शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भाजपा-सेनेचे सरकार निष्क्रिय

By admin | Updated: June 23, 2016 01:14 IST

लातूर : मागील ६० वर्षांपासून मी राजकारणात सक्रिय आहे. आतापर्यंत असले निष्क्रिय सरकार मी पाहिले नाही. आमच्या पक्षाची सत्ता असतानाही दुष्काळ पडला होता.

लातूर : मागील ६० वर्षांपासून मी राजकारणात सक्रिय आहे. आतापर्यंत असले निष्क्रिय सरकार मी पाहिले नाही. आमच्या पक्षाची सत्ता असतानाही दुष्काळ पडला होता. दुष्काळ निवारणासाठी त्यावेळी विविध उपाययोजना राबवून शेतकऱ्यांना दुष्काळातून सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, सध्याच्या सरकारला दुष्काळाची दाहकता समजत नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे केली.जिल्हा परिषदेच्या वतीने समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विविध योजनेतील लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार अमित देशमुख होते. मंचावर आमदार त्रिंबक भिसे, माजी आमदार चंद्रशेखर भोसले, वैजनाथ शिंदे, शिवाजीराव पाटील कव्हेकर, जि.प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, माजी जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, कृषी सभापती कल्याण पाटील, बांधकाम सभापती सपना घुगे, समाजकल्याण सभापती वेणूताई गायकवाड, महिला व बालकल्याण सभापती सुलोचना बिदादा, अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, प्रा.बी.व्ही. मोतीपवळे, सीईओ दिनकर जगदाळे आदी उपस्थित होते.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले, विद्यार्थी दशेपासून मी कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री म्हणूनही नेतृत्व केले आहे. काँग्रेसचे सरकार असताना शेतकऱ्यांचे हिताचे अनेक निर्णय घेतले. मात्र सध्याचे सरकार शेतकरीविरोधी आहे. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न ज्ञात नाहीत. पीककर्जाचे पुनर्गठण या नावाखाली शेतकऱ्यांची चेष्टा या सरकारने लावली आहे. प्रास्ताविक जि.प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी केले. (प्रतिनिधी)