शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची भूमिका ठरणार निर्णायक !

By admin | Updated: March 5, 2017 00:36 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेत सध्या त्रिशंकू स्थिती असून, राष्ट्रवादीसह शिवसेना, काँग्रेसनेही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेत सध्या त्रिशंकू स्थिती असून, राष्ट्रवादीसह शिवसेना, काँग्रेसनेही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईतील महापौर पदाच्या निवडीसंदर्भातील तिढा सुटल्याने आता जिल्ह्यातील प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हालचालींना सुरूवात केली असून, जिल्हा परिषदेच्या सत्तेचा कौल भाजपाच्या निर्णयावर अवलंबून असल्याने चित्र आहे. यंदा जिल्हा परिषद निवडणूक प्रमुख चारही पक्षांनी स्वबळावर लढली. जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी पुढे आली असून, त्यांच्याकडे २६ सदस्य आहेत. तर सत्ताधारी असलेल्या शिवसेना, काँग्रेसची या निवडणुकीत पिछेहाट झाली असून, शिवसेनेकडे तेरा, तर काँग्रेसकडे अकरा सदस्य आहेत. जिल्हा परिषदेत बहुमत सिध्द करण्यासाठी २८ सदस्यांची आवश्यकता असल्याने राष्ट्रवादीला आणखी दोन तर सेना-काँग्रेसला चार सदस्यांची आवश्यकता आहे. यावेळी प्रथमच जिल्हा परिषद स्वबळावर लढलेल्या भाजपाच्या जागा यंदा दुप्पट झाल्या असल्या तरी त्यांच्या हातीही केवळ चार सदस्य आहेत. मात्र, भाजपाचे हे चार सदस्यच जिल्हा परिषदेतील सत्तेचा कौल ठरविण्यासाठी आता महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. राष्ट्रवादी जिल्हा परिषदेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आल्याने सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीनेही हालचाली सुरू केल्या आहेत. एक अपक्ष सदस्य निवडून आला असला तरी बहुमत गाठण्यासाठी इतर पक्षाची मदत घेणे अपरिहार्य असल्याने राष्ट्रवादीला सत्तेत येण्यासाठी भाजपाचीच मदत घ्यावी लागेल. तशीच परिस्थिती शिवसेना-काँग्रेसची आहे. २४ सदस्यबळ असलेल्या शिवसेना-काँग्रेसला सत्तेत येण्यासाठी चार सदस्यांची आवश्यकता असून, भाजपाने शिवसेना-काँग्रेसच्या बाजुने भूमिका घेतल्यास ते सत्तेत येवू शकतात. अशा परिस्थितीत भाजपाच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झालेले आहे. २१ मार्च रोजी विशेष सभा असल्याने सत्तेचे नेमके गणित तेव्हाच स्पष्ट होणार आहे.