शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा चेतना अभियान; निधीला फुटले पाय..!

By admin | Updated: July 7, 2016 00:10 IST

बालाजी आडसूळ , कळंब तालुक्यातील लोहटा पश्चीम येथील ग्रामपंचायतीचा कारभार मध्यंतरी आमरण उपोषणामुळे चव्हाट्यावर आला होता.

बालाजी आडसूळ , कळंबतालुक्यातील लोहटा पश्चीम येथील ग्रामपंचायतीचा कारभार मध्यंतरी आमरण उपोषणामुळे चव्हाट्यावर आला होता. सदरील घडामोड ताजी असतानाच आता बळीराजा चेतना अभियानाच्या निधीला पाय फुटल्याचे सांगत उपसरपंचांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशीसाठी अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करण्यात आली. कळंब तालुक्यातील लोहटा पश्चीम ग्रामपंचायतीचा कारभार कुठल्या ना कुठल्या कारणावरून सतत चर्चेत असतो. सदस्यांना विश्वासात न घेणे, ग्रामसेवकांची गैरहजेरी अशा स्वरुपाच्या तक्रारी होत असत. मागील महिन्यात ग्रामपंचायत कार्यालयासमोरच शिवाजी जाधव व शाहूराव खोसे यांनी आमरण उपोषण केले होते. यावर प्रशासनाने चौकशी करुन कारवाई करु असे लेखी आश्वासन दिले होते. सदरील चौकशी होणे बाकी असतानाच आता दस्तूरखूद्द उपसरपंच रवीकांत पवार यांनी ग्रामपंचायतीच्या विविध खात्यावरील जमा रक्कमा व काही योजनेच्या अंमलबजावणीत आर्थिक गैरव्यवहार व अनियमतता झाल्याचे सांगत मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे धाव घेतली आहे. तक्रारीतील गांभीर्य लक्षात घेऊन पंचायत समितीकडून विस्तार अधिकारी पी. एस. माचवे व रोहयोचे पालक तांत्रिक अधिकारी उस्मानी यांची चौकशीसाठी नेमणूक केली आहे. परंतु, तत्कालीन दोन्ही ग्रामसेवकापैकी एकजण रजेवर तर दुसरे अनधिक्रतरित्या गैरहजर असल्याने चौकशीमध्ये अडथळे येत आहे. शेतकऱ्यांसाठीची मदतही गायबदुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर बळीराजा चेतना अभियान राबवण्यात येत आहे. या योजनेतून गावातील त्रस्त व्यक्तींना तातडीची आर्थीक मदत देणेशेतकऱ्यांचे मनोबल वाढेल असे पुरक कार्यक्रम राबवण्यासाठी ग्रामपंचायतीला लाखभर रुपये मिळाले होते. सदर रक्कम कळंब येथील एका राष्ट्रीयकृत बँकेतील ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झाली होती. ही रक्कम दोन प्रयत्नामध्ये गावातील रहिवाशी व गावाला परिचित नसलेल्या एका व्यक्तिच्या नावावर उचलण्यात आली आहे. वस्तुत: ही रक्कम धनादेशाद्वारे शेतकऱ्यांना वाटप करणे गरजेचे आहे. प्रत्येक ग्रामपंचायतला १४ व्या वित्त आयोगाचा भरीव निधी मिळत आहे. हा निधी ग्रापच्या खात्यावर थेट जमा होत आहे.परंतु, असे असले तरी तो खर्च करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनेचा अवलंब करणे बंधनकारक आहे. त्यानुसार गावात गाईडलाईनप्रमाणे कृती आराखडा तयार करुन त्यास मान्यता घेणे, त्यानुरूप काम करणे आवश्यक आहे. ४लोहटा पश्चीम ग्रामपंचायतीला आजवर १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मिळालेल्या निधतील तीन लाखापेक्षा जास्त रक्कम उचलली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही रक्कम कशासाठी उचलली? यातून कोणते काम केले? कृती आराखड्याप्रमाणे खर्च झाला का? आदी बाबींचा ‘सस्पेन्स’ निर्मान झाला आहे. ४ग्रामपंचायतीने महाग्रारेहयो अंतर्गत विहिरीचा लाभ घेतलेल्या एका शेतकऱ्याला दिलेला १ लाख १२ हजाराचा धनादेशही खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने 'बाऊन्स'झाला असल्याचे समोर आले आहे.लोहटा पश्चिम ग्रापसंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी पंचायत समितीने माझी नियूक्ती केली आहे. प्राथमीक चौकशी पूर्ण झाली असून १९ जुलैपासून विस्तृत चौकशी सुरू होईल. तत्कालीन ग्रामसेवकांकडून अभिलेखे ताब्यात मिळालेली नाहीत. यासंदर्भात संबधीतांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्राथमिक चौकशीत रक्कमा उचलल्याचे निदर्शनास येत असले तरी त्याचा विनियोग झाला की नाही, हे विस्तृत चौकशीअंतीच स्पष्ट होणार आहे, असे विस्तार अधिकारी पी. एस. माचवे यांनी सांगितले. ग्रामपंचायतची ग्रामनिधीची रक्कम, चौदाव्या वित्त आयोगाचा प्राप्त निधी, महाग्रारोहयो अंतर्गत शेतकरी, रोजगार सेवक यांना देण्यात येणारी रक्कम, घरकुल बांधकाम, शौचालय, बळीराजा चेतना अभियान आदी योजनांच्या निधीत मोठ्या प्रमाणात अनियमतता, गैरव्यवहार झाला आहे. याची तातडीने चौकशी व्हावी.-रविकांत पवार, उपसपंच.