शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

भोकरदन बाजार समितीवर भाजपाचा झेंडा

By admin | Updated: September 15, 2015 00:31 IST

भोकरदन : भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती भाजपाचे तालुकाध्यक्ष कौतिकराव जगताप तर उपसभापती रामलाल चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

भोकरदन : भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती भाजपाचे तालुकाध्यक्ष कौतिकराव जगताप तर उपसभापती रामलाल चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.बाजार समितीच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी विनय धोटे, सचिव दादाराव दळवी, संतोष ढाले यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची बैठक घेण्यात आली. यावेळी सभापती पदासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष कौतिकराव जगताप यांनी तर उपसभापतीपदासाठी भाजपाचेच रामलाल चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही पदाधिकारी बिनविरोध निवडूण आल्याचे जाहीर केले़ बाजार समितीमध्ये भाजपाचे १४ शिवसेनेचे ३ व एक सदस्य काँग्रेसचा आहे. त्यामुळे बाजार समितीचे पदाधिकारी हे भाजपाचेच होणार हे सुरूवाती पासूनच स्पष्ट होते. निवड जाहीर होताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली.यावेळी आमदार संतोष दानवे, निर्मलाताई दानवे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, गणेश बापु फुके, राजेंद्र देशमुख,सभापती संगिता लोखडे, अरूण वाघ, मुकेश चिने,तात्याराव रगडे, कमलाकर सांबळे, रामेश्वर सोनुने, विश्वास सपकाळ, गणेश ठाले, इम्रान पठाण, बालाजी औटी, समाधान शेरकर, गणेशराव वराडे, अनिल गांवडे, जयेश थारेवाल,रमेश मोकासे, मधुकर मुकूटराव, सर्जेराव बरडे, प्रा़ विजय मिसाळ, गजानन तांदुळजे, शांताराम गव्हाणे, गणेश देशमुख, प्रल्हाद शिंदे, लताबाई जाधव, शिलाबाई वाघ,सुमनबाई शेरकर,पंढरिनाथ खरात, सुरेश शर्मा, राजेश जोशी, इरफान पठाण, विठ्ठल चिंचपुरे, रावसाहेब कोरडे, राजकुमार राजपुत, रमेश मुरकुटे, राहुल ठाकुर, यांच्यासह तालुक्यातील भाजपाचे पदाअधिकारी उपस्थीतीत होते़ भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला उपसभापतीपदापासुन दुर ठेऊन अन्याय केल्यामुळे येणाऱ्या काळातील सर्व स्थानिक सहकारी संस्थेच्या निवडणुका स्वंतत्र लढविण्यात येतील असा इशारा तालुका प्रमुख कैलास पुंगळे यांनी दिला आहे़४पुंगळे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की बाजार समितीची निवडणुक ही भाजपा व सेनेने युतीतुन लढविली होती यामध्ये युतीचे सर्व पॅनल निवडून आले सत्तेच्या भागीदारी मध्ये ६०/४० प्रमाणे सेनेला उपसभापती पद आवश्यक होते मात्र भाजपाच्या संचालकानी खा़रावसाहेब दानवे व आ़ संतोष दानवे यांची दिशाभुल करून दोन्ही पदे भाजपाच्या पदरात पाडुन घेण्याचे चुकीचे काम केले असुन खा़ दानवे यांनी सुध्दा सेनेवर आन्याय केला आहे.