शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

भाजपाने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2017 00:03 IST

परभणी : निवडणुकीच्या काळात भाजपाने खोटी आश्वासने दिली़ शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले असल्याचा आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्ता बैठकीत बोलताना केला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : निवडणुकीच्या काळात भाजपाने खोटी आश्वासने दिली़ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत शब्दांचा खेळ करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले असल्याचा आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत बोलताना केला़राष्ट्रवादीच्या वतीने पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी पक्षाचे नेते जिल्हा दौऱ्यावर आले होते़ यानिमित्त शहरातील राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांची बुधवारी सकाळी ११ वाजता बैठक घेण्यात आली़ यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार बोलत होते़ व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ़ चित्रा वाघ, जिल्हा प्रभारी प्रकाश सोळंके, आ़ विजय भांबळे, जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ मधुसूदन केंद्रे, युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील, माजी खा़ गणेशराव दुधगावकर, जि़ प़ अध्यक्षा उज्ज्वला राठोड, आ़ रामराव वडकुते, प्रताप देशमुख, राजेश विटेकर, स्वराजसिंह परिहार आदींची उपस्थिती होती़ अजित पवार म्हणाले, भाजपाने निवडणुकीत खोटी आश्वासने दिली़ डिझेल, पेट्रोलच्या दरात दररोज वाढ होत आहे़ शेतमालाला भाव दिला जात नाही़ कर्जमाफीबाबत शब्दांचा खेळ केला जात आहे़ परभणी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात एक तरी नवा उद्योग या सरकारने आणला आहे़, असा सवाल करून ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जावून पक्षाचे विचार रुजविण्यासाठी प्रयत्न करावेत़ जिल्हा परिषदेत पक्ष सत्तेत असल्याने लोकोपयोगी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे, परभणी महानगरपालिकेत सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी़ पक्षांतर्गत मतभेद असतील तर आपसात बसून मिटवावेत किंवा पक्षश्रेष्ठींसमोर मांडावेत़ प्रसार माध्यमांपर्यंत पोहचून हे मतभेद चव्हाट्यावर आणू नका, असे आवाहनही त्यांनी केले़ पदाधिकाऱ्यांनीही निर्णय घेताना कार्यकर्त्यांची मते जाणून घ्यावी, असे सांगून अजित पवार यांनी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये पक्षसंघटनाबाबत घेतलेल्या निर्णयावर अप्रत्यक्षपणे भाष्य केले़ यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कामाला लागावे़ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाकाजाचा दर दोन-तीन महिन्याला आढावा घेतला जाईल़, पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपसात समन्वय ठेवून काम करावे़ दरम्यान, दिवसभर पक्षाच्या विविध सेलची तसेच तालुकानिहाय पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली़ तसेच अजीत पवार व सुनील तटकरे यांनी वैयक्तीकरित्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही चर्चा केली़ सायंकाळी परभणी शहरातील नगरसेवकांची बैठक झाली़ या बैठकीत काही नगरसेवकांनी महापौर पदासाठी पक्षाने निवडलेल्या अपक्ष उमेदवाराविषयी व मनपातील गटनेत्याविषयी तक्रारी केल्या़ तसेच विश्वासात घेऊन संबंधितांची निवड केली नसल्याचे सांगितले़ आ़ दुर्राणी यांनी मात्र पक्ष हितासाठीच निर्णय घेतला असल्याचे सांगितले़