शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

ग्रामीण भागातही विस्तारतोय भाजप

By admin | Updated: February 25, 2017 00:37 IST

उस्मानाबाद : भाजपाला ग्रामीण भागात फारसा जनाधार नसून काँग्रेसची तळागळातील घटकांसोबत नाळ जोडलेली आहे

उस्मानाबाद : भाजपाला ग्रामीण भागात फारसा जनाधार नसून काँग्रेसची तळागळातील घटकांसोबत नाळ जोडलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा दावा करणाऱ्या जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेतेमंडळीवर आता आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे. कारण पंचायत समितीचे ३६ मतदारसंघ असे आहेत की जेथे भाजपाच्या उमेदवारांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मागे टाकून पुढे सरकले आहेत. भाजपाची ही मजल येणाऱ्या काळात काँग्रेससाठी आव्हान निर्माण करणारी ठरू शकते.केंद्र तसेच राज्यातील भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत, नोटबंदीमुळे सर्वाधिक फटका शेतकरी, शेतमजुरांना बसला, शेतीमालाला योग्य दर मिळत नाही अशा विविध मुद्यांचे दाखले देत काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस भक्कमपणे उभी राहील, असा दावा केला जात होता. एवढेच नाही तर याच मुद्यांभोवती काँग्रेसचा अख्खा प्रचार फिरला. काही मंडळीकडून भाजपाकडे ग्रामीण भागात फारसा जनाधारही नाही, असे सांगण्यात येत होते. परंतु, मागील दोन-अडीच वर्षात भाजपाकडून शहरांसोबतच ग्रामीण भागतही पाळेमुळे घट्ट करण्यावर भर दिला गेला. त्याचे परिणाम पालिका आणि नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही दिसून आले. जिल्हाभरातील पंचायत समितीचे ३६ मतदार संघ असे आहेत की तेथे काँग्रेस उमेदवारांपेक्षाही जास्त मतदान भाजपाच्या उमेदवारांनी घेतले आहे. त्यामुळे भाजपाला ग्रामीण भागात जनाधार नाही, असा दावा करणाऱ्या काँग्रेस पुढाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. विशेष म्हणजे, ३६ पैकी जवळपास १५ उमेदवार हे एकट्या उस्मानाबाद तालुक्यातील आहेत. यामध्ये कोंड, तेर, आळणी, कसबे तडवळे, वाघोली, सांजा, चिखली, पाडोळी, समुद्रवाणी, केशेगाव, करजखेडा, बेंबळी, रूईभर, वडगाव सि. आणि चिलवडी या गणांचा समावेश आहे.