शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

भाजपच्या मतांचा टक्का वाढला

By admin | Updated: October 21, 2014 00:56 IST

जालना : गेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्णत: सफाया झालेल्या भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत पाच पैकी तीन जागा पटकावून मोठी मुसंडी मारली.

जालना : गेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्णत: सफाया झालेल्या भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत पाच पैकी तीन जागा पटकावून मोठी मुसंडी मारली. त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांसह एकेकाळचे मित्र असणाऱ्या शिवसेनेसपेक्षाही मोठ्या प्रमाणात मतदान पदारात पाडून जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रास चकीत केले आहे.या जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत भाजपाचा मोठा सफाया झाला. एकही जागा मिळाली नाही. या उलट या निवडणुकीत भाजपाने भोकरदन व परतूर हे मतदार संघ खेचून आणले. व बदनापूरची जागाही पटकाविली. विशेष म्हणजे घनसावंगी दुसरा व जालन्यात तिसरा क्रमांकाची मते घेतली. जिल्ह्यातील भाजपाचे हे यश चकीत करणारे ठरले आहे. कारण गेल्या निवडणुका व यावेळच्या निवडणुकीतील मतदानासह टक्केवारीचा पडताळणी केली तर सहजपणे हे यश नजरेत भरण्यासारखे आहे. गेल्या निवडणुकीत परतूर मधून बबनराव लोणीकर हे पराभूत झाले होते. ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यावेळी लोणीकर यांना ३१ हजार २०० मते मिळाली. तर या निवडणुकीत लोणीकर यांनी ४६ हजार ९३७ मते मिळविली आहेत. म्हणजेच भाजपाने सरासरी १५ हजार मते जादा मिळविली आहेत.भोकरदनमधूनही गेल्या निवडणुकीत निर्मलाबाई दानवे यांनी ६५ हजार ८४१ मते मिळविली होती. या निवडणुकीत तेथून त्यांचे सुपूत्र संतोष दानवे यांनी ६९ हजार ५९७ एवढी मते घेतली. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत शिवसेना भाजपात युती होती. या निवडणुकीत युती संपुष्टात आली. तरीसुद्धा भाजपाने समविचारी पक्षांच्या मतांमधून मत विभागणीचा एवढा मोठा धोका असताना सुद्धा दोन्ही जागी विजश्री खेचून आणली. व लक्षणीय मते सुद्धा घेतली. बदनापूरमधून भाजपाचे यश लक्षवेधी व देदीप्यमान आहे. कारण महायुती संपुष्टात आल्यानंतर भाजपाने उमेदवाराचा शोध सुरु केला. औरंगाबाद येथील नारायण कुचे यांना उमेदवारी बहाल केली. अवघ्या सतरा दिवसांच्या प्रचार युद्धात भाजपाने प्रभाव क्षेत्रातील भक्कम साथीच्या जोरावरच यश तर पटकाविलेच परंतु शिवसेनेसह राष्ट्रवादीस तब्बल सरासरी २३ हजार मताधिक्याने लोळविले. तेथून भाजपाने ७३ हजार ५६० एवढी मते मिळविली आहेत. घनसावंगीतून सुद्धा भाजपाने यावेळी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. तेथून माजी आ. विलास खरात यांनी ५४ हजार ५५४ मते मिळविली आहेत. ही सुद्धा मते लक्षणीय आहेत. जालन्यातूनही भाजपाने पहिल्यांदाच निवडणूक लढविली. माजी आ. अरविंद चव्हाण यांनी तब्बल ३७ हजार ५९१ मते मिळविली. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. परंतु भाजपाची मते लक्षणीय ठरली आहेत. या जिल्ह्यात भाजपाने एकूणच २ लाख ८२ हजार ५६ मते मिळविली. भाजपाचे हे यश नेत्रदीपक आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने २ लाख २३ हजार त्या पाठोपाठ शिवसेनेने १ लाख ७६ हजार ८५१ तर काँग्रेसने १ लाख ८ हजार ४१४ मते पटकाविली. मनसेने पाच मतदार संघात ५६ हजार २२६ मते मिळविली आहेत. (प्रतिनिधी)जालना जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात या निवडणुकीत सुमारे सव्वा लाखांवर नवीन मतदार वाढले होते. या मतदारांत मतदानाच्या हक्काविषयी कमालीच्या जाणीवा निर्माण झाल्या होत्या. तसेच मतदान करण्यासंबधी जिल्हा प्रशासनाने तसेच सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याने मतदानाची टक्केवारीही वाढली. याचा फायदा भाजपाला मिळणार हे स्पष्ट होते. मतमोजणीतून ते चित्र समोर आले असून नव्या पिढीने भाजपालाच पसंती दिली.