शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

‘शिक्षण’वर होणार सर्वात मोठी कारवाई

By admin | Updated: February 23, 2016 00:42 IST

उस्मानाबाद : शिक्षण विभागात अनेक प्रकरणात अनियमितता झाली आहे़ विभागीय स्तरावरील चौकशीत दोषी आढळणारे अधिकारी कार्यरत असल्याचे उदाहरण राज्यात

उस्मानाबाद : शिक्षण विभागात अनेक प्रकरणात अनियमितता झाली आहे़ विभागीय स्तरावरील चौकशीत दोषी आढळणारे अधिकारी कार्यरत असल्याचे उदाहरण राज्यात केवळ उस्मानाबादचे आहे़ न्यायालयाच्या आदेशाचा सोयीनुसार अर्थ काढून तो आदेश गोल फिरविण्याचे कामही शिक्षण विभागाने केले आहे़ दिवसभराच्या बैठकीमध्ये शिक्षण विभागातील अनेक त्रुटी समोर आल्या असून, सर्वात मोठी कारवाई ही शिक्षण विभागावर होणार असल्याचा सूचक इशारा पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ़ संभाजी पाटील- निलंगेकर यांनी दिला़ शिवाय अनेकांनी शासकीय जमिनी स्वत:च्या मालकीच्या केल्याचा प्रकारही समोर आला असून, अशांवरही कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले़जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षात सोमवारी रात्री आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी अध्यक्ष नितीन काळे यांची उपस्थिती होती़ आ़ पाटील म्हणाले, पंचायत राज समितीच्या पाहणी दौऱ्यासाठी ज्या जिल्ह्यात ही समिती कधी गेली नाही, अशाच जिल्ह्यांची निवड करण्याचे ठरविण्यात आले होते़ समित्यांचा दौरा म्हणजे केवळ सहल अशा पध्दतीने यापूर्वी पाहिले जात होते़ मात्र, ‘आॅडिट’ काय असते? याची खरी ओळख ही समिती उस्मानाबादेतून राज्याला करून देणार आहे़ आठ जिल्ह्यात ही समिती गेली असून, जवळपास १५०० कोटी रूपयांहून अधिक रक्कम राज्य शासनाच्या तिजोरीत जमा केली आहे़ आज दिवसभरात झालेल्या बैठकीत अनेक बाबी पुढे आल्या आहेत़ विविध योजनांसाठी लोकवाटा जमा करण्यात आला आहे़ मात्र, १०-१० वर्षे झाली तरी हा लोकवाटा शासनाकडे जमा करण्यात आलेला नाही़ त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळालेला नाही़ ही रक्कम जवळपास ९१ लाखाच्या घरात आहे़ पाणीपुरवठ्यासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या़ मात्र, या योजना कार्यान्वित झाल्या नाहीत़ प्रत्यक्षात नागरिकांना याचा लाभ मिळालेला नाही़ अशा अनेक योजनांमध्ये अनियमितता आढळून आली आहे़ दिवसभरात सन २००८-०९ व २०११-१२ मधील आॅडिटची पाहणी केली आहे़ यात बांधकाम विभाग, शिक्षण विभागासह इतर विविध विभागाच्या कामकाजात अनियमितता आढळून आली आहे़जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागा या अनेकांनी खासगी मालमत्ता करून टाकल्या आहेत़ या जागा शासनाकडे परत घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत़ अशा जागांचा अहवाल तयार करून एका महिन्याच्या आत सादर करावा, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत़ जिल्हा बँकेकडे असलेले ६० कोटी रूपये मिळावेत, यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत़ गावा-गावातील सरपंच, सदस्यांच्या भेटी घेण्यात येणार आहेत़ त्यांना आॅडिट काय असते? पंचायत राज समितीचे काम काय आहे ? याची माहिती व्हावी, यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे ते म्हणाले़ (प्रतिनिधी)