शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कोट्यवधींचा खर्च ‘खड्ड्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:04 IST

दरवर्षी शहरातील रस्त्यांवर सुमारे ३० कोटी रुपये खर्च करण्यात येतात. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही औरंगाबादकरांच्या नशिबी खड्डेच आहेत.

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले आहेत. या खड्ड्यांमुळे शहरातील १५ लाख नागरिक त्रस्त झालेले असताना महापालिका मागील आठ दिवसांपासून मुरूम टाकून खड्डे बुजविण्यात मग्न आहे. दरवर्षी शहरातील रस्त्यांवर सुमारे ३० कोटी रुपये खर्च करण्यात येतात. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही औरंगाबादकरांच्या नशिबी खड्डेच आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मागील आठवड्यात दर्जेदार साहित्याचा वापर करून खड्डे बुजवा, असे आदेश दिल्यानंतरही मनपाने त्याची दखलही घेतली नाही, हे विशेष.शहरात १३०० किलोमीटरचे रस्ते महापालिकेच्या अखत्यारीत येतात. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे २१किलोमीटर रस्ते सोपविण्यात आले आहेत. या दोन्ही विभागांतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसून येतील. पावसाळा सुरू झाल्यापासून औरंगाबादकर खड्ड्यांपासून त्रस्त आहेत. अलिशान कारमध्ये फिरणाºया अधिकारी व कर्मचाºयांना या खड्ड्यांचा अजिबात त्रास होत नाही. त्यामुळे औरंगाबादकरांच्या दु:खाशी त्यांना काही देणे-घेणेही राहिलेले नाही. गणेश विसर्जन आल्यावर खड्ड्यांचा मुद्दा येतो, तेव्हा बघू म्हणून प्रशासन मागील काही दिवसांपासून खड्डे या विषयावर मौन बाळगून होते. गणपतीबाप्पांनाही पहिल्या दिवशी खड्डे चुकवत विराजमान व्हावे लागले. त्यानंतर महापालिकेने मुरूम, खडीच्या साह्याने खड्डे बुजविण्याची मोहीम सुरू केली. गारखेडा भागात डांबराच्या साह्याने खड्डे बुजविणे सुरू होते. उर्वरित शहरात सर्वत्र मुरमाचाच राजरोसपणे वापर करण्यात आला. ज्या भागातून गणेश विसर्जन मिरवणुका जाणार आहेत, त्याच रस्त्यांवर धूळफेक डागडुजी करण्यात आली. आणखी एक मोठा पाऊस आल्यास महापालिकेचा मुरूम वाहून जाणार, हे निश्चित. कंत्राटदार तर मनपाकडून लाखो रुपये खर्च वसूलही करणार, हे सुद्धा निर्विवाद सत्य आहे.