शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

अजिंठा डोंगर रांगातील जैवविविधता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:05 IST

श्यामकुमार पुरे सिल्लोड : अजिंठा लेण्याच्या दिशेने प्रवास करताना फिकट गुलाबी गुच्छ लगडलेल्या ग्लिरीसिडियाच्या अर्थात उंदीरमारीच्या झाडांना फुलांचा बहार ...

श्यामकुमार पुरे

सिल्लोड : अजिंठा लेण्याच्या दिशेने प्रवास करताना

फिकट गुलाबी गुच्छ लगडलेल्या ग्लिरीसिडियाच्या अर्थात उंदीरमारीच्या झाडांना फुलांचा बहार आला आहे. मात्र सावधान ही चादर विदेशी असून पर्यावरणास व स्थानिक जैवविविधतेस हानीकारक आहे. या झाडाची साधी काडी जरी लावली तरी झाड वाढते. बिया जमिनीवर पडल्या तरी रोप वाढीस लागतात. पानाफुलांच्या वासाने उंदीर, घूस, साप, पाल दूर पळतात. या झाडाच्या मुळ्या आजूबाजूला इतक्या पसरतात की दुसरे देशी, उपयुक्त झाड वा कोणतीही वनस्पती तिथे उगतच नाही. ही झाडे आता शेतकऱ्यांनी बांधावर, घराजवळ लावली आहेत. त्यामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे.

सहज जगणारी झाडे १९७० च्या दशकाच्या शेवटी

वन विभागाने ही मूळची अमेरिकेतील विदेशी सहज जगणारी, पटकन वाढणारी झाडे हरित वने निर्माण करण्यासाठी वृक्ष लागवड करण्यास सुरुवात केली. फक्त अजिंठ्याच्याच नव्हे तर पळशी, औरंगाबाद जवळचे डोंगर, गौताळा, तालुक्यातील सर्व सामाजिक व प्रादेशिक फॉरेस्टच्या जागेवर ही झाडे लावण्यात आली आहेत. परंतु हळूहळू या झाडापासून होणारे दुष्परिणाम समोर आले आहे. या झाडाखाली कोणतेही देशी गवत उगवत नाही. या झाडांवर कसलाही अधिवास (इको सिस्टीम) नाही. उंदीरमारीच्या झाडाचे शास्त्रीय नाव "ग्लिरीसीडीया सेपीयम" असे आहे. यास आता गिरीपुष्प असे भारतीय, पुरातन भासणारे नाव मिळून तो आपल्या स्थानिक जैवविविधता धोक्यात आल्या आहेत. झुडूप, वेल, लहान सहान वनस्पती उगवत नाही आणि जगतही नाही. या झाडांच्या पाना फुलांमध्ये "इकोस्ट्रेनॉ इक ऍसिड व ग्लिरीसीडीन" या अनेक वासाची रासायनिक घटक आढळतात. त्यावासाने उंदीर, घूस, साप, पाल, पक्षी, माकडे दूर पळतात. जंगलात जिथे ही झाडे तिथे चराऊ गवत उगवत नाही. त्यावर गुजराण करणारे 'ग्रासलँड बर्ड' नाही. तशीच अवस्था अनेक उपयुक्त वेली व झुडुपांची झाली आहे. त्यावर आधारित अन्न साखळी विस्कटली. देशी पर्यावरणास उपयुक्त झाडे वाढायला संधीच ही विदेशी झाडे देत नाहीत. गेल्या चाळीस वर्षांत मोठी हानी आपल्या जैवविविधतेची झाली आहे.

डोंगरालगतच्या अनेक गावांत विषारी साप, सरपटणारे प्राणी, माकडे यांचा गावात वावर अधिक वाढला. त्यामुळे गावकरी त्रस्त झाले होते. त्याचे कारणही हीच झाडे आहेत. जंगलात सर्वत्र ही झाडे असल्याने तिथे राहणे या प्राण्यांना अशक्य झाले. त्याचा अधिवास धोक्यात आला म्हणून ती गावाकडे आली. अनेक गावात माकडे धुमाकूळ घालतात. कारण त्यांनाही जंगलात राहणे दुरापास्त झाले आहे. वडाच्या एका झाडावर २८ जातींचे पक्षी, १० हून अधिक जातींचे फुलपाखरे व कीटक अधिवास करतात. विपुल मात्रेत प्राणवायू वातावरण निर्माण होतो. आपण देशी व उपयुक्त वृक्षलागवड करून पर्यावरणाचे संवर्धन करण्याची गरज आहे. - डॉ. संतोष पाटील, अभिनव प्रतिष्ठान, सिल्लोड

----------

(फोटो) कॅप्शन

- हेच ते उंदीर मारीचे ग्लिरीसिडीचे झाड.

सूचना:-फोटो आहे