शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आमदार बिथरल्यामुळे भाजपची घालमेल

By | Updated: November 28, 2020 04:15 IST

महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ नांदेड येथील ओम गार्डन येथे पदवीधर व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला ...

महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ नांदेड येथील ओम गार्डन येथे पदवीधर व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत हाेते. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी केंद्रीयमंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील, माजीमंत्री अर्जुन खोतकर, खा. हेमंत पाटील, माजीमंत्री कमलकिशोर कदम, आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहन हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकर, आ. शामसुंदर शिंदे, माजी आमदार वसंतराव चव्हाण, सुभाष साबणे, अनुसया खेडकर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम आदींची उपस्थिती होती. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, भाजपातील दिग्गज नेते एकनाथ खडसे, जयसिंगराव गायकवाड हे राष्ट्रवादीत आल्यामुळे आता भाजपला सुरुंग लागला आहे. महाविकास आघाडीचे सरकार चालवताना काहीवेळा अडचणी येत असतील, निर्णय मागेपुढे होत असतील तरी राज्याचे हित हेच आमचे समान धोरण आहे. महाराष्ट्र कधीही दिल्लीश्वरांच्या पुढे झुकला नाही. तो पुढे झुकणार नाही असेही पवारांनी ठणकावून सांगितले. राज्याच्या हक्काचा २८ हजार ७०० कोटी रुपये जीएसटी केंद्राकडे थकला आहे. हक्काचे पैसे केंद्र सरकार देत नाही. अतिवृष्टी, चक्रीवादळात मागच्या सरकारपेक्षा आताच्या महाविकास आघाडी सरकारने नुकसानग्रस्तांना जास्तीची मदत दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहनही पवार यांनी केले.

चौकट,

बोलबच्चन बोलताहेत

महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असल्याचे सांगत सार्वजिनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण म्हणाले, नांदेडमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताना राज्य शासन बोलबच्चन असल्याचे म्हटले, मात्र खरे तर हा शब्द भाजपलाच लागू पडतो. १५ लाख रुपये, दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन कोणी दिले होते, असा सवालही त्यांनी केला. पहिल्यांदाच पंजा, घड्याळ आणि धनुष्यबाण एकत्र आल्यामुळे ही निवडणूक अनोखी ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मी पुन्हा येईल, पुन्हा येईल हे ऐकून राज्यातील लोकांच्या कानठळ्या बसल्या आहेत. ज्यांनी मी पुन्हा कुठे येणार याची माहिती नव्हते. ते पुन्हा राज्यात कसे येणार होते, याचा शोध घेण्याची गरज असल्याचेही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.