शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर, रुग्णालयांवर गुन्हे मात्र, पुढे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शासकीय असो की खासगी रुग्णालये येथील बायोमेडिकल वेस्टची रोज शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : शासकीय असो की खासगी रुग्णालये येथील बायोमेडिकल वेस्टची रोज शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मात्र, या नियमालाच अनेक रुग्णालये केराची टोपली दाखवत असून, उघड्यावर सर्रास जैविक कचरा फेकला जात आहे. परिणामी संसर्गाचा धोका निर्माण होत आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल होऊनही कायद्यातील पळवाटांमुळे संबंधित रुग्णालयांवर कठोर कारवाई होत नसल्याची परिस्थिती आहे.

गेल्या आठवडाभरात वाळूज बजाज नगरात उघड्यावर बायोवेस्ट फेकल्याची दोन प्रकरणे उघडकीस आली. शहरात रेल्वे स्टेशन परिसरात जैववैद्यकीय कचरा आढळला होता. घाटी, जिल्हा रुग्णालयासह अनेक ठिकाणी उघड्यावर मास्क, पीपीई कीट, हातमोजे आढळून आल्याचे ‘लोकमत’ने समोर आणले होते. कोरोनामुळे पीपीई कीट, मास्क, हातमोजे, फेसशिल्डचा वापर वाढलेला आहे. परिणामी बायोमेडिकल वेस्टच्या प्रमाणात दुप्पटीने वाढ झाली आहे. एकट्या औरंगाबाद शहरात २ ते ३ टन म्हणजे महिन्याकाठी सुमारे ७५ ते ९० टन जैववैद्यकीय कचरा निघतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अधिक खर्च येत असल्याने त्यातून पळ काढत अनेक रुग्णालये वर्गीकरणाला फाटा देत ओला कचरा सुक्या कचऱ्यात मिसळणे, उघड्यावर फेकण्याचे प्रकार करतात. करार असूनही कचरा संकलन करणारी संस्था नियमितपणे कचरा वेळच्या वेळी उचलत नसल्याची ओरडही रुग्णालयांकडून होते. कचरा उघड्यावर फेकला जात असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड होत आहे. याविषयी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रुग्णालय परवानगीवेळी बायोमेडिकल वेस्ट विल्हेवाटीची यंत्रणा तपासली जाते. मात्र, त्यानंतर नगरपालिका, ग्रामपंचायत, मनपाकडून यासंबंधी लक्ष ठेवून कारवाई करणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

---

दोषींचा शोध सुरुच

या प्रकरणात केवळ गुन्हे दाखल होतात. मात्र, अशा प्रकरणांची वर्षानुवर्षे चाैकशी, सुनावण्या सुरु राहतात. कचरा नेमका कोणी फेकला, कोण दोषी आहे, यातच यंत्रणा अडकलेली असते. त्यामुळे प्रत्यक्षात दोषी रुग्णालयांवर ठोस कारवाईच होत नसल्याची स्थिती असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

---

सर्व रुग्णालयांनी नोंदणी करावी

रुग्णालयातील खाटांनुसार वाॅटरग्रेस बायोमेडिकल वेस्ट विल्हेवाट लावण्यासाठी पैसे आकारते. नोंदणी केलेली रुग्णालये पैसे भरत असताना कचरा रस्त्यावर कशासाठी फेकतील. मात्र, ज्यांनी त्या कंपनीकडे नोंदणी केली नाही, त्यांनी नोंदणी करुन घेतली पाहिजे. तसेच या कचरा फेकण्याच्या प्रकरणात काही खोडसाळपणाही होतो. त्याची योग्य चौकशी होऊन कारवाई व्हावी तसेच ती कंपनी दररोज कचरा उचलते का, याचेही माॅनिटरिंग व्हायला हवे. वैद्यकीय कचरा उघड्यावर फेकला जाऊ नये. जे फेकतील त्याची शहानिशा करुन दंड आकारण्यासंबंधी मनपा आयुक्तांकडे संबंधित सर्व यंत्रणेची बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला आहे.

- डाॅ. संतोष रंजलकर, अध्यक्ष, आयएमए, औरंगाबाद शाखा