शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

आमदार बिथरल्यामुळे भाजपची घालमेल

By | Updated: November 28, 2020 04:15 IST

महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ नांदेड येथील ओम गार्डन येथे पदवीधर व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला ...

महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ नांदेड येथील ओम गार्डन येथे पदवीधर व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत हाेते. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी केंद्रीयमंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील, माजीमंत्री अर्जुन खोतकर, खा. हेमंत पाटील, माजीमंत्री कमलकिशोर कदम, आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहन हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकर, आ. शामसुंदर शिंदे, माजी आमदार वसंतराव चव्हाण, सुभाष साबणे, अनुसया खेडकर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम आदींची उपस्थिती होती. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, भाजपातील दिग्गज नेते एकनाथ खडसे, जयसिंगराव गायकवाड हे राष्ट्रवादीत आल्यामुळे आता भाजपला सुरुंग लागला आहे. महाविकास आघाडीचे सरकार चालवताना काहीवेळा अडचणी येत असतील, निर्णय मागेपुढे होत असतील तरी राज्याचे हित हेच आमचे समान धोरण आहे. महाराष्ट्र कधीही दिल्लीश्वरांच्या पुढे झुकला नाही. तो पुढे झुकणार नाही असेही पवारांनी ठणकावून सांगितले. राज्याच्या हक्काचा २८ हजार ७०० कोटी रुपये जीएसटी केंद्राकडे थकला आहे. हक्काचे पैसे केंद्र सरकार देत नाही. अतिवृष्टी, चक्रीवादळात मागच्या सरकारपेक्षा आताच्या महाविकास आघाडी सरकारने नुकसानग्रस्तांना जास्तीची मदत दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहनही पवार यांनी केले.

चौकट,

बोलबच्चन बोलताहेत

महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असल्याचे सांगत सार्वजिनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण म्हणाले, नांदेडमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताना राज्य शासन बोलबच्चन असल्याचे म्हटले, मात्र खरे तर हा शब्द भाजपलाच लागू पडतो. १५ लाख रुपये, दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन कोणी दिले होते, असा सवालही त्यांनी केला. पहिल्यांदाच पंजा, घड्याळ आणि धनुष्यबाण एकत्र आल्यामुळे ही निवडणूक अनोखी ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मी पुन्हा येईल, पुन्हा येईल हे ऐकून राज्यातील लोकांच्या कानठळ्या बसल्या आहेत. ज्यांनी मी पुन्हा कुठे येणार याची माहिती नव्हते. ते पुन्हा राज्यात कसे येणार होते, याचा शोध घेण्याची गरज असल्याचेही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.