शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

अजिंठा डोंगर रांगातील जैवविविधता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:05 IST

श्यामकुमार पुरे सिल्लोड : अजिंठा लेण्याच्या दिशेने प्रवास करताना फिकट गुलाबी गुच्छ लगडलेल्या ग्लिरीसिडियाच्या अर्थात उंदीरमारीच्या झाडांना फुलांचा बहार ...

श्यामकुमार पुरे

सिल्लोड : अजिंठा लेण्याच्या दिशेने प्रवास करताना

फिकट गुलाबी गुच्छ लगडलेल्या ग्लिरीसिडियाच्या अर्थात उंदीरमारीच्या झाडांना फुलांचा बहार आला आहे. मात्र सावधान ही चादर विदेशी असून पर्यावरणास व स्थानिक जैवविविधतेस हानीकारक आहे. या झाडाची साधी काडी जरी लावली तरी झाड वाढते. बिया जमिनीवर पडल्या तरी रोप वाढीस लागतात. पानाफुलांच्या वासाने उंदीर, घूस, साप, पाल दूर पळतात. या झाडाच्या मुळ्या आजूबाजूला इतक्या पसरतात की दुसरे देशी, उपयुक्त झाड वा कोणतीही वनस्पती तिथे उगतच नाही. ही झाडे आता शेतकऱ्यांनी बांधावर, घराजवळ लावली आहेत. त्यामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे.

सहज जगणारी झाडे १९७० च्या दशकाच्या शेवटी

वन विभागाने ही मूळची अमेरिकेतील विदेशी सहज जगणारी, पटकन वाढणारी झाडे हरित वने निर्माण करण्यासाठी वृक्ष लागवड करण्यास सुरुवात केली. फक्त अजिंठ्याच्याच नव्हे तर पळशी, औरंगाबाद जवळचे डोंगर, गौताळा, तालुक्यातील सर्व सामाजिक व प्रादेशिक फॉरेस्टच्या जागेवर ही झाडे लावण्यात आली आहेत. परंतु हळूहळू या झाडापासून होणारे दुष्परिणाम समोर आले आहे. या झाडाखाली कोणतेही देशी गवत उगवत नाही. या झाडांवर कसलाही अधिवास (इको सिस्टीम) नाही. उंदीरमारीच्या झाडाचे शास्त्रीय नाव "ग्लिरीसीडीया सेपीयम" असे आहे. यास आता गिरीपुष्प असे भारतीय, पुरातन भासणारे नाव मिळून तो आपल्या स्थानिक जैवविविधता धोक्यात आल्या आहेत. झुडूप, वेल, लहान सहान वनस्पती उगवत नाही आणि जगतही नाही. या झाडांच्या पाना फुलांमध्ये "इकोस्ट्रेनॉ इक ऍसिड व ग्लिरीसीडीन" या अनेक वासाची रासायनिक घटक आढळतात. त्यावासाने उंदीर, घूस, साप, पाल, पक्षी, माकडे दूर पळतात. जंगलात जिथे ही झाडे तिथे चराऊ गवत उगवत नाही. त्यावर गुजराण करणारे 'ग्रासलँड बर्ड' नाही. तशीच अवस्था अनेक उपयुक्त वेली व झुडुपांची झाली आहे. त्यावर आधारित अन्न साखळी विस्कटली. देशी पर्यावरणास उपयुक्त झाडे वाढायला संधीच ही विदेशी झाडे देत नाहीत. गेल्या चाळीस वर्षांत मोठी हानी आपल्या जैवविविधतेची झाली आहे.

डोंगरालगतच्या अनेक गावांत विषारी साप, सरपटणारे प्राणी, माकडे यांचा गावात वावर अधिक वाढला. त्यामुळे गावकरी त्रस्त झाले होते. त्याचे कारणही हीच झाडे आहेत. जंगलात सर्वत्र ही झाडे असल्याने तिथे राहणे या प्राण्यांना अशक्य झाले. त्याचा अधिवास धोक्यात आला म्हणून ती गावाकडे आली. अनेक गावात माकडे धुमाकूळ घालतात. कारण त्यांनाही जंगलात राहणे दुरापास्त झाले आहे. वडाच्या एका झाडावर २८ जातींचे पक्षी, १० हून अधिक जातींचे फुलपाखरे व कीटक अधिवास करतात. विपुल मात्रेत प्राणवायू वातावरण निर्माण होतो. आपण देशी व उपयुक्त वृक्षलागवड करून पर्यावरणाचे संवर्धन करण्याची गरज आहे. - डॉ. संतोष पाटील, अभिनव प्रतिष्ठान, सिल्लोड

----------

(फोटो) कॅप्शन

- हेच ते उंदीर मारीचे ग्लिरीसिडीचे झाड.

सूचना:-फोटो आहे