शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

भाजपही स्वबळाच्या तयारीत

By admin | Updated: March 31, 2015 00:41 IST

औरंगाबाद : गुलमंडी, राजाबाजारसह अनेक प्रतिष्ठेच्या वॉर्डांमुळे सेना- भाजपच्या युतीचे घोडे अडले आहे. जर युती जमलीच नाही तर मनपाचे सर्वच्या सर्व ११३ वॉर्ड लढविण्याचा इरादा भाजपने केला आहे.

औरंगाबाद : गुलमंडी, राजाबाजारसह अनेक प्रतिष्ठेच्या वॉर्डांमुळे सेना- भाजपच्या युतीचे घोडे अडले आहे. जर युती जमलीच नाही तर मनपाचे सर्वच्या सर्व ११३ वॉर्ड लढविण्याचा इरादा भाजपने केला आहे. त्यासाठी मंगळवारपासून सर्व वॉर्डांच्या मुलाखतीचा कार्यक्रम भाजपने जाहीर केला आहे. सेनेनेही ‘युती’ची वाट न पाहता दोन दिवसांपूर्वी सर्व हिंदूबहुल वॉर्डांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन ठेवल्या होत्या. भाजपनेही संपूर्ण वॉर्डांचा मुलाखत कार्यक्रम घोषित करून एकप्रकारे सेनेला शहच देण्याचा प्रयत्न केला आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या अनेक निवडणुका सेना- भाजपने ‘युती’त लढलेल्या आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांचे संबंध चांगलेच बिघडले. तेथे ‘युती’ दुभंगली.मात्र, आता मनपाच्या निवडणुका एकत्रपणे लढवाव्यात, असा सेना- भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सूर दिसून येत आहे. आठ दिवसांपूर्वी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ‘युती’ होणार असे जाहीर केले होते. सोमवारी दानवे यांनी अचानक ‘यू टर्न’ घेतला. सेनेचा बालेकिल्ला असलेला गुलमंडी वॉर्ड भाजप सेनेला कदापि सोडणार नाही, असे सांगत त्यांनी एकप्रकारे युती होणार नसल्याचे संकेतच दिले.दरम्यान, अनेक महत्त्वपूर्ण वॉर्डांच्या वाटपावरून युतीचे घोडे अडलेले आहे. दोन्ही पक्ष आपापला हट्ट सोडायला तयार नाहीत. त्यातच युतीची बोलणी सुरू असतानाच शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी ११३ पैकी ९० वॉर्डांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यात ‘युती’त आतापर्यंत भाजपच्या वाट्याला असलेल्या वॉर्डांसाठीही सेनेने मुलाखती घेऊन टाकल्या. ही बाब भाजपला पचनी पडलेली दिसत नाही. त्यामुळेच भाजपनेही सेनेला शह देण्यासाठी ‘शत- प्रतिशत’ तयारी सुरू केली आहे. सेनेने तरी ९० वॉर्डांसाठी मुलाखती घेतल्या होत्या. भाजपने त्यापुढे जाऊन संपूर्ण ११३ वॉर्डांसाठी मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ३१ मार्च आणि १ एप्रिल अशा दोन दिवस या मुलाखती होणार आहेत.