शहरं
Join us  
Trending Stories
1
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
2
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
3
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
4
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
5
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
8
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
9
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
10
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
11
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
12
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
13
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
14
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
15
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
16
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
17
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
18
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
19
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
Daily Top 2Weekly Top 5

Bio Diversity Day : मानवाच्या अस्तित्व आणि विकासासाठी पीक वैविध्याची भूमिका महत्त्वाची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 08:15 IST

पीक वैविध्य हे सकसतेबरोबरच पर्यावरणाचा पायाही ठरते. निसर्गाची पुन:र्निर्मितीची क्षमता वैविध्याबरोबर  वाढत जाते. ही अन्नव्यवस्था आजही अनेक जनसमूहाच्या जगण्याचा आधार आहे. 

- प्रा. सुनीती धारवाडकर 

आपली जीवसृष्टी विविधतेने नटलेली आहे. ही जैवविविधता पर्यावरण स्थिरतेचा पाया आहे. निसर्गामध्ये जेवढे जास्त वैविध्य असते, तेवढी त्याची स्थिरता आणि पुन:निर्मिती क्षमता जास्त असते. मानवी समाजाच्या अस्तित्वासाठी आणि विकासासाठी जैवविविधता महत्त्वाची ठरते. त्यामध्ये पीक वैविध्याची भूमिका   महत्त्वाची आहे. पीक वैविध्य हे सकसतेबरोबरच पर्यावरणाचा पायाही ठरते. निसर्गाची पुन:र्निर्मितीची क्षमता वैविध्याबरोबर  वाढत जाते. ही अन्नव्यवस्था आजही अनेक जनसमूहाच्या जगण्याचा आधार आहे. 

औद्योगिक क्रांतीने निसर्गातील नाती बदलून गेली. एकजातीय लागवडीला प्रोत्साहन दिले गेल्यामुळे नाचणीसारखी पोषणमूल्यांत सरस असलेली पिकेही नाकारली गेली. चिरस्थायी पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक असलेल्या फेरपालट व संमिश्र पीकपद्धती आणि मिश्र-पिकेही नष्ट होऊ लागली. संकरित वाणाच्या दबावाखाली पारंपरिक सरळ वाण हरवून गेले (१९५०). वरण-भात, भाजी-भाकरी अशा वैविध्यपूर्ण अन्नातूनच प्रथिने, कर्बोदके, मेद अशा विविध प्रकारच्या पोषण मूल्यांची आपली गरज भागवली जाते. कडधान्य, नाचणी, बाजरी, डाळी विभिन्न प्रकारच्या पोषक पदार्थांच्या -जीवनसत्त्व अन्नपोषकद्रव्यांच्या-प्राथमिक गरजा भागवतात; पण त्याजागी एक प्रकारची एकल संकरित पिके आली. केवळ गहू, वा द्राक्षे वा ऊस अशी लागवड होऊ लागली. एकात्मिक शेती-पद्धतीला सुरुंग लागला. नंतरच्या काळात (१९८०-९०) शेतीमधील जनुकक्रांतीने जनुकीय बदल केलेली बियाणे (जी. एम.) आणली. सोया, कॅनोला, तांदूळ, वांगी, काकडी, मिरची या जनुकीय बदल केलेल्या पिकांमुळे विभिन्न एतद्देशीय पिके दूर सारली जाऊ लागली. खाद्यान्नात एकसाची पद्धती आली.

आता मात्र हळूहळू आपल्याला पीक वैविध्याचे महत्त्व समजत आहे . एकच प्रकारचे फास्ट फूड खाण्याऐवजी ‘मल्टी ग्रेन’कडे लोकांचा कल झुकत आहे. पीक वैविध्य राखणे पर्यावरणासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे, हे जैवविविधता दिनादिवशी आपण लक्षात घेऊन, त्यादृष्टीनं पावले टाकायला हवीत!

शेतीची सुरूवात झाली कधी?मानवाने सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी शेतीची सुरुवात केली आणि अनेक प्रकारच्या पिकांचा विकास करून जैवविविधतेत भर टाकली. त्याने रानटी गवताचे रूपांतर गव्हात केले. हळूहळू ज्वारी, बाजरी, नाचणी अशी धान्ये आणि पालेभाज्या विकसित केल्या. पिढ्यान्पिढ्यांच्या त्यांच्या संकरणातून आपली अन्नव्यवस्था उदयाला आली. हजारो वर्षांच्या अनुभवातून शेतकऱ्यांनी या निसर्ग-प्रयोगशाळेत नाना प्रकारच्या पीक-प्रजातींचे प्रजनन केले.   

टॅग्स :Bio Diversity dayजैव विविधता दिवसNatureनिसर्गenvironmentपर्यावरण