शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

ग्रामीण भागातही विस्तारतोय भाजप

By admin | Updated: February 25, 2017 00:37 IST

उस्मानाबाद : भाजपाला ग्रामीण भागात फारसा जनाधार नसून काँग्रेसची तळागळातील घटकांसोबत नाळ जोडलेली आहे

उस्मानाबाद : भाजपाला ग्रामीण भागात फारसा जनाधार नसून काँग्रेसची तळागळातील घटकांसोबत नाळ जोडलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा दावा करणाऱ्या जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेतेमंडळीवर आता आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे. कारण पंचायत समितीचे ३६ मतदारसंघ असे आहेत की जेथे भाजपाच्या उमेदवारांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मागे टाकून पुढे सरकले आहेत. भाजपाची ही मजल येणाऱ्या काळात काँग्रेससाठी आव्हान निर्माण करणारी ठरू शकते.केंद्र तसेच राज्यातील भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत, नोटबंदीमुळे सर्वाधिक फटका शेतकरी, शेतमजुरांना बसला, शेतीमालाला योग्य दर मिळत नाही अशा विविध मुद्यांचे दाखले देत काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस भक्कमपणे उभी राहील, असा दावा केला जात होता. एवढेच नाही तर याच मुद्यांभोवती काँग्रेसचा अख्खा प्रचार फिरला. काही मंडळीकडून भाजपाकडे ग्रामीण भागात फारसा जनाधारही नाही, असे सांगण्यात येत होते. परंतु, मागील दोन-अडीच वर्षात भाजपाकडून शहरांसोबतच ग्रामीण भागतही पाळेमुळे घट्ट करण्यावर भर दिला गेला. त्याचे परिणाम पालिका आणि नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही दिसून आले. जिल्हाभरातील पंचायत समितीचे ३६ मतदार संघ असे आहेत की तेथे काँग्रेस उमेदवारांपेक्षाही जास्त मतदान भाजपाच्या उमेदवारांनी घेतले आहे. त्यामुळे भाजपाला ग्रामीण भागात जनाधार नाही, असा दावा करणाऱ्या काँग्रेस पुढाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. विशेष म्हणजे, ३६ पैकी जवळपास १५ उमेदवार हे एकट्या उस्मानाबाद तालुक्यातील आहेत. यामध्ये कोंड, तेर, आळणी, कसबे तडवळे, वाघोली, सांजा, चिखली, पाडोळी, समुद्रवाणी, केशेगाव, करजखेडा, बेंबळी, रूईभर, वडगाव सि. आणि चिलवडी या गणांचा समावेश आहे.