शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

बिलोलीत ‘हाफ डे’ शाळा

By admin | Updated: July 6, 2014 00:13 IST

राजेश गंगमवार, बिलोली सद्य:स्थितीत उन्हाळ्याप्रमाणे तापमान वाढले असून विद्यार्थ्यांना वर्गात थांबणेदेखील अवघड झाले आहे.

राजेश गंगमवार, बिलोलीसद्य:स्थितीत उन्हाळ्याप्रमाणे तापमान वाढले असून विद्यार्थ्यांना वर्गात थांबणेदेखील अवघड झाले आहे. परिणामी बिलोली तालुक्यातील खाजगी शाळांनी मार्चप्रमाणे ‘हाफ डे’ शाळांचा प्रयोग सुरु केला आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने सर्वच स्तरात फटका बसला असून शेतकरी देखील हैराण झाला आहेत. दरम्यान, खाजगी शाळा संस्थेमार्फत निर्णय घेत असून जिल्हा परिषदांच्या शाळा मात्र वरिष्ठांकडे पाहत आहेत. जुलैचा पहिला आठवडा संपत आला पण पावसाची अद्याप चिन्हे नाहीत. उलट उन्हाळ्याप्रमाणे तापमान वाढले आहे. दिवस-रात्र वारे सुटत असून आकाशातही ढगाळ वातावरण नाही. वाढत्या तापमानामुळे अद्यापही उन्हाळ्याप्रमाणे घराघरात वॉटर कुलर दिसून येत आहे. घरातही थांबणे अवघड होऊन बसले आहे. इकडे शाळांमध्येदेखील हिच स्थिती असून ५० ते ६० विद्यार्थी असलेल्या वर्गावर्गात उकाड्याने विद्यार्थी वैतागले आहेत. जूनअखेर प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुलैपासून शिकवणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, शिक्षक मंडळी शिकवणी करीत असले तरी उकाडा व गारपिटीमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष लागत नाही. परिणामी विद्यार्थी हजेरीवरदेखील परिणाम झाला आहे. यापूर्वी पावसाळा लांबला की उन्हाळी सुट्या वाढत होत्या. पण जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने एकच दिवस हजेरी लावली. परिणामी सुट्या वाढवण्याचा प्रश्नच पुढे आला नाही. मात्र मागच्या वीस दिवसांत एकही थेंब पाऊस झाला नाही. उलट उन्हाळ्याप्रमाणे उकाड्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. परिणामी शाळांवरदेखील परिणाम झाला. यासंदर्भात ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित करताच आरटीईच्या कायद्यान्वये भौतिक सुविधा देणे आवश्यक असल्याने बहुसंख्य शाळांनी छताचे पंखे बसविण्यास सुरुवात केली. संस्थाचालकांनीही पुढाकार घेऊन वर्गावर्गात पंखे आणले पण आता भारनियमन वाढल्याने पंखे असूनही उपयोग होत नाही. असे चित्र समोर आहे. पावसाअभावी चिंतेचे वातावरण आहे.जि. प. शाळांना परवानगी द्यावीवाढलेल्या तापमानामुळे चांगलाच उकाडा होत आहे. खेड्यापाड्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राथमिक शाळांमध्ये गावातूनच पाणीपुरवठा होतो. पण बहुसंख्य गावांत पाणीटंचाई झाल्याने मुलांना पाणी वेळेवर मिळत नाही. पाऊस नाही, वाढते तापमान यामुळे विद्यार्थी वर्गात बसणे अवघड झाले आहे.परिणामी जि. प. शाळांनीही ‘हाफ डे’ करावे. व्यंकटेश भोगाजे (बिलोली तालुकाध्यक्ष, अ. भा. प्रा. शिक्षक संघ).तापमानात वाढ झाली आहे. पावसाळा उन्हाळ्याप्रमाणे जाणवत आहे हे वास्तव आहे. संस्थाचालक व शालेय समिती आपल्यास्तरावर हिताचा निर्णय घेऊ शकतात. परिस्थितीनुसार ‘हाफ डे’ करता येईल पण जि. प. चे निर्णय जिल्हा पातळीवरुन ठरतात.माधव सलगरगटशिक्षणाधिकारी, बिलोली