शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

लेबर कॉलनीच्या नागरिकांसाठी ‘शनि’वार ठरला काळा दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:14 IST

विश्वासनगर लेबर कॉलनी येथील १३ एकर जागेवर शासकीय निवासस्थाने उभारण्यात आली होती. या निवासस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. शासकीय निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बेघर करण्याचे प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत.

ठळक मुद्देअचानक सकाळी सर्वेक्षण : सहा दशकांपासून राहणारे नागरिक भयतीत

औरंगाबाद : विश्वासनगर लेबर कॉलनी येथील १३ एकर जागेवर शासकीय निवासस्थाने उभारण्यात आली होती. या निवासस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. शासकीय निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बेघर करण्याचे प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत. कधी राजकीय तर कधी न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही प्रक्रिया रखडली होती. शनिवारी सकाळी अचानक शंभर पोलीस घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी लेबर कॉलनीत दाखल झाले. त्यांनी प्रत्येक घरात जाऊन सध्या कोण राहत आहे, यासंबंधीचे पुरावेच गोळा केले. आता आठ दिवसांमध्ये नोटिसा देऊन घरे रिकामी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.१९६० ते ६२ दरम्यान विश्वासनगर लेबर कॉलनी येथे शासकीय अधिकारी व कर्मचाºयांसाठी ३३८ पेक्षा अधिक निवासस्थाने उभारण्यात आली. सुरुवातीच्या काळात अधिकारी व कर्मचारी निवृत्त होताच संबंधित विभागाला निवासस्थान रिक्त करून देत असत. मागील काही वर्षांमध्ये कर्मचारी निवृत्त झाले. अनेक जण मरणही पावले. मात्र, त्यांच्या कुटुंबियांनी ताबा सोडला नाही. अनेक जणांनी पोटभाडेकरू ठेवले आहेत. मागील दहा वर्षांपासून शासनस्तरावर लेबर कॉलनी रिकामी करून संपूर्ण १३ एकर जागेचा ताबा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक वेळी राजकीय हस्तक्षेप, कधी न्यायालयीन प्रक्रिया यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला ताबा घेण्यात यश आले नाही.शनिवारी सकाळी ८ वाजता १०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी, २०० पेक्षा अधिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी लेबर कॉलनीत दाखल झाले. नागरिकांना हा ताफा कशासाठी आला आहे, हे कळण्यापूर्वीच कर्मचाºयांनी प्रत्येक घरांत जाऊन सर्वेक्षण सुरू केले. घरात सध्या कोण राहत आहे, त्यांचे आधार कार्ड, लाईट बिल कोणाच्या नावावर आहे, आदी कागदपत्रे गोळा करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाची ही प्रक्रिया पाहून घरांमध्ये राहणाºया शेकडो नागरिकांना थंडीतही घाम फुटला. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आठ दिवसांमध्ये नोटीस देण्यात येईल. त्यानंतर घराचा ताबा द्यावा लागेल, असेही यावेळी नारिकांना सांगण्यात आले.तीन तासांत सर्वेक्षणसार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रत्येक कर्मचाºयाला फक्त ७ घरांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. अवघ्या अडीच ते तीन तासांमध्ये कर्मचाºयांनी सर्वेक्षण पूर्ण केले. ज्या नागरिकांनी कागदपत्रे दिली नव्हती त्यांची कागदपत्रे नंतर सुभेदारी विश्रामगृह येथे स्वीकारण्यात येत होती.प्रशासकीय इमारतीचा ‘प्लॅन’विश्वासनगर-लेबर कॉलनी येथील १३ एकर जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाने भव्य प्रशासकीय इमारत बांधण्याचा ‘प्लॅन’ आखला आहे. यासाठी मागील अनेक वर्षांपासून निवासस्थाने रिकामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Aurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादState Governmentराज्य सरकार