औरंगाबाद : कमी पावसामुळे पाण्याचा साठा कमी झाला, त्यामुळे पाणपक्ष्यांच्या संख्येतही मोठी घट झाल्याची धक्कादायक माहिती वन विभागाने रविवारी केलेल्या पाणपक्षीगणनेतून समोर आली आहे. जायकवाडी, सुखनासह जिल्ह्यातील तब्बल १६ ठिकाणी ही गणना करण्यात आली. पाणीसाठे कमी झाल्याने जायकवाडीसारख्या प्रकल्पावर येणाऱ्या पाणपक्ष्यांची संख्या तब्बल ५० टक्क्यांनी घटल्याची माहिती पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक यांनी दिली. सुखना येथे पाच वर्षांपूर्वी १५०० फ्लेमिंगो यायचे. या गणनेत ही संख्या केवळ ७०वर आल्याचे स्पष्ट झाले. पाणीसाठा कमी होण्यासोबतच तलावातील अतिक्रमण, पाण्याचा बेसुमार उपसा याचाही परिणाम झाला आहे. ४फ्लेमिंगो - २५०४रंगीत करकोचा - ४५४पानभिंगरी - १५००४पाणकावळे - ४०००४हंस - ४५०४आभोळी - ३५००४चांदवा बदक - ४०००४पाणडुबी - ३५००४तलवाट बदक - १५००४लालसरी बदक - २०००४सूरय - ४५००४चिखल्या - २०००४तुतवार - ३०००४परी बदक - ५००४मच्छीमारांनी पाण्यात लावलेले जाळे अनेक वेळा मच्छीमारांच्या जिवावर बेतते. जायकवाडी पंपिंग स्टेशनवर अशाच एका जाळ्यातून किशोर पाठक आणि डीएफओ सुनील ओव्हळ यांनी दोन पक्ष्यांची सुटका केली. ४या गणनेत मिलिंद गिरधारी, ए.व्ही. बिडवे, आरएफओ कापुरे, अथर्व कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला. ४ढेकू - १२०० पक्षी(अत्यल्प पाणी)४शिवना टाकळी - ४००(२५ टक्के पाणी)४सुखना - ३०००(५ टक्के पाणी)४सांजूळ - २०० (४० टक्के पाणी)४अंधारी - ३००४तोंडापूर - १८०४अंबाडी - २४०४गडदगड - ४३००४पूर्णा नेवपूर - ९००४टेंभापुरी - ४१०४घाणेवाडी (जालना) - ६५०
पाणीसाठा नसल्याने पक्ष्यांनी फिरवली पाठ
By admin | Updated: December 23, 2014 00:23 IST