी अशा असाध्य कामाला साध्य करण्याच्या ध्यास घेतला आहे़ शासनस्तरावरून स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावे, शहरे पाणंदमुक्त, स्वच्छ करण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करण्यात येत आहेत़ मात्र, कोणत्याही शासकीय मदतीची अथवा नेत्याच्या पुढाकाराची वाट न पाहता गावातील युवकांनी ‘ग्रामसेवा स्वच्छता अभियान’ राबविण्याचा संकल्प केला़ गावातील डॉक्टर, व्यवसायिक, इंजिनिअर, शिक्षक, पत्रकारांसह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांनी एकत्रित येऊन १९ फेब्रुवारी रोजीच्या पहिल्या रविवारी स्वच्छता अभियानाला प्रारंभ केला़ स्वच्छतेसाठी लागणारे हँडग्लोज, खोऱ्या, खराटे आदी विविध साहित्य स्वनिधीतूनच उभा केले़ १९ फेब्रुवारी पासून घेतलेला स्वच्छतेचा वसा आजही अखंडितपणे कायम आहे़ पुढील रविवारी कोणती गल्ली, कोणत्या विभागात स्वच्छता मोहीम राबवायची, याचे नियोजन केले जाते़ नियोजित विभागाची माहिती व्हाटस्अ‍ॅप व इतर सोशल माध्यमांद्वारे सर्वांना दिली जाते़ रविवारी पहाटे ६ ते सकाळी ८ या वेळेत नियोजित भागात स्वच्छता मोहीम राबवून जमा झालेला कचरा जाळण्यात येत आहे़ युवकांनी सुरू केलेल्या कामामुळे गावातील १३ भाग स्वच्छ झाले आहेत़ गाव स्वच्छ करणे, कॅरिबॅग मुक्त करणे, वृक्षारोपन, सांस्कृतिक क्षेत्राला चालना देणे आदी विविध उद्देश समोर ठेवून हे काम युवकांनी हाती घेतले आहे़ ग्रामसेवा ग्रुपचे चंदन भडंगे, डॉ़ अमोल गावडे, बालाजी शिंदे, चंद्रकांत सांगवे, निलेश मरगणे, धर्मराज गावडे, बबलू गावडे, प्रशांत माने, रवी पाटील, शहानवाज शेख, उमाजी रेडेकर यांच्यासह इतर युवक हा उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रयत्नशील आहेत़गावातील विश्वनाथ बालाजी शिंदे या ८ वर्षीय बालकाने सर्वच रविवारी या मोहिमेत सहभाग घेऊन गावाला स्वच्छ करण्यासाठी श्रमदान केले आहे़ विशेष म्हणजे, ग्रुपमधील सदस्यांच्या वाढदिवसाला गावात एक नवी कचराकुंडी उभी केली जात आहे़