शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जाफराबादमध्ये भाजपसमोर राष्ट्रवादी-शिवसेना पडले फिके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:33 IST

तालुक्यातील दुस-या टप्प्यातील १५ ग्रामपंचायत सरपंच व सदस्यपदांच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकाल जाहीर होताच निवडून आलेले सरपंच व सदस्य आमचेच म्हणत पत्रकबाजी रंगली.

प्रकाश मिरगेजाफराबाद : तालुक्यातील दुस-या टप्प्यातील १५ ग्रामपंचायत सरपंच व सदस्यपदांच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकाल जाहीर होताच निवडून आलेले सरपंच व सदस्य आमचेच म्हणत पत्रकबाजी रंगली. एवढेच नव्हे तर तो आमचाच उमेदवार म्हणत अनेकांनी सेल्फी काढत दावा सुरू केला आहे.तालुक्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात लढत झाली. त्यामुळे शिवसेना तालुका अध्यक्ष बजरंग बोरसे यांनी राष्ट्रवादीने जिंकलेल्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही सोबत मिळून लढविल्या असून, त्यात आमचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. काही कार्यकर्त्यांनी आपल्या सोयीनुसार राजकारण करत इतर पक्षाचा टेकू घेत निवडणुका लढवून जिंकल्या असल्याने ते सगळीकडेच हात ठेवून आहेत. एक मात्र नक्की भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादीला शिवसेनेची साथ घेतसुद्धा अपेक्षित यश मिळालेले नाही. काही ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप असल्याने एका गटाला भाजपचे अधिकृत असताना पाठिंबा दिला असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सरपंच पद एक आणि दावे अनेक असे चित्र रंगले.खासगाव ग्रामपंचायतीमध्ये संतोष लोखंडे यांनी तालुक्यातून विक्रमी मताने निवडून येण्याचा बहुमान मिळविला. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच घुमजाव केल्याने येथे राष्ट्रवादीने पक्षाचा विश्वासघात केला असल्याची भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे गावात राष्ट्रवादीचे काम मोठे हा नुसता गवगवा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या ठिकाणी एकतर्फी निवडणुक झाली.प्रतिष्ठतेच्या समजल्या जाणाºया खासगाव आणि काळेगाव या ग्रामपंचायती पूर्वीप्रमाणे विद्यमान जिल्हा परिषदेचे सदस्य लिलाबाई लोखंडे व शालीकराम म्हस्के यांनी बहुमताने ताब्यात ठेवल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या विद्यमान कृषी सभापती जिजाबाई कळंबे यांची गारखेडा-टाकली ग्रामपंचायत भाजपाने ताब्यात घेतली.भाजपाने चापणेर- धोंडखेडा, येवता, आसई, खासगाव, सवासनी, नळविहरा, मेरखेडा, सावरगाव म्हस्के, काळेगाव,डावरगाव देवी, गारखेडा-टाकळी, खानापूर-वरखेडा फिरंगी या ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने चापणेर-धोंडखेडा, येवता, माहोरा, आसई, घानखेडा, नळविहरा, डावरगाव देवी, तर शिवसेनेने रास्तळ वानखेडा यावर दावा सांगितला आहे. पंधरा ग्रामपंचायतीत नवीन सरपंच आणि त्यांचे सदस्य निवडून आल आहेत, असे असले तरी सगळ्यांनी मिळून दावा वीसचा केला आहे. त्यामुळे खरे चित्र काय हे लवकरच स्पष्ट होणार आहे. खानापूर ग्रामपंचायत या आधीच बिनविरोध झाली आहे.--------------------ग्रामपंचायत निहाय सरंपच पुढील प्रमाणेखासगाव- संतोष रामराव लोखंडे,मेरखेडा- श्रीकृष्णा शालीकराम जाधव,घानखेडा- सरस्वती राजू बोराडे,रास्तळ- वानखेडा- शिवगंगा संतोष जाधव,नळविहीरा- मिनाबाई रमेश गाडेकर,सवासणी- रेखा समाधान गाडेकर,आसई- अनिता विलास इंगळे,माहोरा- वैशाली रविद्र कासोद,येवता- अवचितराव महादु दळवीकाळेगाव- अन्नपुर्णा वसंतराव चव्हाण,सावरगाव म्हस्के- दिनकर देवराव म्हस्केगारखेडा-टाकळी - मनिषा गजानन कळंबे,डावरगाव देवी- अनिल बळीराम नवलेचापनेर- धोंडखेडा - लताबाई विक्रम साळेकर,खानापूर-वरखेडा फिरंगी- पंचफुला देविदास शेळके