शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

ग्रामीण भागातही विस्तारतोय भाजप

By admin | Updated: February 25, 2017 00:37 IST

उस्मानाबाद : भाजपाला ग्रामीण भागात फारसा जनाधार नसून काँग्रेसची तळागळातील घटकांसोबत नाळ जोडलेली आहे

उस्मानाबाद : भाजपाला ग्रामीण भागात फारसा जनाधार नसून काँग्रेसची तळागळातील घटकांसोबत नाळ जोडलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा दावा करणाऱ्या जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेतेमंडळीवर आता आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे. कारण पंचायत समितीचे ३६ मतदारसंघ असे आहेत की जेथे भाजपाच्या उमेदवारांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मागे टाकून पुढे सरकले आहेत. भाजपाची ही मजल येणाऱ्या काळात काँग्रेससाठी आव्हान निर्माण करणारी ठरू शकते.केंद्र तसेच राज्यातील भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत, नोटबंदीमुळे सर्वाधिक फटका शेतकरी, शेतमजुरांना बसला, शेतीमालाला योग्य दर मिळत नाही अशा विविध मुद्यांचे दाखले देत काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस भक्कमपणे उभी राहील, असा दावा केला जात होता. एवढेच नाही तर याच मुद्यांभोवती काँग्रेसचा अख्खा प्रचार फिरला. काही मंडळीकडून भाजपाकडे ग्रामीण भागात फारसा जनाधारही नाही, असे सांगण्यात येत होते. परंतु, मागील दोन-अडीच वर्षात भाजपाकडून शहरांसोबतच ग्रामीण भागतही पाळेमुळे घट्ट करण्यावर भर दिला गेला. त्याचे परिणाम पालिका आणि नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही दिसून आले. जिल्हाभरातील पंचायत समितीचे ३६ मतदार संघ असे आहेत की तेथे काँग्रेस उमेदवारांपेक्षाही जास्त मतदान भाजपाच्या उमेदवारांनी घेतले आहे. त्यामुळे भाजपाला ग्रामीण भागात जनाधार नाही, असा दावा करणाऱ्या काँग्रेस पुढाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. विशेष म्हणजे, ३६ पैकी जवळपास १५ उमेदवार हे एकट्या उस्मानाबाद तालुक्यातील आहेत. यामध्ये कोंड, तेर, आळणी, कसबे तडवळे, वाघोली, सांजा, चिखली, पाडोळी, समुद्रवाणी, केशेगाव, करजखेडा, बेंबळी, रूईभर, वडगाव सि. आणि चिलवडी या गणांचा समावेश आहे.