शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
2
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
3
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
4
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
6
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
7
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
9
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
10
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
11
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
12
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
13
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
14
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
15
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
16
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
17
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
18
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
19
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
20
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार

आठ दिवसांतच भाजपा सरकारची पोलखोल सुरू

By admin | Updated: June 1, 2014 00:54 IST

औरंगाबाद : राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केंद्रात सरकार स्थापन होऊन आठ दिवसही उलटत नाही तोच भाजपाच्या नैतिक भ्रष्टाचाराची पोलखोल सुरू झाल्याची टीका केली.

औरंगाबाद : जनतेने मोठ्या अपेक्षेने सत्ता परिवर्तन केले; परंतु देशाच्या मानव विकासमंत्र्यांचे पदवीपर्यंत शिक्षण झालेले नसतानाही पदवीधर असल्याचे त्या सांगत असतील, तर त्यांच्या खरेपणावर लोकांनी काय विश्वास ठेवावा, असा हल्लाबोल करीत राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केंद्रात सरकार स्थापन होऊन आठ दिवसही उलटत नाही तोच भाजपाच्या नैतिक भ्रष्टाचाराची पोलखोल सुरू झाल्याची टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गोदावरी शाळेच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. पाटील म्हणाले की, शिक्षणमंत्र्यांच्या पाठोपाठ गोपीनाथ मुंडे यांच्या पदवीचा वादही उपस्थित झाला आहे. पदवी नसतानाही चांगले काम, चांगले नेतृत्व दिले जाऊ शकते; परंतु भ्रष्टाचाराचा बोलबाला करून सत्तेत आलेली ही मंडळी किती खरे बोलते हे त्यांच्या कृतीवरून दिसते. आपल्याला अभिमान वाटेल, असा उमेदवार निवडा, असे मराठवाड्यातील पदवीधरांना आवाहन करून ते म्हणाले की, काहींच्या नशिबी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील, तर काही मतदारांच्या नशिबी लोखंड घोटाळ्यातील उमेदवार आले; परंतु तुमच्या नशिबी चक्क कंडोम घोटाळ्यातील उमेदवार आला आहे. त्याला तुम्ही निवडलात आणि उद्या कोठे बाहेर गेलात तर काय सांगणार? लाट ओसरणार सतीश चव्हाण यांच्या विजयानंतर देशात आलेली लाट आपोआपच ओसरणार, असे सांगून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे म्हणाले की, १९९२ ते ९९ च्या प्राध्यापकांचा प्रश्न, उच्च महाविद्यालयाचा ‘कायम’ शब्द व औरंगाबादेत विधि विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. राज्यमंत्री फौजिया खान, आ. विक्रम काळे, आ. धनंजय मुंढे, आ. अमर राजूरकर, सतीश चव्हाण आदींची भाषणे झाली. डॉ. बाळासाहेब पवार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मंचावर राज्यमंत्री सुरेश धस, आ. निरंजन डावखरे, आ. अमर राजूरकर, आ. धनंजय मुंढे, आ. जयंत जाधव, आ. डॉ. कल्याण काळे, आ. सुभाष झांबड, आ. सुरेश जेथलिया, आ. एम. एम. शेख, आ. अब्दुल सत्तार, आ. संजय वाघचौरे, आ. विक्रम काळे, आ. चंद्रकांत दानवे, आ. राहुल मोटे, आ. पृथ्वीराज साठे, आ. बदामराव पंडित, कदीर मौलाना, नितीन पाटील, विलास औताडे, मुश्ताक अहमद, रेखा जैस्वाल, विनोद पाटील, अभिजित देशमुख, अफसर खान, नीलेश राऊत, उल्हास उढाण, विजय भांबळे, बाबा जानी, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सोळंके आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शिक्षकांचे सर्वच प्रश्न मार्गी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले की, मी झपाट्याने सर्वच प्रश्न मार्गी लावल्यामुळे कोठेही जाऊन संवाद साधू शकतो. शिक्षणसेवकाचे नामाभिधान बदलले, त्यांच्या मानधनात दुप्पट वाढ केली, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, शाळांचे प्रश्न सोडविले,ज्युनिअर महाविद्यालयांचे कायम विनाअनुदानितमधील कायम हा शब्द काढला, वेतनेतर अनुदान दिले, अनेक प्रश्न सोडविले, काही सोडविण्याचे बाकी आहेत. २० जून नंतर तेही लवकरच सोडविले जातील, असे आश्वासन त्यांनी टाळ्याच्या कडकडाटात दिले. पद्माकर मुळेंची उपस्थिती मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लहाने मामा व उद्योजक पद्माकर मुळे यांची मंचावरील उपस्थिती लक्षणीय होती.