शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

जाफराबादमध्ये भाजपसमोर राष्ट्रवादी-शिवसेना पडले फिके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:33 IST

तालुक्यातील दुस-या टप्प्यातील १५ ग्रामपंचायत सरपंच व सदस्यपदांच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकाल जाहीर होताच निवडून आलेले सरपंच व सदस्य आमचेच म्हणत पत्रकबाजी रंगली.

प्रकाश मिरगेजाफराबाद : तालुक्यातील दुस-या टप्प्यातील १५ ग्रामपंचायत सरपंच व सदस्यपदांच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकाल जाहीर होताच निवडून आलेले सरपंच व सदस्य आमचेच म्हणत पत्रकबाजी रंगली. एवढेच नव्हे तर तो आमचाच उमेदवार म्हणत अनेकांनी सेल्फी काढत दावा सुरू केला आहे.तालुक्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात लढत झाली. त्यामुळे शिवसेना तालुका अध्यक्ष बजरंग बोरसे यांनी राष्ट्रवादीने जिंकलेल्या ग्रामपंचायतमध्ये आम्ही सोबत मिळून लढविल्या असून, त्यात आमचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. काही कार्यकर्त्यांनी आपल्या सोयीनुसार राजकारण करत इतर पक्षाचा टेकू घेत निवडणुका लढवून जिंकल्या असल्याने ते सगळीकडेच हात ठेवून आहेत. एक मात्र नक्की भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादीला शिवसेनेची साथ घेतसुद्धा अपेक्षित यश मिळालेले नाही. काही ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप असल्याने एका गटाला भाजपचे अधिकृत असताना पाठिंबा दिला असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सरपंच पद एक आणि दावे अनेक असे चित्र रंगले.खासगाव ग्रामपंचायतीमध्ये संतोष लोखंडे यांनी तालुक्यातून विक्रमी मताने निवडून येण्याचा बहुमान मिळविला. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच घुमजाव केल्याने येथे राष्ट्रवादीने पक्षाचा विश्वासघात केला असल्याची भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे गावात राष्ट्रवादीचे काम मोठे हा नुसता गवगवा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या ठिकाणी एकतर्फी निवडणुक झाली.प्रतिष्ठतेच्या समजल्या जाणाºया खासगाव आणि काळेगाव या ग्रामपंचायती पूर्वीप्रमाणे विद्यमान जिल्हा परिषदेचे सदस्य लिलाबाई लोखंडे व शालीकराम म्हस्के यांनी बहुमताने ताब्यात ठेवल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या विद्यमान कृषी सभापती जिजाबाई कळंबे यांची गारखेडा-टाकली ग्रामपंचायत भाजपाने ताब्यात घेतली.भाजपाने चापणेर- धोंडखेडा, येवता, आसई, खासगाव, सवासनी, नळविहरा, मेरखेडा, सावरगाव म्हस्के, काळेगाव,डावरगाव देवी, गारखेडा-टाकळी, खानापूर-वरखेडा फिरंगी या ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने चापणेर-धोंडखेडा, येवता, माहोरा, आसई, घानखेडा, नळविहरा, डावरगाव देवी, तर शिवसेनेने रास्तळ वानखेडा यावर दावा सांगितला आहे. पंधरा ग्रामपंचायतीत नवीन सरपंच आणि त्यांचे सदस्य निवडून आल आहेत, असे असले तरी सगळ्यांनी मिळून दावा वीसचा केला आहे. त्यामुळे खरे चित्र काय हे लवकरच स्पष्ट होणार आहे. खानापूर ग्रामपंचायत या आधीच बिनविरोध झाली आहे.--------------------ग्रामपंचायत निहाय सरंपच पुढील प्रमाणेखासगाव- संतोष रामराव लोखंडे,मेरखेडा- श्रीकृष्णा शालीकराम जाधव,घानखेडा- सरस्वती राजू बोराडे,रास्तळ- वानखेडा- शिवगंगा संतोष जाधव,नळविहीरा- मिनाबाई रमेश गाडेकर,सवासणी- रेखा समाधान गाडेकर,आसई- अनिता विलास इंगळे,माहोरा- वैशाली रविद्र कासोद,येवता- अवचितराव महादु दळवीकाळेगाव- अन्नपुर्णा वसंतराव चव्हाण,सावरगाव म्हस्के- दिनकर देवराव म्हस्केगारखेडा-टाकळी - मनिषा गजानन कळंबे,डावरगाव देवी- अनिल बळीराम नवलेचापनेर- धोंडखेडा - लताबाई विक्रम साळेकर,खानापूर-वरखेडा फिरंगी- पंचफुला देविदास शेळके