शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

भाजपाचा बार, राष्ट्रवादी गार !

By admin | Updated: October 20, 2014 00:34 IST

प्रताप नलावडे , बीड राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उध्दवस्त करीत सहा मतदारसंघापैकी पाच ठिकाणी दणदणीत विजय मिळवित भाजपाने विजयश्री खेचून आणण्याची किमया केली.

प्रताप नलावडे , बीडराष्ट्रवादीचा बालेकिल्ला उध्दवस्त करीत सहा मतदारसंघापैकी पाच ठिकाणी दणदणीत विजय मिळवित भाजपाने विजयश्री खेचून आणण्याची किमया केली. बहुरंगी निवडणूक असे म्हटले जात असले तरी विजयासाठीची झुंज राष्ट्रवादी आणि भाजपामध्येच झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस, शिवसेना आणि मनसे यांचा या निवडणुकीत पार धुव्वा उडला. सर्वच पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरल्यामुळे मतांचे झालेले विभाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या सहानुभुतीचा फायदा, मोदी यांच्या सभेनंतर तयार झालेले वातावरण, मतदारांची नाराजी आणि जातीची समिकरणे असे अनेक मुद्दे या निवडणुकीत प्रभावी ठरले. परळी मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. बीड मतदारसंघातील एकमेव जागा राष्ट्रवादीला राखता आली. भाजपाचे विनायक मेटे यांनी रा.कॉ.चे जयदत्त क्षीरसागर यांच्यासमोर तगडे आव्हान ठेवले होते. क्षीरसागर यांची प्रचाराची आणि संपर्काची पध्दतशीर यंत्रणा, त्यांची स्वत:ची जनमानसातील चांगली प्रतिमा आणि ओबीसीचे नेते म्हणून त्यांची असलेली ओळख अशा अनेक बाबी त्यांच्यासाठी जमेच्या ठरल्या. पहिल्या फेरीपासूनच मेटे आणि क्षीरसागर यांच्यातील कडवी झुंज शेवटच्या टप्प्यापर्यंत उत्कंठा वाढविणारी ठरली. पहिल्या दहा फेऱ्यांमध्ये मेटे आघाडीवर राहिले मात्र त्यानंतर दहाव्या फेरीपासून क्षीरसागारांनी घेतलेली मतांची आघाडी वाढतच राहिली. अटीतटीच्या सामन्यात क्षीरसागर यांनी ६ हजार १३२ मताधिक्य मिळवित मेटेनां अस्मान दाखविले.आष्टीत रा.कॉ.चे सुरेश धस आणि भाजपाचे भीमराव धोेंडे यांच्यात असाच अटीतटीचा सामना रंगला. पहिल्या फेरीपासून सुरेश धस यांनी मतांची आघाडी घेतली, परंतु १८ व्या फेरीत धोंडे यांनी आघाडी घेतली. त्यानंतर कधी धोंडे पुढे तर कधी धस पुढे अशी स्पर्धा शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. धोंडे यांनी ५ हजार ९८२ इतक्या मतांचा धक्का धस यांना देत विजयश्री अक्षरश: खेचली. गेवराईत पंडितांच्या एकछत्र अमल मोडीत काढत बदामराव पंडित यांना भाजपाच्या लक्ष्मण पवार यांनी ६० हजारांचे मताधिक्य घेत दणदणीत विजय मिळविला. माजलगावमध्ये प्रकाश सोळंके यांच्याविषयी असलेल्या नाराजीचा फायदा उठवित भाजपाच्या आर.टी. देशमुख यांनी विजयी सलामी दिली. पहिल्या फेरीपासूनच ते आघाडीवर राहिले. केजमध्ये संगीता ठोंबरे यांनीही पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवली. परळीतही पहिल्या फेरीपासूनच भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी आघाडी कायम ठेवत २६ हजार मतांनी अपेक्षित विजय मिळविला.