शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Bio Diversity Day : मानवाच्या अस्तित्व आणि विकासासाठी पीक वैविध्याची भूमिका महत्त्वाची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 08:15 IST

पीक वैविध्य हे सकसतेबरोबरच पर्यावरणाचा पायाही ठरते. निसर्गाची पुन:र्निर्मितीची क्षमता वैविध्याबरोबर  वाढत जाते. ही अन्नव्यवस्था आजही अनेक जनसमूहाच्या जगण्याचा आधार आहे. 

- प्रा. सुनीती धारवाडकर 

आपली जीवसृष्टी विविधतेने नटलेली आहे. ही जैवविविधता पर्यावरण स्थिरतेचा पाया आहे. निसर्गामध्ये जेवढे जास्त वैविध्य असते, तेवढी त्याची स्थिरता आणि पुन:निर्मिती क्षमता जास्त असते. मानवी समाजाच्या अस्तित्वासाठी आणि विकासासाठी जैवविविधता महत्त्वाची ठरते. त्यामध्ये पीक वैविध्याची भूमिका   महत्त्वाची आहे. पीक वैविध्य हे सकसतेबरोबरच पर्यावरणाचा पायाही ठरते. निसर्गाची पुन:र्निर्मितीची क्षमता वैविध्याबरोबर  वाढत जाते. ही अन्नव्यवस्था आजही अनेक जनसमूहाच्या जगण्याचा आधार आहे. 

औद्योगिक क्रांतीने निसर्गातील नाती बदलून गेली. एकजातीय लागवडीला प्रोत्साहन दिले गेल्यामुळे नाचणीसारखी पोषणमूल्यांत सरस असलेली पिकेही नाकारली गेली. चिरस्थायी पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक असलेल्या फेरपालट व संमिश्र पीकपद्धती आणि मिश्र-पिकेही नष्ट होऊ लागली. संकरित वाणाच्या दबावाखाली पारंपरिक सरळ वाण हरवून गेले (१९५०). वरण-भात, भाजी-भाकरी अशा वैविध्यपूर्ण अन्नातूनच प्रथिने, कर्बोदके, मेद अशा विविध प्रकारच्या पोषण मूल्यांची आपली गरज भागवली जाते. कडधान्य, नाचणी, बाजरी, डाळी विभिन्न प्रकारच्या पोषक पदार्थांच्या -जीवनसत्त्व अन्नपोषकद्रव्यांच्या-प्राथमिक गरजा भागवतात; पण त्याजागी एक प्रकारची एकल संकरित पिके आली. केवळ गहू, वा द्राक्षे वा ऊस अशी लागवड होऊ लागली. एकात्मिक शेती-पद्धतीला सुरुंग लागला. नंतरच्या काळात (१९८०-९०) शेतीमधील जनुकक्रांतीने जनुकीय बदल केलेली बियाणे (जी. एम.) आणली. सोया, कॅनोला, तांदूळ, वांगी, काकडी, मिरची या जनुकीय बदल केलेल्या पिकांमुळे विभिन्न एतद्देशीय पिके दूर सारली जाऊ लागली. खाद्यान्नात एकसाची पद्धती आली.

आता मात्र हळूहळू आपल्याला पीक वैविध्याचे महत्त्व समजत आहे . एकच प्रकारचे फास्ट फूड खाण्याऐवजी ‘मल्टी ग्रेन’कडे लोकांचा कल झुकत आहे. पीक वैविध्य राखणे पर्यावरणासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे, हे जैवविविधता दिनादिवशी आपण लक्षात घेऊन, त्यादृष्टीनं पावले टाकायला हवीत!

शेतीची सुरूवात झाली कधी?मानवाने सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी शेतीची सुरुवात केली आणि अनेक प्रकारच्या पिकांचा विकास करून जैवविविधतेत भर टाकली. त्याने रानटी गवताचे रूपांतर गव्हात केले. हळूहळू ज्वारी, बाजरी, नाचणी अशी धान्ये आणि पालेभाज्या विकसित केल्या. पिढ्यान्पिढ्यांच्या त्यांच्या संकरणातून आपली अन्नव्यवस्था उदयाला आली. हजारो वर्षांच्या अनुभवातून शेतकऱ्यांनी या निसर्ग-प्रयोगशाळेत नाना प्रकारच्या पीक-प्रजातींचे प्रजनन केले.   

टॅग्स :Bio Diversity dayजैव विविधता दिवसNatureनिसर्गenvironmentपर्यावरण