शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

विधानसभेत मतांच्या टक्केवारीत भाजपा नंबर १ !

By admin | Updated: October 21, 2014 00:57 IST

आशपाक पठाण ,लातूर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात भाजपाने मुसंडी मारली आहे. मताधिक्यात भाजपाच पहिल्या

आशपाक पठाण ,लातूरविधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात भाजपाने मुसंडी मारली आहे. मताधिक्यात भाजपाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला आहे. जवळपास १२ हजार मतांच्या फरकाने काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मनसेचा क्रमांक आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपालाच मताधिक्य होते. विधानसभेत लोकसभेसारखी किमया चालली नसली, तरी पक्षाचे वजन लातूर जिल्ह्यात वाढले आहे. भाजपाचे वाढते मताधिक्य काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ३ लाख ९५ हजार २५२ मते घेऊन पहिला क्रमांक मिळविला. तर काँग्रेस पक्ष ३ लाख ८३ हजार ९१ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस १ लाख २७ हजार ५३२ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर, शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ ८८ हजार ५५२ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर तर मनसेचे ‘इंजिन’ २७ हजार ८३ मते घेऊन पाचव्या क्रमांकावर आले आहे.लोकनेते विलासराव देशमुख, पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री आ. दिलीपराव देशमुख यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या लातूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व राखले होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे चार आमदार निवडून आले होते. तर एक राष्ट्रवादी व एक जागा भाजपाला मिळाली होती. सहापैकी चार ठिकाणी निवडून आलेल्या काँग्रेसचे मताधिक्य अधिक असल्याने लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. लोकसभा निवडणुकीपासून बालेकिल्ल्याला सुरुंग लागला. लातूर शहर व लातूर ग्रामीण या दोन्ही मतदारसंघांत भाजपाचा पराभव झाला असला, तरी मताधिक्य मात्र चांगलेच वाढले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत लातूर शहरमधून काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री अमित देशमुख यांना १ लाख १३ हजार ००६ मते मिळाली होती. तर ग्रामीणमधून माजी आ. वैजनाथ शिंदे यांना ८६ हजार १३६ मते मिळाली होती. तर २०१४ च्या निवडणुकीत लातूर ग्रामीणमधून विजयी झालेले काँग्रेसचे आ. त्रिंबकनाना भिसे यांना १ लाख ८९७ मते मिळाली आहेत. भाजपाचे उमेदवार रमेश कराड यांना मागील निवडणुकीत ६२ हजार ५५३ मते मिळाली होती. या निवडणुकीत त्यांचे तब्बल २८ हजार मते वाढली आहेत. ९० हजार ३८७ मते घेऊन ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. एकंदरित, लातूर शहर मतदारसंघात भाजपाचे मताधिक्य वाढले आहे.